शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

CoronaVirus : ३ मेनंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, पंतप्रधानांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 06:03 IST

मुख्यमंत्र्यांची मते त्यांनी जाणून घेतली. जनजीवन सुरळीत करण्यासाठी ठोस धोरण आखावे लागेल, त्यासाठी उपाच सुचवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे होणारे आर्थिक नुकसान किती काळ सहन करावे, कोरोनाचा मुकाबला करताना नव्या ठिकाणी संसर्ग पसरू नये यासाठी काय करावे, असा असंख्य मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. कोरोना रुग्णांची वाढ होण्यात दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, पंजाब व मध्य प्रदेश आघाडीवर आहेत. त्यामुळे इथे ३ मेनंतरही लॉकडाउन कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यात फिजिकल डिस्टसिंगचा नियम करून जनजीवन सुरळीत करण्यावर भर दिला. तोच कित्ता ३ मे नंतरही गिरवला जाण्याची दाट शक्यता आहे.व्हिडीओ कॅन्फरसिंगद्वारे पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी सोमवारी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांची मते त्यांनी जाणून घेतली. जनजीवन सुरळीत करण्यासाठी ठोस धोरण आखावे लागेल, त्यासाठी उपाच सुचवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.>सहकार्यामुळे प्रसार रोखू शकलोइतर देशांमध्ये ७-८ आठवड्यात भारतापेक्षा १०० पट रूग्ण वाढले. वेळेत लॉकडाऊन केले व राज्यांनी सहकार्य केल्याने आपण कोरोनाला रोखू शकलो. पण संकट अद्याप टळलेले नाही. पहिल्या व दुसºया टप्प्यातील लॉकडाऊनचा अनुभव गाठीशी घेवूनच आपण पुढचे धोरण ठरवू. मात्र केंद्राने व्यवहार सुरू करण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी राज्यांनी करावी. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवून जनजीवन पूर्ववत करण्याचे आव्हान आहे. कोरोनाचा मुकाबला व आर्थिक आव्हान दोन्हीचा सामना एकाच वेळी करावा लागेल. नव्या भागांमध्ये कोरोना पसरणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल.>‘रेड’ व ‘आॅरेंज’वर विशेष लक्ष द्यागेल्या २८ दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांत नवा रुग्ण आढळला नाही. पण ३ मे नंतरही सूट द्यावी अशी स्थिती नाही. राज्यात रेड, ग्रीन व आॅरेंज झोनवर विशेष लक्ष केंद्रीत करा. संसर्ग रोखणे व ग्रीन झोन सुरक्षित राखण्याचे मोठे आव्हान असेल. ग्रीन झोनमध्ये दैनंदिन व्यवहारांना सूट मिळू शकते पण फिजिकल डिस्टन्सिंगला पर्याय नसेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.>राज्यांनी धोरण ठरवावेरेड, आॅरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे. कोरोनामुळे इतर आजारांमुळे दूर्लक्ष नको.तंत्रज्ञान वापरून आपण जीवन सुरळीत व सोपे करू शकतो, असेही त्यांनी सांगितले. काही मुख्यमंत्र्यांनी आपले मत यावेळी नोंदवले.>पंजाब सरकारने नांदेडच्या गुरुद्वारा लंगर साहिब येथे अडकलेल्या जवळपास साडेतीन हजार भाविकांना स्वगृही आणण्यासाठी ८० बसेस पाठवल्या होत्या़ सोमवारी या गाड्यांमधून भाविक पंजाबला रवाना झाले़ गेल्या दीड महिन्यापासून हे भाविक नांदेडातच अडकले होते़

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस