Join us  

सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 1:22 PM

सिनेमाचं किती जरी प्रमोशन केलं तरी सिनेमा पाहायला जायचं की नाही हे ट्रेलरवरही अवलंबून असतं.

बॉलिवूडचे दोन दिग्गज अभिनेते सलमान खान (Salman Khan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar)  यांची जादू तशी ओसरलेली दिसत आहे. दोघांचे मागचे काही सिनेमे सलग फ्लॉप झालेत. अक्षय कुमारचा तर फारच वाईट काळ सुरु आहे. त्याचे 6 ते 7 सिनेमे फार चालले नाहीत. तर सलमानचीही स्थिती काही वेगळी नाही. हे असं का होतंय यावर नुकतंच अभिनेता श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade)  प्रतिक्रिया दिली आहे. तसंच सध्या फिल्ममेकर्स आणि स्टार्सला नक्की कशावर भर द्यावा लागेल हेही त्याने सांगितलं. 

श्रेयस तळपदे सध्या 'कर्तम भुगतम' सिनेमामुळे चर्चेत आहे. आजच्या काळात मोठ्या स्टार्सनाही टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस तळपदे म्हणाला, "सिनेमाचं किती जरी प्रमोशन केलं तरी सिनेमा पाहायला जायचं की नाही हे ट्रेलरवरही अवलंबून असतं. सलमान अक्षयचे चित्रपट फारच वाईट परफॉर्म करत आहेत. याचं कारण म्हणजे लोक आता थकले आहेत. ट्रेलरवरुनच ते सिनेमा कसा असेल याचा अंदाज लावत आहेत. सिनेमा पाहायला जायचं की नाही हे ट्रेलरवरुनच ठरवत आहेत."

तो पुढे म्हणाला, "आम्ही कितीही प्रमोशन केलं तरी येणारे प्रेक्षक ट्रेलर पाहूनच येणार आहेत. कधी पाहायचा की रिव्ह्यू वाचून पाहायचा. स्टार असले म्हणून काय झालं त्यांचे सगळेच चित्रपट चालतील असं थोडीच आहे. राजेश खन्ना यांचे सलग काही चित्रपट चालले होते पण एका काळानंतर ते बंद झाले. म्हणजे हे तेव्हापासून सुरु आहे आणि पुढेही असंच सुरु राहील. आपण चांगले सिनेमे बनवत राहायचे हे आपलं कर्तव्य आहे."

श्रेयस तळपदे आगामी 'वेलकम टू जंगल' मध्ये दिसणार आहे. यामध्ये अक्षय कुमारसह मोठी इतरही मोठी स्टारकास्ट असणार आहे. 

टॅग्स :श्रेयस तळपदेसलमान खानअक्षय कुमारसिनेमा