शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

CoronaVirus News: दिलासादायक; "फ्लॅट नव्हे, लवकरच रिव्हर्स येईल 'कोरोना ग्राफ', आता 'स्वदेशी' टेस्टिंग किट्सने होणार तपासणी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 20:25 IST

नवी दिल्ली : मे महिन्यात कोरोना रुग्णांमध्ये होत असलेली वाढ देशासाठी चिंतेचा विषय आहे. मात्र, अशातच आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन ...

ठळक मुद्देआता 'चीनी' नव्हे 'स्वदेशी' टेस्ट किट्सचा होणार वापर टेस्टिंगच्या बाबतीतही आपण जगातील कुठल्याही देशापेक्षा मागे नाहीआपला कोरोनाविरोधातील लढाईत निश्चितपणे निर्णायक विजय होईल, हर्षवर्धन यांनी व्यक्त केली आशा

नवी दिल्ली : मे महिन्यात कोरोना रुग्णांमध्ये होत असलेली वाढ देशासाठी चिंतेचा विषय आहे. मात्र, अशातच आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केकेले विधान दिलासादायक आहे. त्यांनी एका स्थानिक वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटले आहे, की काही आठवड्यांतच कोरोनाचा ग्राफ केवळ फ्लॅटच नाही, तर रिव्हर्सदेखील येईल. ते म्हणाले, अधिक तपासण्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये झालेली वाढ, यामुळे सध्या अधिक रुग्ण समोर येत आहेत.

आरोग्य मंत्री म्हणाले, 'आतापर्यंत देशात जवळपास 56 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 1800 जणांचा मृत्यू झाला आहे. तर,  17 हजार लोग ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. आपला रिकव्हरी रेट 30 टक्के एवढा आहे. तर लोकसंख्या एकूण 135 कोटी आहे. आपल्याहून छोट्या देशांतही आपल्यापेक्षा अधिक रुग्ण आणि मृत्यू झाले आहेत. जगाच्या तुलनेत भारत फार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. लोकही सरकारच्या सूचनांचे पालन करत आहेत.'

आणखी वाचा - CoronaVirus News : भारतासाठी आनंदाची बातमी; "अमेरिका, इटली सारखा धोका नाही, अत्यंत वाईट परिस्थितीसाठीही देश तयार"

डॉ. गुलेरिया यांच्या वक्तव्यावर काय म्हणाले डॉ. हर्षवर्धन?AIIMSचे संचालक डॉ. गुलेरिया म्हणाले होते, की जून-जुलैमध्ये कोरोना बाधितांची संख्या पीकवर असू शकते. यावर हर्षवर्धन म्हणाले, 'माझी कसल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. त्यांनी काय विचार करून हे वक्तव्य  केले, मला माहित नाही. मात्र, वैयक्तीक पातळीवर, मी म्हणू शकतो, की मी, आशावादी आहे. येणाऱ्या काही आठवड्यांत हळू-हळू पूर्णपणे फ्लॅट होईल आणि रिव्हर्सदेखील होईल. आपला कोरोनाविरोधातील लढाईत निश्चितपणे निर्णायक विजय होईल.'

आणखी वाचा - CoronaVirus News : 'या' 6 व्हॅक्सीन मानवासाठी ठरू शकतात वरदान, कोरोनाच्या विळख्यातून करू शकतात जगाची सुटका

आता 'चीनी' नव्हे 'स्वदेशी' टेस्ट किट्सचा होणार वापर -हर्षवर्धन म्हणाले, आज एका लॅबच्या 452 लॅब झाल्या आहेत. 80 हजारवर टेस्ट रोज केल्या जात आहेत. आम्ही 31 मेपर्यंत 1 लाख टेस्ट करणार असल्याचे म्हटले होते. आपण टेस्टिंगच्या बाबतीतही जगातील कुठल्याही देशापेक्षा मागे नाही. आज देशातील प्रत्येक जिल्ह्यात टेस्ट होत आहे. कर्नाटकात प्रत्येक जिल्ह्यात 250 टेस्ट करायला लावल्या आहेत. मात्र, त्यांनी 7-8 हजारपर्यंत टेस्ट केल्या आहेत. या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. तर काही लोकांचा टेस्ट रिपोर्ट उशिराने येत आहे. ही समस्याही दूर होईल. आनंदाची गोष्ट तर ही आहे, की आपले वैज्ञानिक मे महिन्यातच अँटीबॉडी टेस्ट किट्स आणि आरटी-पीसीआर टेस्ट किट्स भारतात तयार करण्यास प्रारंभ करतील. येणाऱ्या काळात याच किट्सचा वापर केला जाईल. अनेक ठिकाणी व्हॅक्सीन शोधण्याचे काम सुरू आहे. तसेच काही ह्यूमन ट्रायलपर्यंतही पोहोचे आहे, असेही हर्षवर्धन यांनी सांगितले.

आणखी वाचा - 40 कुटुंबांचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश; पूर्वजांना औरंगजेबाने मुस्लीम बनवल्याचा दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारCentral Governmentकेंद्र सरकारdoctorडॉक्टरdelhiदिल्लीIndiaभारत