शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ३ मेनंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, पंतप्रधानांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 06:03 IST

मुख्यमंत्र्यांची मते त्यांनी जाणून घेतली. जनजीवन सुरळीत करण्यासाठी ठोस धोरण आखावे लागेल, त्यासाठी उपाच सुचवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे होणारे आर्थिक नुकसान किती काळ सहन करावे, कोरोनाचा मुकाबला करताना नव्या ठिकाणी संसर्ग पसरू नये यासाठी काय करावे, असा असंख्य मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. कोरोना रुग्णांची वाढ होण्यात दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, पंजाब व मध्य प्रदेश आघाडीवर आहेत. त्यामुळे इथे ३ मेनंतरही लॉकडाउन कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यात फिजिकल डिस्टसिंगचा नियम करून जनजीवन सुरळीत करण्यावर भर दिला. तोच कित्ता ३ मे नंतरही गिरवला जाण्याची दाट शक्यता आहे.व्हिडीओ कॅन्फरसिंगद्वारे पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी सोमवारी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांची मते त्यांनी जाणून घेतली. जनजीवन सुरळीत करण्यासाठी ठोस धोरण आखावे लागेल, त्यासाठी उपाच सुचवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.>सहकार्यामुळे प्रसार रोखू शकलोइतर देशांमध्ये ७-८ आठवड्यात भारतापेक्षा १०० पट रूग्ण वाढले. वेळेत लॉकडाऊन केले व राज्यांनी सहकार्य केल्याने आपण कोरोनाला रोखू शकलो. पण संकट अद्याप टळलेले नाही. पहिल्या व दुसºया टप्प्यातील लॉकडाऊनचा अनुभव गाठीशी घेवूनच आपण पुढचे धोरण ठरवू. मात्र केंद्राने व्यवहार सुरू करण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी राज्यांनी करावी. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवून जनजीवन पूर्ववत करण्याचे आव्हान आहे. कोरोनाचा मुकाबला व आर्थिक आव्हान दोन्हीचा सामना एकाच वेळी करावा लागेल. नव्या भागांमध्ये कोरोना पसरणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल.>‘रेड’ व ‘आॅरेंज’वर विशेष लक्ष द्यागेल्या २८ दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांत नवा रुग्ण आढळला नाही. पण ३ मे नंतरही सूट द्यावी अशी स्थिती नाही. राज्यात रेड, ग्रीन व आॅरेंज झोनवर विशेष लक्ष केंद्रीत करा. संसर्ग रोखणे व ग्रीन झोन सुरक्षित राखण्याचे मोठे आव्हान असेल. ग्रीन झोनमध्ये दैनंदिन व्यवहारांना सूट मिळू शकते पण फिजिकल डिस्टन्सिंगला पर्याय नसेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.>राज्यांनी धोरण ठरवावेरेड, आॅरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे. कोरोनामुळे इतर आजारांमुळे दूर्लक्ष नको.तंत्रज्ञान वापरून आपण जीवन सुरळीत व सोपे करू शकतो, असेही त्यांनी सांगितले. काही मुख्यमंत्र्यांनी आपले मत यावेळी नोंदवले.>पंजाब सरकारने नांदेडच्या गुरुद्वारा लंगर साहिब येथे अडकलेल्या जवळपास साडेतीन हजार भाविकांना स्वगृही आणण्यासाठी ८० बसेस पाठवल्या होत्या़ सोमवारी या गाड्यांमधून भाविक पंजाबला रवाना झाले़ गेल्या दीड महिन्यापासून हे भाविक नांदेडातच अडकले होते़

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस