शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये लपून-छपून भेटणं पडलं महागात, 'त्या' दोघांना गावकऱ्यांनी पाहिलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 12:35 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमध्ये लपून छपून भेटणं एका जोडप्याला चांगलंच महागात पडलं आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी आहे. तरीही गावातील एक तरुण आणि तरुणी भेटत होते.

पाटणा - भारतात सध्याची स्थिती पाहता 17 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 37,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 1100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्यास सांगितलं आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे. लोक विनाकारण लॉकडाऊनमध्येही घराबाहेर पडत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. 

लॉकडाऊनमध्ये लपून छपून भेटणं एका जोडप्याला चांगलंच महागात पडलं आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी आहे. तरीही गावातील एक तरुण आणि तरुणी भेटत होते. गावकऱ्यांना ही गोष्ट समजली. त्यांनी या दोघांना भेटताना पाहिलं आणि थेट त्यांचं एका मंदिरात लग्न लावून दिलं. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत त्यांचं लग्न लावून दिलं. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील बेगुसराय येथे ही घटना घडली आहे. कोठीयारा गावातील ललित कुमार याचे गावातीलच राणी नावाच्या तरुणीवर प्रेम होते. गेल्या एक वर्षांपासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. मात्र लॉकडाऊन दरम्यान देखील हे दोघं भेटत असल्याची माहिती गावकऱ्यांना कळली. 

 

गावकऱ्यांनी एकदा या दोघांना गावामध्येच भेटताना पकडलं. त्यानंतर गावातील प्रमुखांनी पंचायत बोलावून दोघांच्या घरच्यांना लग्नासाठी तयार केलं. गावातील एका शिव मंदिरात ललित आणि राणी यांचे लग्न झाले. यावेळी गावकरी उपस्थित होते. तसेच लग्नात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले होते. दोघेही मास्क लावून बोहल्यावर चढले. दोघांनाही भेटताना गावकऱ्यांनी पाहिलं होतं. त्यानंतर दोघांचे लग्न लावून देण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशातील लॉकडाऊनचा दुसरा टप्पा आज पूर्ण होत असून तिसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. लॉकडाऊनच्या काळात देशातील लोकसंख्येत कसा परिणाम झाला हेही महत्वाचे आहे. यांसंदर्भात सेंटर ऑफ पॉलिसी रिसर्च यांचा एक अहवाल समोर येत आहे. त्यानुसार, शहरातील लोकसंख्या 11 टक्क्यांनी कमी झाली असून गावातील लोकसंख्या 7 टक्क्यांनी वाढली आहे. लॉकाडाऊनमुळे सध्या शहरात कुणीही येत नाही. सीपीआरचे वरिष्ठ विद्यार्थी आणि स्टी के चे सहायक लेखल पार्थ मुखोपाध्याय यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे लाखों लोक आता शहरांकडे येत नाहीत. त्यामुळेच, शहरांजवळी ग्रामीण भागातील लोकसंख्या वाढली आहे. पश्चिमी राजस्थान, ओडिशाजवळ हे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News: कोरोना योद्ध्यांना सलाम; रुग्णालयांवर हवाई दलाकडून पुष्पवर्षाव

गड्या आपला गावच बरा... लॉकडाऊनमुळे गावातील लोकसंख्येत ७ टक्क्यांनी वाढ

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारmarriageलग्न