शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

coronavirus: कर्नाटक राज्य कोरोनाच्या लढाईतही दहावी पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 06:52 IST

कर्नाटक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दरवर्षी बारावीची परीक्षा ४ मार्च, तर दहावीची परीक्षा २६ मार्चला सुरू करण्यात येते. बारावीची इंग्रजी वगळता सर्व विषयांची परीक्षा पूर्ण झाली आणि लॉकडाऊन जाहीर झाला.

साडेआठ लाख विद्यार्थी, हवे तेथे परीक्षा, सर्वांसाठी मोफत एसटीची सोय, शिक्षण विभागाकडून पुरेपूर खबरदारी- वसंत भोसलेकोल्हापूर : गेली अनेक दशके वेळेवर परीक्षा घेणाऱ्या कर्नाटक राज्याला कोरोनाशी लढताना दहावीच्या परीक्षेची फेरआखणी करावी लागली आणि अशाही परिस्थितीत परीक्षा घेऊन एका महिन्यात निकाल जाहीर केला. नापास विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेचे अर्ज दाखल करून घेऊन १५ सप्टेंबरच्या पुरवणी परीक्षेची तयारीदेखील पूर्ण झाली आहे.कर्नाटक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दरवर्षी बारावीची परीक्षा ४ मार्च, तर दहावीची परीक्षा २६ मार्चला सुरू करण्यात येते. बारावीची इंग्रजी वगळता सर्व विषयांची परीक्षा पूर्ण झाली आणि लॉकडाऊन जाहीर झाला. परिणामी इंग्रजीचा पेपर १९ जुलैला होऊन निकालही जाहीर करण्यात आला. दहावीच्या परीक्षेचे फेरवेळापत्रक जाहीर करण्यात आले. दक्षिणेतील तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूने अद्याप परीक्षा घेतलेल्या नाहीत. केरळने २६ ते ३१ मे दरम्यान परीक्षा घेऊन निकाल जाहीर केला.कर्नाटकाने दहावीच्या परीक्षेची जंगी तयारी केली. परीक्षा केंद्रे वाढविली. प्रत्येक मुला-मुलींस जवळच्या कोणत्याही परीक्षा केंद्रावर परीक्षा देता येईल, असे जाहीर केले. एका वर्गात केवळ २४ विद्यार्थी बसवून शारीरिक अंतराचा नियम पाळण्यात आला. परीक्षेला किमान दोन तास आधी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. सर्वांचे तापमान पाहणे, सॅनिटायझेशन करणे, मास्क नसेल तर देणे, आदी सर्व व्यवस्था करण्यात आली होती. आजाराची लक्षणे आढळून आल्यास स्वतंत्र खोलीत बैठक व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे दहावीच्या परीक्षेला बसणाºया प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक प्रवास करण्यासाठी राज्यभर मोफत बससेवा उपलब्ध करून दिली होती.प्रत्येक गावातील मुला-मुलींना परीक्षा केंद्राची निवड करायला सांगितले. आॅनलाईनवर वेळापत्रक देण्यात आले. परीक्षा केंद्र, नाव आणि नंबर मोबाईल तसेच अ‍ॅपवर कळविण्यात आले. प्रवासाची गरज असल्याची माहिती जमा करून त्या त्या ठिकाणी बस पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली.शिक्षण खात्याशिवाय पोलीस कर्मचारी, आरोग्य खात्याचे कर्मचारी, स्काऊट तसेच होमगार्डस्, आदींची मदत घेण्यात आली. प्रत्येक मुलाची तपासणी करूनच परीक्षा केंद्रात सोडण्यात आले. हसन जिल्ह्यातील अलकेरी गावच्या एका परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला अन्यथा संपूर्ण राज्यात परीक्षा सुरळीत पार पडली. २५ जून ते ४ जुलैअखेर परीक्षा पार पडली आणि १० आॅगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रात परीक्षा घेण्यास विरोध केला जात असतानाच आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्याने मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या जोराच्या संक्रमण काळातच पूर्ण खबरदारी घेत परीक्षा पार पाडली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकEducationशिक्षणexamपरीक्षा