शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

CoronaVirus Live Updates : धोका कायम! कोरोनाचा वेग मंदावताना देशातील 'या' 6 राज्यांनी वाढवलं टेन्शन; तज्ज्ञांची टीम रवाना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 18:48 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. मात्र कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 3,04,58,251 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 46,617 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 853 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,00,312 लोकांना जीव गमवावा लागला आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून विविध उपाय केले जात आहेत. देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. मात्र कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील सहा राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सहा राज्यांमध्ये तज्ज्ञांच्या विशेष टीम रवाना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं आणि उपाययोजनांसाठी या टीम पाठवण्यात आल्या आहेत. केरळ, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर, ओडिशा, आणि छत्तीसगडचा यात समावेश आहे. विशेष टीम राज्यांमध्ये कोरोना व्यवस्थापन, देखरेख, कंटेन्मेंटची प्रक्रिया आणि टेस्टिंग सारख्या बाबी पाहणार आहे. केंद्रीय टीम या राज्यांमधील कोविड स्थितीचे मूल्यांकन करतील आणि आवश्यक उपयायोजना सुचवतील, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

मणिपूरच्या टीमचे नेतृत्व ईएमआरचे अतिरिक्त डीडीजी आणि संचालक डॉ. एल. स्वस्तीचरण, अरुणाचल प्रदेशच्या टीमचे एआयआयएच अँड पीएचचे प्राध्यापक डॉ. संजय साधुखान, केरळच्या टीमचे सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. रुची जैन, ओडिशाच्या टीमचे एआयआयएचचे सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आणि छत्तीसगडच्या टीमचे नेतृत्व हे एम्स रायपूरचे सहायक प्राध्यापक डॉ. दिबाकर साहू करतील अशी माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी हे अहोरात्र काम करत आहेत. आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून ते रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र याच दरम्यान कोरोना वॉरिअर्सनाच कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

परिस्थिती गंभीर! अहोरात्र केली रुग्णांची सेवा पण...; कोरोनामुळे तब्बल 1500 डॉक्टर्सना गमवावा लागला जीव

कोरोनाच्या संकटात आतापर्यंत तब्बल 1500 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तब्बल 800 डॉक्टर्सचा बळी घेतला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association -IMA) दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे 800 डॉक्टर्सचा मृत्यू झाला आहे. बिहार आणि दिल्लीतील सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर यातील अनेक डॉक्टरांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले होते. तर काहींनी एक डोस घेतला होता. कोरोनाच्या संकटात अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आयएमएचे डॉ. जयेश लेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्या राज्यात कोरोनामुळे किती डॉक्टरांचा मृत्यू झाला यावर रिसर्च सुरू आहे. तसेच यातील किती डॉक्टरांचं लसीकरण झालं होतं याचीची माहिती घेण्यात येत आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या डॉक्टरांमध्ये तरुण आणि वृद्ध डॉक्टरांचाही समावेश आहे. मात्र तरुण डॉक्टरांच्या मृत्यूचे प्रमाण हे अधिक आहे. रुग्णांवर उपचार करतानाच डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतKeralaकेरळChhattisgarhछत्तीसगडOdishaओदिशाTripuraत्रिपुराArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश