शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

CoronaVirus : ३ मेनंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, पंतप्रधानांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 06:03 IST

मुख्यमंत्र्यांची मते त्यांनी जाणून घेतली. जनजीवन सुरळीत करण्यासाठी ठोस धोरण आखावे लागेल, त्यासाठी उपाच सुचवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे होणारे आर्थिक नुकसान किती काळ सहन करावे, कोरोनाचा मुकाबला करताना नव्या ठिकाणी संसर्ग पसरू नये यासाठी काय करावे, असा असंख्य मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. कोरोना रुग्णांची वाढ होण्यात दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, पंजाब व मध्य प्रदेश आघाडीवर आहेत. त्यामुळे इथे ३ मेनंतरही लॉकडाउन कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यात फिजिकल डिस्टसिंगचा नियम करून जनजीवन सुरळीत करण्यावर भर दिला. तोच कित्ता ३ मे नंतरही गिरवला जाण्याची दाट शक्यता आहे.व्हिडीओ कॅन्फरसिंगद्वारे पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी सोमवारी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांची मते त्यांनी जाणून घेतली. जनजीवन सुरळीत करण्यासाठी ठोस धोरण आखावे लागेल, त्यासाठी उपाच सुचवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.>सहकार्यामुळे प्रसार रोखू शकलोइतर देशांमध्ये ७-८ आठवड्यात भारतापेक्षा १०० पट रूग्ण वाढले. वेळेत लॉकडाऊन केले व राज्यांनी सहकार्य केल्याने आपण कोरोनाला रोखू शकलो. पण संकट अद्याप टळलेले नाही. पहिल्या व दुसºया टप्प्यातील लॉकडाऊनचा अनुभव गाठीशी घेवूनच आपण पुढचे धोरण ठरवू. मात्र केंद्राने व्यवहार सुरू करण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी राज्यांनी करावी. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवून जनजीवन पूर्ववत करण्याचे आव्हान आहे. कोरोनाचा मुकाबला व आर्थिक आव्हान दोन्हीचा सामना एकाच वेळी करावा लागेल. नव्या भागांमध्ये कोरोना पसरणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल.>‘रेड’ व ‘आॅरेंज’वर विशेष लक्ष द्यागेल्या २८ दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांत नवा रुग्ण आढळला नाही. पण ३ मे नंतरही सूट द्यावी अशी स्थिती नाही. राज्यात रेड, ग्रीन व आॅरेंज झोनवर विशेष लक्ष केंद्रीत करा. संसर्ग रोखणे व ग्रीन झोन सुरक्षित राखण्याचे मोठे आव्हान असेल. ग्रीन झोनमध्ये दैनंदिन व्यवहारांना सूट मिळू शकते पण फिजिकल डिस्टन्सिंगला पर्याय नसेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.>राज्यांनी धोरण ठरवावेरेड, आॅरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे. कोरोनामुळे इतर आजारांमुळे दूर्लक्ष नको.तंत्रज्ञान वापरून आपण जीवन सुरळीत व सोपे करू शकतो, असेही त्यांनी सांगितले. काही मुख्यमंत्र्यांनी आपले मत यावेळी नोंदवले.>पंजाब सरकारने नांदेडच्या गुरुद्वारा लंगर साहिब येथे अडकलेल्या जवळपास साडेतीन हजार भाविकांना स्वगृही आणण्यासाठी ८० बसेस पाठवल्या होत्या़ सोमवारी या गाड्यांमधून भाविक पंजाबला रवाना झाले़ गेल्या दीड महिन्यापासून हे भाविक नांदेडातच अडकले होते़

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस