शहरं
Join us  
Trending Stories
1
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
2
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
3
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
5
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
6
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
7
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
8
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
9
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
10
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
11
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
12
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
13
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
14
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
15
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
16
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
17
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
18
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
19
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
20
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

CoronaVirus News: धक्कादायक; 'या'मुळे दिल्ली-मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाढतायेत करोनाचे रुग्ण, आरोग्यमंत्र्यांनी सांगितले 'हे' कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 16:13 IST

देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 20 टक्के रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 8613 लोक कोरोनाबाधित आहेत. तर 343 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीत आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 4549वर पोहोचला आहे.

ठळक मुद्देदेशाचा विचार करता राजधानी दिल्ली आणि मराराष्ट्राची राजधानी मुंबई येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेतदेशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 20 टक्के रुग्ण एकट्या मुंबईत दिल्लीत आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 4549वर पोहोचला आहे

नवी दिल्ली : कोरोनाने संपूर्ण देशात हात-पाय पसरले आहेत. देशातील काही मोठी शहरंही कोरोनाने आपल्या विळख्यात घेतली आहेत. देशाचा विचार करता, राजधानी दिल्ली आणि मराराष्ट्राची राजधानी मुंबई येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. लॉकडाउन असतानाही येथील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने आणि वेगाने वाढत आहे. यासंदर्भात, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त करत, या मागचे कारणही सांगितले आहे. 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन म्हणाले, दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये लोक लॉकडाउनचे व्यवस्थितपणे पालन करत नाहीत. यामुळेच या शहरांतील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. तसेच देशाच्या ग्रामीण भागातील लोक लॉकडाउनचे चांगल्या प्रकारे पालन करत आहेत.

CoronaVirus, LockdownNews: कोरोनाचा धस्का; 'या' देशातील लोक म्हणतायेत, लॉकडाउन हटवले तरी घराबाहेर पडणार नाही

कोरोनाच्या बाबतीत ग्रामीण भागातील लोक अधिक सतर्क -डॉ. हर्षवर्धन न्यूज18 शी बोलत होते. यावेळी त्यांना विचारण्यात आले, की दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरांमध्येच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण का आहेत? यावर ते म्हणाले, 'मला वाटते, की दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये लोकांकडून लॉकडाउनचे व्यवस्थितपणे पालन केले जात नाही. मात्र, या लॉकडाउनसंदर्भात ग्रामीण भागातील लोक अधिक गंभीर आहे.'

'पदेशातून परतलेले सर्वाधिक लोक दिल्ली आणि मुंबईतच आले आहेत. दिल्ली आणि मुंबईत लोक मोठ्या प्रमाणावर झोपड्यांमध्ये राहतात. यामुळे येथे लॉकडाउनची अंमलबजावणी होणे कठीण आहे,' असेही डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

हुतात्मा मेजर अनुज यांचा 2 वर्षांपूर्वीच झाला होता विवाह, IIT सोडून निवडला होता NDAचा मार्ग

दिल्ली मुंबईत सातत्याने वाढतायेत रुग्ण -देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 20 टक्के रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 8613 लोक कोरोनाबाधित आहेत. तर 343 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीत आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 4549वर पोहोचला आहे. दिल्लीत रविवारी विक्रमी 427 नवे रुग्ण आढळले आहेत. 

रशियानं तयार केला 'महाबॉम्ब', एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं संपूर्ण जग

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रdoctorडॉक्टरCentral Governmentकेंद्र सरकार