शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
3
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
4
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
5
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
6
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
7
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
8
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
9
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
10
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
11
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
12
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
13
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
14
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
15
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
16
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
17
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
18
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
19
"गेल्या कुंभमेळ्यात पालकमंत्री, यावेळी नाही; पण पुढे बघू...'; गिरीश महाजनांनी मनातील इच्छा केली व्यक्त
20
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा

CoronaVirus : भारतातल्या छोट्या व्यावसायिकांचा चीनकडून सामान न मागवण्याचा निर्धार; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 21:46 IST

चीनच्या संशयास्पद भूमिकेच्या पार्श्वभूमीवर भारतातल्या छोट्या व्यावसायिकांनी चीनकडून सामान न मागवण्याचं ठरवलं आहे.

नवी दिल्लीः कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णसंख्यासुद्धा नियंत्रणात आणणं अनेक देशांना कठीण जात आहे. कोरोनाचं केंद्रबिंदू वुहान शहर असल्यानं चीनबद्दल अनेक देशांमध्ये नाराजी आहे. चीनकडूनहीभारतातल्या महत्त्वाच्या कंपन्यांची मालकी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला मोदी सरकारनंही वेळीच वेसण घातलेलं आहे. आता चीनच्या संशयास्पद भूमिकेच्या पार्श्वभूमीवर भारतातल्या छोट्या व्यावसायिकांनी चीनकडून सामान न मागवण्याचं ठरवलं आहे. छोटे व्यावसायिक आता चीनकडून थेट मशीन आणि तंत्रज्ञान आयात करण्याच्या तयारीत आहेत.छोट्या व्यावसायिक आणि उद्योगपतींनी पुढील एक वर्षासाठी चीनकडून वस्तू मागवण्यास नकार दिला आहे. चीनच्या विरोधात तयार झालेल्या वातावरणात सामान्य ग्राहक चिनी वस्तू नाकारू शकतात ही भीती त्या व्यावसायिकांना सतावते आहे. त्यामुळे चीनकडून होणारी आयात कमी होणार असल्याचेही त्यांनी संकेत दिले आहेत. चीनमधून माल किंवा वस्तू आणून त्या भारतात विक्री करणारे व्यापारी आता त्या वस्तूच देशात तयार करण्याचा धोका पत्करण्याचा विचारात आहेत.उद्योजक नितीन अग्रवाल सांगतात की, ते व्यवसायासाठी वर्षातून किमान तीन वेळा चीनला जायचे. पण कोरोनाच्या उद्रेकानंतर ते पुढील वर्षभर तरी चीनमध्ये जाणार नाहीत. तसेच माझ्यासारखे बरेच व्यापारी फोनवरून चिनी व्यावसायिकांना आता ऑर्डर देणार नाहीत, कारण जगभरात चिनी व्यावसायिकांनी विश्वास गमावलेला आहे. कॉस्मेटिक वस्तूंचे व्यावसायिक दीपक अरोरा म्हणाले की, कोरोनाच्या वातावरणात माझ्यासकट शेकडो व्यापारी चीनवर असलेलं अवलंबित्व संपवण्यासाठी चीनकडून तयार वस्तू मिळण्याऐवजी मशीन व तंत्रज्ञान खरेदीची तयारी करीत आहेत.चीनविषयी कोरोनामुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा चीनला फटका बसणार असून, ते पाहता चिनी वस्तूंच्या विक्रीवर निश्चितच परिणाम होऊ शकतो. आता लोक भारतात तयार होणा-या अत्यंत महागड्या वस्तूही खरेदी करतील, पण चीनच्या वस्तू खरेदी करणार नाहीत. पुढील वर्षापासून चीनकडून येणारी 50 टक्के आयात थांबविली गेली तर घरगुती उत्पादन कमीत कमी 30-35 अब्ज डॉलर्स कामाच्या स्वरूपात फायदा मिळू शकेल.2018मध्ये भारतानं चीनकडून 76.87अब्ज डॉलर्सची आयात केली होती, तर या काळात भारतानं चीनला फक्त 18.83 अब्ज डॉलर्सच्या सामानाची निर्यात केली. गेल्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या काळात चीनकडून 68 अब्ज डॉलर्सची आयात करण्यात आली होती, तर भारताची निर्यात फक्त 16.32अब्ज डॉलर्स एवढीच होती. चीन भारतीय आयटी आणि फार्मा कंपन्यांना त्यांच्या बाजारात उत्पादने विकू देत नाही. भारत कापूस, सूत, फॅब्रिक, धातू यांसारख्या हलक्या वस्तूंची चीनला निर्यात करतो. दुसरीकडे भारत चीनकडून दूरसंचार उपकरणे, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, अणुभट्ट्या, बॉयलर, यंत्रसामग्री अशा वस्तू आयात करतो. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या