शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: वृत्तपत्र वितरणात अडथळा आणणं कायदेशीर गुन्हा; देशातील ज्येष्ठ वकिलांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 13:43 IST

विशेषत: या युद्धासारख्या परिस्थितीत वर्तमानपत्रे ही एक जीवनावश्यक वस्तू आहे.

ठळक मुद्देअत्यावश्यक सेवांच्या तरतूदीस अडथळा आणल्या प्रकरणी दंडनीय गुन्हा मानला जाईलयोग्य स्वच्छता आणि सुरक्षा बाळगून होते वृत्तपत्राची छपाई कठीण प्रसंगात वृत्तपत्र ही जीवनावश्यक वस्तू आहे

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांमध्ये एक दहशत पसरली आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभावाने जगातील १० लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ५० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कोरोनाबाबत विविध अफवा पसरत असल्याचं दिसून आलं. या वृत्तपत्रामुळे कोरोना पसरतो अशीही अफवा पसरवण्यात आली.

मात्र देशातील प्रसिद्ध वकिलांनी वृत्तपत्रांच्या वितरणामध्ये होणाऱ्या अडचणींबाबत चिंता व्यक्त केली आहे. वृत्तपत्र हे अत्यावश्यक सेवांमध्ये येते. अशा आरोग्य आणबाणीच्या परिस्थितीत लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती उपलब्ध करुन देणे वृत्तपत्रांची जबाबदारी असते. त्यात वृत्तपत्राच्या वितरणात अडथळा निर्माण होत असेल तर अत्यावश्यक सेवा देखभाल अधिनियम (ESMA) अंतर्गत गुन्हा नोंद होऊ शकतो.

याबाबत कुलभूषण जाधव प्रकरणात भारताची बाजू मांडणारे प्रख्यात वकील हरीश साळवे यांनी वृत्तपत्रांच्या  वितरणामध्ये येणाऱ्या गंभीर चिंता व्यक्त केली. सोशल मीडियाच्या या जगात जेथे गॉसिप आणि अजेंडा बनवून बातमी पसरवली जाते. त्याठिकाणी वृत्तपत्रावरावर योग्य माहिती देण्याची जबाबदारी मोठी असते. या कठीण काळात जबाबदार पत्रकारांच्या बातम्या कोणत्याही प्रकारची भीती निर्माण न करता वृत्त देणं आवश्यक असते असं ते म्हणाले.

विशेषत: या युद्धासारख्या परिस्थितीत वर्तमानपत्रे ही एक जीवनावश्यक वस्तू आहे. ज्याच्यामुळे आपल्याला अज्ञात शत्रूबद्दल, जिच्याबद्दल आपल्याकडे फारच कमी माहिती आहे. त्याबद्दल लोकांमध्ये माहिती देणे आणि जागरुकता निर्माण करणे हे एकमेव शस्त्र आहे. त्यामुळे लॉकडाऊन दरम्यान वृत्तपत्र घरात पोहचणे गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले. तसेच सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, वर्तमानपत्र वितरणावर कोणतेही बंधन नाही. आवश्यक सेवांमध्ये त्याचा समावेश आहे. म्हणून कोणीही वर्तमानपत्र वितरणास अडथळा आणू नये असं आवाहन त्यांनी केलं.

ज्येष्ठ वकील मनिंदर सिंह म्हणाले की, वृत्तपत्र प्रसारित करणे ही माहिती प्रसाराचा अविभाज्य आणि आवश्यक घटक आहे. घटनेच्या अनुच्छेद १९ (१) (A) आणि १९(१) (G) या कलमाअंतर्गत वृत्तपत्रांना स्वातंत्र्य आहे. माहितीचा प्रसार करण्यासाठी वृत्तपत्र प्रसारित केलं जातं. गोदामांमध्ये ठेवण्यासाठी वृत्तपत्र प्रसिद्ध केले जात नाही असंही त्यांनी बजावलं. याबाबत अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, प्रिंट वृत्तपत्राची हार्ड कॉपी मिळणे या लोकांना मिळणं हा मूलभूत अधिकार आहे, चहाच्या कपासोबत वृत्तपत्र वाचणं ही सवय आहे. या कठीण प्रसंगी प्रिंटर व पुरवठादारांच्या योग्य स्वच्छता आणि सुरक्षा घेतली आहे. त्यामुळे वृत्तपत्रांचे वितरण सुलभ व्हावं असं माझं स्पष्ट मत आहे असं सिंघवी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करताना अत्यावश्यक सेवांमध्ये छापील आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा समावेश केला, ज्यामुळे वर्तमानपत्रांना इतर अडचणी येऊ नयेत. अत्यावश्यक सेवा कायद्यातंर्गत संरक्षण वाढवून सर्वसामान्यांपर्यंत वृत्तपत्रांचे अखंड वितरण सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जर वृत्तपत्र वितरीत होत नसतील तर अत्यावश्यक सेवांच्या तरतूदीस अडथळा आणल्या प्रकरणी दंडनीय गुन्हा मानला जाईल. एकदा एखादी वस्तू ईएसएमए अंतर्गत समाविष्ट झाल्यावर लॉकडाऊन कालावधी दरम्यान वर्तमानपत्रांप्रमाणेच त्याच्या वितरणास अडथळा निर्माण करणाऱ्यांवर ईएसएमए कायदा १९८१ च्या कलम ५ आणि ६ अंतर्गत कारवाई होऊ शकते. ज्यांनी वितरणात व्यत्यय आणला आहे अशांना वॉरंटशिवाय अटक केली जाऊ शकते आणि एक वर्षाची शिक्षा होऊ शकते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याadvocateवकिल