शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Coronavirus: संपूर्ण राज्यात फक्त १२ कोरोना रुग्ण; तरीही लॉकडाऊन वाढवण्याची ‘या’ मुख्यमंत्र्यांची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 16:46 IST

केंद्र सरकारने या संपूर्ण प्रकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसला तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठकीत स्पष्टपणे सांगितले की ही दीर्घ लढाई आहे

ठळक मुद्देमेघालयात आतापर्यंत कोरोनाचे १२ रुग्ण आढळले आहेतराज्यात कोरोना संक्रमण वाढू नये यासाठी ३ मे नंतरही लॉकडाऊन वाढवण्याची शिफारसमेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांची पंतप्रधानांकडे विनंती

नवी दिल्ली – कोरोनाला रोखण्यासाठी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. देशभरात आतापर्यंत २७ हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर ८५० हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यात ३ मे नंतर लॉकडाऊन वाढवावा की नाही यावर चर्चा करण्यात आली.

पंतप्रधानासोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सर्व मुख्यमंत्र्यांनी आपापली मते मांडली. त्यावेळी मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी लॉकडाऊनवर पंतप्रधान मोदींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी आमच्या राज्यात ३ मे नंतरही लॉकडाऊन कायम ठेवावा अशी इच्छा आहे. त्याचसोबत ज्या विभागाचा ग्रीन झोनमध्ये समावेश येतो त्यासाठी लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता आणू शकतो असंही ते म्हणाले.

विशेष म्हणजे मेघालय देशातील असं राज्य आहे ज्याठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या अतिशय कमी आहे. मेघालयची स्थिती उत्तम आहे. मेघालयमध्ये २६ एप्रिल संध्याकाळी ५ पर्यंत फक्त १२ कोरोनाचे रुग्ण होते. तर आतापर्यंत १ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मेघालयच्या खालोखाल गोवा, पुडुचेरी, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि मिझारोम अशी छोटी राज्य आहेत. ज्याठिकाणी कोरोनाचा परिणाम कमी प्रमाणात आढळला.

दरम्यान, केंद्र सरकारने या संपूर्ण प्रकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसला तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठकीत स्पष्टपणे सांगितले की ही दीर्घ लढाई आहे आणि लॉकडाऊन योग्य पद्धतीने पाळले पाहिजे. त्याचबरोबर या व्यतिरिक्त, केंद्र सरकारच्या वतीने असंही म्हटलं आहे की लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारकडून कशाप्रकारे मदत दिली जाऊ शकते याविषयी राज्यांनी आपापले धोरण तयार करावे असंही सांगण्यात आलं आहे.

त्याचसोबत ज्या भागात कोरोनाचा परिणाम होत नाही अशा ठिकाणी आर्थिक व्यवहार लक्षात घेऊन लॉकडाऊनमधून काहीसा दिलासा मिळू शकतो. कोरोना संक्रमित भागात लॉकडाऊन सुरू ठेवता येते. पण ३ मे नंतर लॉकडाऊन वाढल्यास त्याचे स्वरूप काय असेल, हे वास्तव चित्र पंतप्रधान मोदींच्या अभिभाषणानंतरच स्पष्ट होईल.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

उत्तर कोरियाचा हुकूमशहा मिसाईल चाचणीवेळी जखमी झाला? कोरियाई अधिकाऱ्याने केला दावा

राज्य सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना ‘या’ निर्णयाचा फटका; एप्रिलचा पगार लांबणीवर पडणार?

जाणून घ्या, भारतात कोरोनाचा संसर्ग कधी संपुष्टात येणार?; सिंगापूर युनिव्हर्सिटीचा मोठा दावा!

...तर १५ मे पर्यंत मुंबईत कोरोनाचा हाहाकार माजेल; केंद्रीय टीमचा धक्कादायक अंदाज

मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर 'जिवंत' झाली महिला; डॉक्टर अन् कुटुंबाला बसला जबर धक्का

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी