शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

CoronaVirus : ममतांना निवडणुकीची भीती; कोरोनावर बदलली रणनीती, थेट 'यां'च्याशी साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 00:41 IST

तृणमूल काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनतेतील वाढता असंतोष, कमी परीक्षण तसेच केंद्राच्या चमूंनी दिलेल्या तिखट प्रतिक्रियांसारख्या अनेक कारणांमुळे, ममतांनी आपली रणनीती बदली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलला याचा मोठा फटका बसू शकतो.

ठळक मुद्देममता सरकारवर कोरोना व्हायरससंदर्भातील धोरणावरून सातत्याने टीका होत आहेपुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलला मोठा फटका बसू शकतोसध्याच्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये 1344 रुग्ण समोर आले आहेत

कोलकाता : ममता सरकारवर कोरोना व्हायरससंदर्भातील धोरणावरून सातत्याने टीका होत आहे. यामुळे आता पश्चिम बंगालमधील ममता सरकारने, कोरोना परीक्षणात मोठ्या प्रमाणावर वाढ करत, कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंसंदर्भात ऑडिट समितीच्या क्षेत्राधिकारातही बदल करत आणि लॉकडाउन कठोर करत, आपली रणनीती बदलली आहे. एवढेच नाही, तर ममता सरकारने यासंदर्भात निवडणूक डावपेचातील रथी प्रशांत किशोर यांच्याशीही संपर्क साधला आहे.

तृणमूल काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनतेतील वाढता असंतोष, कमी परीक्षण तसेच केंद्राच्या चमूंनी दिलेल्या तिखट प्रतिक्रियांसारख्या अनेक कारणांमुळे, ममतांनी आपली रणनीती बदली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलला याचा मोठा फटका बसू शकतो.

राज्यात कोरोनाचे 1344  रुग्ण -तृणमूलच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, 'जिल्ह्यामधून येणारे अहवाल चिंताजन होते. कारण या संकटाच्या काळात राज्य सरकारच्या व्यवस्थापनाप्रती जनता संतप्त होती. केंद्रावर केली जाणारी टीकाही जनतेच्या गळ्याखाली उतरली नाही आणि कोरोनाच्या स्थितीवरून सातत्याने प्रश्न उपस्थित केले गेले.' सध्याच्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये 1344 रुग्ण समोर आले आहेत. 140 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, यापैकी 68 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे म्हणण्यात आले आहे. तर इतरांना इतर आजारही होते.

प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क -तृणमूलच्या आणखी एका नेत्याने म्हटले आहे, की ‘2021च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच, कोरोनाच्या मुद्द्यावरून ममता सरकारवर आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांनी आता निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. यानंतर एक बहुआयामी रणनीती तयार करण्यात आली आहे. जी लागू करण्यासाठी प्रशासकीय तथा राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असते. त्यांच्या मार्गदर्शनातच पक्ष सशक्त असल्याचे दाखवत आहे, चुकाही सुधारत आहे. तसेच  भाजपशीही दोन हात करत आहे.'

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल