शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: जूनमध्ये कोरोना हाहाकार माजवणार? आरोग्य मंत्रालयाने दिले 'असे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 20:09 IST

एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले होते, 'सध्याचा ट्रेंड पाहता कोरोनाचे रुग्ण जून महिन्यात आपल्या  सर्वोच्च पातळीवर असतील. मात्र हा आजार झटपट संपून जाईल असे नाही. आपल्याला कोरोनासोबतच राहावे लागेल. हळूहळू कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागेल.'

ठळक मुद्देमे महिना सुरू झाल्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी झपाट्याने वाढ होऊ लागली आहेमहाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे चिंता अधिक वाढली आहेएम्सचे संचालक रणदीप गुलेरिया एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले होते, कोरोनाचे रुग्ण जून महिन्यात आपल्या  सर्वोच्च पातळीवर असतील

नवी दिल्ली - मे महिना सुरू झाल्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे चिंता अधिक वाढली आहे. यासंदर्भात दिल्ली एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी नुकताच दावा केला, की जूनमध्ये भारतातील कोरोना रुग्णांची संख्येत फार मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. त्यांच्या या दाव्यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तर दिले आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिले असे उत्तर -आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, जर आपण आवश्यक ती सावधगिरी बाळगली आणि दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले, तर कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्यापासून आपण रोखू शकतो. मात्र, आपण आवश्यक ती सावधगिरी बाळगली नाही आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन केले नाही, तर कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू शकते.

आणखी वाचा - CoronaVirus News : 'या' 6 व्हॅक्सीन मानवासाठी ठरू शकतात वरदान, कोरोनाच्या विळख्यातून करू शकतात जगाची सुटका

काय म्हणाले होते रणदीप गुलेरिया -एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले होते, 'सध्याचा ट्रेंड पाहता कोरोनाचे रुग्ण जून महिन्यात आपल्या  सर्वोच्च पातळीवर असतील. मात्र हा आजार झटपट संपून जाईल असे नाही. आपल्याला कोरोनासोबतच राहावे लागेल. हळूहळू कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागेल.'

'आपल्याला लॉकडाऊनचा निश्चितपणे फायदा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे आपल्या देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेला नाही. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमी प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. रुग्णालयांनी लॉकडाऊनदरम्यान पुरेशी तयारी करून ठेवली आहे. डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच पीपीई किट्स, व्हेंटिलेटर्स आणि वैद्यकीय उपकरणांची सोय करण्यात आली आहे,' असेही गुलेरिया म्हणाले होते.

आणखी वाचा - LockdownNews : इम्रान सरकारचं मोठं पाऊल; लॉकडाउन हटविण्याचा घेतला निर्णय, 'असं' सांगितलं कारण

24 तासांत देशात 3390 नवे रुग्ण -आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,  गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 3390  नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 1273 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 56,342 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1800 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 37,916 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 16,540 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जवळपास 29.36 टक्के लोकांनी कोरोनावर मात केली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, गर्दीच्या ठिकाणीही जाणे टाळा. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना केले आहे. 

आणखी वाचा - CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनानं आतापर्यंत बदललीयेत शेकडो रुपं, वैज्ञानिकांचे हात अद्यापही रिकामेच

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईdelhiदिल्लीGujaratगुजरातGovernmentसरकार