शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन नव्हे तर हा आहे कोरोनाला रोखण्याचा उपाय, राहुल गांधींचा सरकारला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 13:57 IST

कोरोनाला रोखण्यात येत असलेल्या अपयशावरून काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देकोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात आज गंभीर परिस्थिती केवळ लॉकडाऊन हा कोरोनाला रोखण्याचा एकमेव उपाय नाहीकोरोनाला रोखायचे असेल तर कोरोना संशयितांच्या अधिकाधिक चाचण्या घेणे हाच उपाय कोरोनाविरोधात देशवासीयांनी एक होऊन लढले पाहिजे

नवी दिल्ली -  देशात कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत असून, देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 हजारांच्या वर पोहोचली आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यात येत असलेल्या अपयशावरून काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. तसेच कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, केवळ लॉकडाऊन हा कोरोनाला रोखण्याचा उपाय नाही, असे विधान राहुल गांधी यांनी केले आहे. 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशात आलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, 'कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात आज गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र केवळ लॉकडाऊन हा कोरोनाला रोखण्याचा एकमेव उपाय नाही. लॉकडाऊनमुळे कोरोना केवळ थांबून राहील. संपणार नाही. लॉकडाऊन हटवल्यानंतर कोरोना पुन्हा पसरेल. त्यामुळे कोरोनाला रोखायचे असेल तर कोरोना संशयितांच्या अधिकाधिक चाचण्या घेणे हाच उपाय आहे. त्यामुळे सरकारने या चाचण्या घेतल्या पाहिजेत.'

राहुल गांधी पुढे म्हणाले की, 'लॉकडाऊनमुळे देशामध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी देशात अधिकाधिक चाचण्या होणे गरजेचे आहे. पंतप्रधानांनी कोरोनाविरोधातील लढाईत राज्य, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना अधिकचे अधिकार दिले पाहिजेत. कोरोनाविरोधातील लढाई ही वरून खाली नव्हे तर तळापासून वरपर्यंत लढली गेली पाहिजे.'

दरम्यान, कोरोनाविरोधातील लढाई ही दोनप्रकारे लढली गेली पाहिजे, एकीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी पुरेशी साधने उपलब्ध केली गेली पाहिजेत. लॉकडाऊन संपल्यानंतर कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून आधीच खबरदारी घेतली गेली पाहिजे. तसेच आर्थिक आघाडीवरही महत्वाचे निर्णय घेतले गेले पाहिजेत. शेतकरी, कामगार, उद्योगधंदे यांना मदत देण्याबाबत तातडीने निर्णय घेतले पाहिजेत, अशीही मागणी त्यांनी केली. तसेच कोरोनाविरोधात देशवासीयांनी एक होऊन लढले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसIndiaभारत