शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कर्नाटक राज्य कोरोनाच्या लढाईतही दहावी पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 06:52 IST

कर्नाटक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दरवर्षी बारावीची परीक्षा ४ मार्च, तर दहावीची परीक्षा २६ मार्चला सुरू करण्यात येते. बारावीची इंग्रजी वगळता सर्व विषयांची परीक्षा पूर्ण झाली आणि लॉकडाऊन जाहीर झाला.

साडेआठ लाख विद्यार्थी, हवे तेथे परीक्षा, सर्वांसाठी मोफत एसटीची सोय, शिक्षण विभागाकडून पुरेपूर खबरदारी- वसंत भोसलेकोल्हापूर : गेली अनेक दशके वेळेवर परीक्षा घेणाऱ्या कर्नाटक राज्याला कोरोनाशी लढताना दहावीच्या परीक्षेची फेरआखणी करावी लागली आणि अशाही परिस्थितीत परीक्षा घेऊन एका महिन्यात निकाल जाहीर केला. नापास विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेचे अर्ज दाखल करून घेऊन १५ सप्टेंबरच्या पुरवणी परीक्षेची तयारीदेखील पूर्ण झाली आहे.कर्नाटक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दरवर्षी बारावीची परीक्षा ४ मार्च, तर दहावीची परीक्षा २६ मार्चला सुरू करण्यात येते. बारावीची इंग्रजी वगळता सर्व विषयांची परीक्षा पूर्ण झाली आणि लॉकडाऊन जाहीर झाला. परिणामी इंग्रजीचा पेपर १९ जुलैला होऊन निकालही जाहीर करण्यात आला. दहावीच्या परीक्षेचे फेरवेळापत्रक जाहीर करण्यात आले. दक्षिणेतील तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूने अद्याप परीक्षा घेतलेल्या नाहीत. केरळने २६ ते ३१ मे दरम्यान परीक्षा घेऊन निकाल जाहीर केला.कर्नाटकाने दहावीच्या परीक्षेची जंगी तयारी केली. परीक्षा केंद्रे वाढविली. प्रत्येक मुला-मुलींस जवळच्या कोणत्याही परीक्षा केंद्रावर परीक्षा देता येईल, असे जाहीर केले. एका वर्गात केवळ २४ विद्यार्थी बसवून शारीरिक अंतराचा नियम पाळण्यात आला. परीक्षेला किमान दोन तास आधी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. सर्वांचे तापमान पाहणे, सॅनिटायझेशन करणे, मास्क नसेल तर देणे, आदी सर्व व्यवस्था करण्यात आली होती. आजाराची लक्षणे आढळून आल्यास स्वतंत्र खोलीत बैठक व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे दहावीच्या परीक्षेला बसणाºया प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक प्रवास करण्यासाठी राज्यभर मोफत बससेवा उपलब्ध करून दिली होती.प्रत्येक गावातील मुला-मुलींना परीक्षा केंद्राची निवड करायला सांगितले. आॅनलाईनवर वेळापत्रक देण्यात आले. परीक्षा केंद्र, नाव आणि नंबर मोबाईल तसेच अ‍ॅपवर कळविण्यात आले. प्रवासाची गरज असल्याची माहिती जमा करून त्या त्या ठिकाणी बस पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली.शिक्षण खात्याशिवाय पोलीस कर्मचारी, आरोग्य खात्याचे कर्मचारी, स्काऊट तसेच होमगार्डस्, आदींची मदत घेण्यात आली. प्रत्येक मुलाची तपासणी करूनच परीक्षा केंद्रात सोडण्यात आले. हसन जिल्ह्यातील अलकेरी गावच्या एका परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला अन्यथा संपूर्ण राज्यात परीक्षा सुरळीत पार पडली. २५ जून ते ४ जुलैअखेर परीक्षा पार पडली आणि १० आॅगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रात परीक्षा घेण्यास विरोध केला जात असतानाच आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्याने मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या जोराच्या संक्रमण काळातच पूर्ण खबरदारी घेत परीक्षा पार पाडली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकEducationशिक्षणexamपरीक्षा