शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
2
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
3
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'
5
“अरे बापरे! शरद पवारांचे अंतःकरण किती उदार आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मिश्किल टोला
6
Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्याकडे संपत्ती किती? शिक्षण किती घेतलंय? जाणून घ्या...
7
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
8
प्रज्वल रेवण्णा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसआयटी महिलांना वेश्याव्यवसाय प्रकरणात अडकवण्याची धमकी देते? जेडीएसने दावा केला
9
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
10
‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   
11
“PM मोदींमुळे हिरे व्यापाराला चालना, जागतिक बाजारपेठेत भारताचे भवितव्य आशादायी”: पीयूष गोयल
12
'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...'
13
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
14
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
15
Fact Check: लोकसभा निवडणुकीत परदेशातून आलेल्या मुस्लिमांना आर्थिक मदत जाहीर करणारे पत्र बनावट
16
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
17
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा
18
Parshuram Jayanti 2024: परशुरामांना कोकणचा देव का मानतात? आदिलशहाने त्यांचे मंदिर का बांधले? वाचा!
19
Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा!
20
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव

Coronavirus : भीषण वास्तव! लॉकडाऊनमुळे गमावली नोकरी, पदवीधर असूनही तरुणांना करावी लागतेय मजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 9:59 PM

Coronavirus : लॉकडाऊनमुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे बेरोजगारीही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 

बुलंदशहर: कोरोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत चालल्यानं देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे देशातील उद्योगधंदे ठप्प आहेत. सर्वच कामकाज बंद असल्यानं कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा कुठून, असा प्रश्न कंपन्यांना सतावतो आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. उत्तर प्रदेशही अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे बेरोजगारीही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.  लॉकडाऊनमुळे लाखो रुपये खर्च करून बीबीए ते एमए अन् बीएडपर्यंत पदवी घेतलेल्या तरुणांनाही मनरेगामध्ये काम करावं लागतंय. बुलंदशहरच्या जुनेदपूर गावात मनरेगाचे काम सध्या जोरात सुरू आहे. हे काम अशिक्षित असलेल्या कामगारांसाठी आहे, परंतु लॉकडाऊननंतर सतेंद्र कुमार, सुरजित आणि रोशन कुमार हे पदवीधरही नोकरी नसल्यानं या ठिकाणीही मजुरी करत आहेत.सतेंद्र कुमारने सवा लाख खर्च करून बीबीए पदवी मिळविली, तर सुरजित सिंगने शिष्यवृत्तीद्वारे बीएड अभ्यासक्रम पूर्ण केला आणि रोशन कुमार यांनी एमए केले. तसेच वॉशिंग पावडर कंपनीत नोकरीही केली, पण लॉकडाऊनने आता या तिघांना मनरेगाचं काम करण्यास भाग पाडलं आहे. नोकरी गमावल्यानं २०० रुपयांच्या मजुरीवर ते माती उपसण्याचं काम करत आहेत. सतेंद्र कुमार म्हणाला की, माझ्याकडे बीबीए पदवी आहे, पण तरीही मला चांगली नोकरी मिळाली नाही. जिथे मिळाली तिथे फक्त सहा ते सात हजार पगार देत होते. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर ती नोकरीही गमावली. जेव्हा तो इथे आला तेव्हा गावच्या प्रमुखानं मनरेगाच्या कामाला लावले.सुरजित कुमार म्हणाला की, माझ्याकडे एमए, बीएड पदवी आहे. मी नुकताच माझा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. नोकरी मिळण्यापूर्वीच लॉकडाऊन सुरू झालं आणि मग इथे मनरेगाच्या कामात मग्न झालो. रोशनकुमार म्हणाला की मी दोन घनफूट माती उपसण्याचं काम करतो. मला त्यासाठी दोनशे रुपये रोज मिळतो. मी एमए आहे, आधी काम करायचो, चांगले पैसे कमवायचो, लॉकडाऊन सुरू झालं आणि पोटापाण्यासाठी हे काम करावं लागलं. बुलंदशहरच्या जुनैदपूर गावात लॉकडाऊनपूर्वी 20 मजूर काम करायचे, आता ती संख्या 100 कामगारांवर गेली आहे. गाव प्रमुखांच्या मते, या मजुरांमध्ये 20हून अधिक लोक पदवीधारक आहेत. गाव प्रमुख वीरेंद्र सिंह म्हणाले की, ही मुले योग्य बोलत आहेत. लॉकडाऊननंतर त्यांची नोकरी गेली. जर त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं त्यांना मजुरी करावी लागते आहे. सध्या देशभरात 14 कोटी लोकांची जॉब कार्ड बनविली गेली आहेत. या सर्वांना 100 दिवसांची कामे देण्यासाठी 2.8 लाख कोटींची गरज आहे. लॉकडाऊननंतर अनेक लोक बेरोजगार झाले असून, पोटाची  खळगी भरण्यासाठी शिक्षित तरुणांनाही मजुरी करावी लागत असल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे.

हेही वाचा

पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार

...तर भारताला मर्यादित युद्ध लढावेच लागेल, राहुल गांधींनी शेअर केला 'पनाग'चा लेख 

Cyclone Nisarga: रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये तातडीची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

घरकाम करणाऱ्या महिलेमुळे २० जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह; 750 लोक झाले क्वारंटाइन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'या' पावलांनंतर चीन बिथरला; भारताला दिला इशारा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या