शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

CoronaVirus Live Updates : अरे देवा! कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी चक्क रुग्णालयातून चोरले ऑक्सिजन सिलिंडर; घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 11:52 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : ऑक्सिजन नसेल तर उपचार कसे होणार? असा सवाल करत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी डॉक्टर प्रशासनाकडे करीत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

नवी दिल्ली - भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,56,16,130 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. याच दरम्यान अनेक रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. रुग्णालयातील डॉक्टर हतबल झाले असून डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. ऑक्सिजन नसेल तर उपचार कसे होणार? असा सवाल करत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी डॉक्टर प्रशासनाकडे करीत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

कोरोनामुळ अनेक राज्यात भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून रुग्णांच्या नातेवाईकांवर चक्क आता ऑक्सिजन सिलिंडर चोरण्याची वेळ आली आहे. मध्य प्रदेशच्या दमोहमध्ये ही घटना घडली आहे. नातेवाईक ऑक्सिजन सिलिंडर चोरून घेऊन जात असल्याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ऑक्सिजन सिलिंडरने भरलेली एक गाडी रुग्णालयाजवळ आली होती. त्याचवेळी रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी एक-एक करून सिलिंडर चोरून नेला. 

डॉक्टर्स आणि रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांना थांबवण्याचा प्रय़त्न केला मात्र ते काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हते. रुग्णालयात रुग्णांची परिस्थिती गंभीर असताना नातेवाईक मात्र सिलिंडर घेऊन पळ काढत होते. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी मेडिकल स्टाफ, इतर कर्मचारी आणि डॉक्टर यांच्याबरोबर गैरवर्तन देखील केले. परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन आणि सीएमएचओ घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तसेच अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

मोठा दिलासा! दररोज 700 टन ऑक्सिजनचा पुरवठा करतेय Reliance; तब्बल 70 हजार रुग्णांचा वाचणार जीव

कोरोनाच्या संकटात रिलायन्सने मोठा दिलासा दिला आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना रिलायन्स राज्यांना दररोज तब्बल 700 टन ऑक्सिजनचा पुरवठा करत आहे. यामुळे 70 हजार रुग्णांचा जीव वाचणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडे (Reliance Industries) आपल्या जामनगर ऑईल रिफायनरीमध्ये दररोज 700 टनांहून अधिक मेडिकल-ग्रेड ऑक्सिजन (Medical Oxygen) तयार करत आहे. कोरोनाच्या संकटात काही राज्यांना हे ऑक्सिजन विनाशुल्क दिले जात आहे. कोरोनामुळे देशात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा वापर लक्षात घेता रिलायन्सने अधिक ऑक्सिजन तयार करण्याचा निर्णय घेतला. गुजरातमधील कंपनीच्या जामनगर रिफायनरीने सुरुवातीला 100 टन वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजनचे उत्पादन केले, जे आता त्वरित 700 टन करण्यात आले. कोरोनाचा सामना करत असलेल्या गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यात पुरविल्या जाणाऱ्या पुरवठ्यामुळे दररोज 70,000 हून अधिक गंभीर रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच कंपनीची वैद्यकीय ग्रेड ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढवून 1000 टन करण्याची योजना आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतMadhya Pradeshमध्य प्रदेश