शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

CoronaVirus Live Updates : कोरोना हरणार, देश जिंकणार! गेल्या 24 तासांत 50,407 नवे रुग्ण, 804 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 10:16 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,10,443 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 40 कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. 

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 50,407 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (12 फेब्रुवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 50,407 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रिकव्हरी रेट हा 97.37 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,10,443 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने आता कोरोनाच्या संकटात एक धोक्याचा इशारा दिला आहे. अल्फा, बीटा, गामा, डेल्टा, ओमायक्रॉननंतर आता कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट हा अधिक संसर्गजन्य असू शकतो असं म्हटलं आहे. डब्ल्यूएचओच्या डॉ. मारिया वान केरखोव यांनी कोरोना अद्याप गेलेला नाही. त्याचा नवीन व्हेरिएंट आणखी संसर्गजन्य असेल, कारण तो इतर व्हेरिएंटना मागे टाकेल. हा सौम्य आणि गंभीर दोन्ही असू शकतो आणि आपली प्रतिकारशक्ती कमी करू शकतो असं म्हटलं आहे. कोणत्याही व्हायरसमध्ये कालांतराने बदल होतात, ज्यामुळे तो निसर्गात टिकून राहू शकतो. बहुतेक व्हायरस त्यांच्या गुणधर्मांमध्ये फारसा बदल करत नाहीत, परंतु काही व्हायरस आहेत ज्यात लस आणि उपचारांशी लढा दिल्याने ते बदलतात.

आतापर्यंत 5 व्हेरिएंट्स आहे. यामध्ये अल्फा, बीटा, गामा, डेल्टा आणि ओमायक्रॉन VoC घोषित केले गेले आहेत. ते माणसांमध्ये त्यांच्या वेगाने प्रसारासाठी, त्यांना गंभीरपणे संक्रमित करण्यासाठी आणि त्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत. अल्फा व्हेरिएंट (B.1.1.7) सर्वप्रथम सप्टेंबर 2020 मध्ये ब्रिटनमध्ये आढळून आला. बीटा व्हेरिएंट (B.1.351) प्रथम दक्षिण आफ्रिकेने मे 2020 मध्ये शोधला होता. गामा व्हेरिएंट (P.1) नोव्हेंबर 2020 मध्ये ब्राझीलमध्ये आढळला. नेचर जर्नलमधील अहवालानुसार, या तिन्ही व्हेरिएंटमध्ये काही म्य़ूटेशन समान आहेत. ते खराब प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना लक्ष्य करतात आणि त्यांचा संसर्ग काही महिने टिकू शकतो. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लस