शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

CoronaVirus News: जूनमध्ये कोरोना हाहाकार माजवणार? आरोग्य मंत्रालयाने दिले 'असे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 20:09 IST

एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले होते, 'सध्याचा ट्रेंड पाहता कोरोनाचे रुग्ण जून महिन्यात आपल्या  सर्वोच्च पातळीवर असतील. मात्र हा आजार झटपट संपून जाईल असे नाही. आपल्याला कोरोनासोबतच राहावे लागेल. हळूहळू कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागेल.'

ठळक मुद्देमे महिना सुरू झाल्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी झपाट्याने वाढ होऊ लागली आहेमहाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे चिंता अधिक वाढली आहेएम्सचे संचालक रणदीप गुलेरिया एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले होते, कोरोनाचे रुग्ण जून महिन्यात आपल्या  सर्वोच्च पातळीवर असतील

नवी दिल्ली - मे महिना सुरू झाल्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे चिंता अधिक वाढली आहे. यासंदर्भात दिल्ली एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी नुकताच दावा केला, की जूनमध्ये भारतातील कोरोना रुग्णांची संख्येत फार मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. त्यांच्या या दाव्यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तर दिले आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिले असे उत्तर -आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, जर आपण आवश्यक ती सावधगिरी बाळगली आणि दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले, तर कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्यापासून आपण रोखू शकतो. मात्र, आपण आवश्यक ती सावधगिरी बाळगली नाही आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन केले नाही, तर कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू शकते.

आणखी वाचा - CoronaVirus News : 'या' 6 व्हॅक्सीन मानवासाठी ठरू शकतात वरदान, कोरोनाच्या विळख्यातून करू शकतात जगाची सुटका

काय म्हणाले होते रणदीप गुलेरिया -एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले होते, 'सध्याचा ट्रेंड पाहता कोरोनाचे रुग्ण जून महिन्यात आपल्या  सर्वोच्च पातळीवर असतील. मात्र हा आजार झटपट संपून जाईल असे नाही. आपल्याला कोरोनासोबतच राहावे लागेल. हळूहळू कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागेल.'

'आपल्याला लॉकडाऊनचा निश्चितपणे फायदा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे आपल्या देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेला नाही. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमी प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. रुग्णालयांनी लॉकडाऊनदरम्यान पुरेशी तयारी करून ठेवली आहे. डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच पीपीई किट्स, व्हेंटिलेटर्स आणि वैद्यकीय उपकरणांची सोय करण्यात आली आहे,' असेही गुलेरिया म्हणाले होते.

आणखी वाचा - LockdownNews : इम्रान सरकारचं मोठं पाऊल; लॉकडाउन हटविण्याचा घेतला निर्णय, 'असं' सांगितलं कारण

24 तासांत देशात 3390 नवे रुग्ण -आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,  गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 3390  नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 1273 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 56,342 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1800 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 37,916 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 16,540 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जवळपास 29.36 टक्के लोकांनी कोरोनावर मात केली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, गर्दीच्या ठिकाणीही जाणे टाळा. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना केले आहे. 

आणखी वाचा - CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनानं आतापर्यंत बदललीयेत शेकडो रुपं, वैज्ञानिकांचे हात अद्यापही रिकामेच

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईdelhiदिल्लीGujaratगुजरातGovernmentसरकार