शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 19,968 नवे रुग्ण; 673 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 10:26 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. 

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. 

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 19 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (20 फेब्रुवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 19,968 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशात आतापर्यंत 5,11,903 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट देखील चांगला आहे. 4,20,86,383 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 

"देशातील कोरोना मृतांची संख्या 37 लाखांवर पोहोचू शकते कारण..."

कोरोनाच्या संकटात धक्कादायक माहिती मिळत आहे. "देशातील कोरोना मृतांचा आकडा 37 लाखांवर पोहोचू शकतो. जाहीर झालेल्या मृत्यूची अधिकृत आकडेवारी वास्तविक आकडेवारीपेक्षा 7 पट जास्त असू शकते." पॅरिस विद्यापीठातील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात हा मोठा दावा केला आहे. संशोधक आणि लोकसंख्या तज्ज्ञ क्रिस्टोफ गुईलमोटा यांनी महामारीमध्ये मृत्यूची संख्या भयावह पातळीपर्यंत जाऊ शकते असं म्हटलं आहे. मार्च 2020 पासून जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, 510,000 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. संशोधकांनी गणितीय मॉडेलच्या आधारे हे संशोधन केले आहे.

पॅरिस विद्यापीठातील संशोधकांनी केरळमध्ये कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येचे विश्लेषण केले. वय, लिंग आणि मृत्यूची तारीख या आधारे मृत्यूचे कारण समजले. या आधारे देशातील 27 राज्यांची आकडेवारी समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागात श्रीमंत लोक राहत होते, अशा भागात हे संशोधन करण्यात आले आहे. येथील डेटा आणि परिस्थितीचे गणितीय मॉडेल्सच्या आधारे विश्लेषण करण्यात आले. डेलीमेलच्या रिपोर्टनुसार रुग्णांच्या चाचणीच्या अभावामुळे भारतात मृत्यूची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असू शकते. द इकॉनॉमिस्टच्या वृत्तानुसार, कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या कमी लेखण्यात आली आहे. प्रत्यक्षात, ही आकडेवारी वास्तविक गणनेपेक्षा 6 पट जास्त असू शकते. ऑक्सिजनची कमतरता आणि संथ लसीकरण हे मृत्यूचे कारण असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. लसीकरणाच्या डोसची ऑर्डर देण्यास होणारा विलंब हे देखील यामागे कारण आहे. त्यामुळे लोकांपर्यंत लसीचा डोस उशिरा पोहोचला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत