शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

CoronaVirus Live Updates : ...अन् हसतं-खेळतं घर झालं उद्ध्वस्त! कोरोनामुळे एकाच कुटुंबातील 20 जणांचा मृत्यू; मन सुन्न करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 15:10 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना मृतांच्या संख्येने प्रशासनाची चिंतेत भर टाकली आहे. याच दरम्यान एकाच कुटुंबातील 20 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. 

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 3,08,74,376 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 37,154 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 724 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,08,764 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. मात्र काही राज्यांत कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना मृतांच्या संख्येने प्रशासनाची चिंतेत भर टाकली आहे. याच दरम्यान एकाच कुटुंबातील 20 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. 

उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असतानाच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना रुग्ण आढळून आलेल्या परिसरात ट्रेसिंग आणि टेस्टिंग वेगाने केले जावेत जेणेकरून बाधित लोकांचा शोध घेणं सोपं होईल यासाठी निर्देश दिले आहेत. कोरोनामुळे 20 जणांचा मृत्यू झाला असून ते एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 24 तासांत उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचे 125 नवे रुग्ण आढळून आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

देशात कोरोना लसीकरण वेगाने सुरू असून लाखो लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे, याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. आरोग्य विभागाचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार या घटनेवरुन उघड झाला आहे. एका महिलेला कोरोना (Corona Vaccination) लसीचा पहिला डोस कोवॅक्सिनचा देण्यात आला होता. झारखंडची राजधानी रांचीमध्ये रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार या घटनेवरुन उघड झाला आहे. एका महिलेला कोरोना (Corona Vaccination) लसीचा पहिला डोस कोवॅक्सिनचा देण्यात आला होता. या घटनेनंतर महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही घटना रांचीच्या सदर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बरियातू रोड (Bariatu Road) येथे घडली आहे.

आरोग्य विभागाचा मोठा निष्काळजीपणा! दुसरा डोस घेणाऱ्या महिलेला Covaxin ऐवजी दिला Covishield चा डोस अन्...

रांचीमधील शिवाजी नगर येथे राहणाऱ्या शीला देवी या लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी रांचीच्या बरियातू रोड येथील एडवान्स डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गेल्या. मात्र रुग्णालय व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे या महिलेला कोवॅक्सिनऐवजी कोविशिल्डची लस दिली गेली. कोविशिल्डची लस घेतल्यानंतर लगेचच त्या महिलेची प्रकृती ढासळली आणि त्यानंतर महिलेस एडवान्स डायग्नोस्टिक सेंटरने रांचीच्या मेडिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महिलेचा मुलगा चंदन याने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, "कोरोनाची लस घेतल्यानंतर आईला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली." यानंतर महिलेच्या कुटुंबियांनी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एकच गोंधळ घातला. कुटुंबियांनी घातलेल्या गोंधळाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पीसीआर 9 च्या पोलिसांनी महिलेच्या कुटुंबियांना शांत करत परिस्थिती हाताळली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ