शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

Coronavirus: लॉकडाऊनदरम्यान पलायन करणारे ९० टक्के दलित; सरकारकडून दुजाभाव- मायावती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 12:43 IST

देशातील अनेक भागातील लोक पलायन करत आहेत. पलायन करणाऱ्यांमध्ये ९० टक्के लोक हे दलित आणि अतिमागास प्रवर्गातील आहेत, याचा उल्लेखही मायावतींनी केला आहे. 

लखनऊः देशभरात लागू असलेला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याचा मोदी सरकारनं निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल झाले होते. त्याच पार्श्वभूमी बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला आहे. लॉकडाऊनदरम्यान देशभरात दलित आणि मागास वर्गातील लोकांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळेच देशातील अनेक भागातील लोक पलायन करत आहेत. पलायन करणाऱ्यांमध्ये ९० टक्के लोक हे दलित आणि अतिमागास प्रवर्गातील आहेत, याचा उल्लेखही मायावतींनी केला आहे.  डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या १२९व्या जयंतीनिमित्त मायावतींनी उत्तर प्रदेशच्या जनतेला संबोधित केलं. राज्य सरकारांकडून दलित आणि गरिबांची उपेक्षा करण्यात आली आहे. सरकारांनी त्यांच्यासाठी कोणतीही वेगळी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे ते लोक आपापल्या घराकडे पलायन करत आहेत. कोरोनामुळे दलित आणि गरिबांची परिस्थिती हलाखीची झालेली असून, त्याकडे केंद्र सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. आजसुद्धा बदलली नाही जातीयवादाची मानसिकताआजसुद्धा जातीयवादाची मानसिकता पूर्णतः बदललेली नाही. कोरोना व्हायरसची महामारी आपल्या देशात पसरल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर दिल्ली शहर, मध्य प्रदेश, राजस्थान अन्य राज्यांत पोटापाण्यासाठी गेलेले रोजंदारी करणारे मजूर लोक आपापले मालक आणि राज्यांच्या सरकारकडून झालेल्या उपेक्षेनं हवालदिल झालेले आहेत. त्यामुळेच ते आपापल्या घरांकडे पलायन करू लागले आहेत. त्या मजुरांमध्ये दलित, आदिवासी आणि अतिमागास वर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ते आपल्या घराकडे जात असताना राज्य सरकारांनी त्यांच्या जातीकडे पाहून त्यांना सीमेपर्यंतच सोडलं. एवढ्या वाईट परिस्थितीतही राज्य सरकारांनी त्यांना थांबवलं नाही. तसेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा विचारसुद्धा तिथल्या सरकारांनी केलेला नाही. त्यामुळे या मजुरांना अडचणींचा सामना करावा लागला आहे.डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी भारतीय संविधानात दलित आणि मागासांना विशेषाधिकार बहाल केलेले होते. जेणेकरून त्यांचं आयुष्य जगण्याचा दृष्टिकोन बदलून ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. या वर्गासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून मास्टर प्लॉन तयार करण्याची गरज होती. पण तसे काहीही झालेले नाही.  आम आदमी पार्टीवर साधला निशाणाया वर्गांचं सरकार सत्तेत असतं तर परिस्थिती आज वेगळी असती. दिल्लीच्या निवडणुकीतही आपनं या वर्गाला आमिषं दाखवून  त्यांच्याकडून मतं मिळवली आणि त्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडलं. पलायन करत असताना त्यांना थांबवलं नाही, तर सीमेपर्यंत नेऊन सोडल्याचंही मायावती म्हणाल्या आहेत. 

टॅग्स :mayawatiमायावतीcorona virusकोरोना वायरस बातम्या