शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ममतांना निवडणुकीची भीती; कोरोनावर बदलली रणनीती, थेट 'यां'च्याशी साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 00:41 IST

तृणमूल काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनतेतील वाढता असंतोष, कमी परीक्षण तसेच केंद्राच्या चमूंनी दिलेल्या तिखट प्रतिक्रियांसारख्या अनेक कारणांमुळे, ममतांनी आपली रणनीती बदली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलला याचा मोठा फटका बसू शकतो.

ठळक मुद्देममता सरकारवर कोरोना व्हायरससंदर्भातील धोरणावरून सातत्याने टीका होत आहेपुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलला मोठा फटका बसू शकतोसध्याच्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये 1344 रुग्ण समोर आले आहेत

कोलकाता : ममता सरकारवर कोरोना व्हायरससंदर्भातील धोरणावरून सातत्याने टीका होत आहे. यामुळे आता पश्चिम बंगालमधील ममता सरकारने, कोरोना परीक्षणात मोठ्या प्रमाणावर वाढ करत, कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंसंदर्भात ऑडिट समितीच्या क्षेत्राधिकारातही बदल करत आणि लॉकडाउन कठोर करत, आपली रणनीती बदलली आहे. एवढेच नाही, तर ममता सरकारने यासंदर्भात निवडणूक डावपेचातील रथी प्रशांत किशोर यांच्याशीही संपर्क साधला आहे.

तृणमूल काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनतेतील वाढता असंतोष, कमी परीक्षण तसेच केंद्राच्या चमूंनी दिलेल्या तिखट प्रतिक्रियांसारख्या अनेक कारणांमुळे, ममतांनी आपली रणनीती बदली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलला याचा मोठा फटका बसू शकतो.

राज्यात कोरोनाचे 1344  रुग्ण -तृणमूलच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, 'जिल्ह्यामधून येणारे अहवाल चिंताजन होते. कारण या संकटाच्या काळात राज्य सरकारच्या व्यवस्थापनाप्रती जनता संतप्त होती. केंद्रावर केली जाणारी टीकाही जनतेच्या गळ्याखाली उतरली नाही आणि कोरोनाच्या स्थितीवरून सातत्याने प्रश्न उपस्थित केले गेले.' सध्याच्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये 1344 रुग्ण समोर आले आहेत. 140 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, यापैकी 68 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे म्हणण्यात आले आहे. तर इतरांना इतर आजारही होते.

प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क -तृणमूलच्या आणखी एका नेत्याने म्हटले आहे, की ‘2021च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच, कोरोनाच्या मुद्द्यावरून ममता सरकारवर आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांनी आता निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. यानंतर एक बहुआयामी रणनीती तयार करण्यात आली आहे. जी लागू करण्यासाठी प्रशासकीय तथा राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असते. त्यांच्या मार्गदर्शनातच पक्ष सशक्त असल्याचे दाखवत आहे, चुकाही सुधारत आहे. तसेच  भाजपशीही दोन हात करत आहे.'

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल