शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

Coronavirus: डॉक्टरांवरील हल्ल्यांविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनचे 'व्हाइट अँड ब्लॅक अलर्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 15:50 IST

सोलापूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका नर्सची दुचाकी जाळण्यात आल्याची घटना घडली होती. त्यामुळे, लॉकडाऊ काळात सेवा बजावणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील स्टाफचं सर्वत्र कौतुक होत असताना

मुंबई - देशात कोरोनाचा फैलाव वाढल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता ३ मे पर्यंत देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊन काळात पोलीस प्रशासन, वैद्यकीय स्टाफ आणि अत्यावश्यस सेवेतील सर्वच कामगार कर्मचारी जीवाचं रान करत आहेत. मात्र, या काळात काही नागरिकांकडून पोलिसांसोबत हुज्जत घातली जाते, कुठे डॉक्टरांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे डॉक्टर भयभीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये तपासणी कारण्यासाठी गेलेल्या डॉक्टरांवर जमवाकडून हल्ला झाल्याची घटना घडली होती. तर, दिल्लीतही तबलिगी समाजाच्या रुग्णांकडून डॉक्टरांशी अश्लील वर्तणूक केल्याच्या बातम्या आल्या होत्या. 

सोलापूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका नर्सची दुचाकी जाळण्यात आल्याची घटना घडली होती. त्यामुळे, लॉकडाऊ काळात सेवा बजावणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील स्टाफचं सर्वत्र कौतुक होत असताना, अशा घटनांमुळे त्यांना मानिसक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्याचे कुटुंबही चितातूर झाले आहे. त्यामुळे, इंडियन मेडिकल असोसिएशनने २२ एप्रिल रोजी देशात व्हाईट अटर्ल पाळण्याचे निर्देश दिले आहेत. तर, २३ एप्रिल रोजी ब्लॅक अलर्ट पाळण्याच्या सूचना वैद्यकीय स्टाफ अन् डॉक्टर्संना देण्यात आल्या आहेत. 

कोरोना महामारीच्या काळात फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या डॉक्टरांवर देशभरात हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. या हल्ल्यांचा निषेध करत आयएमएने  २२  एप्रिल रोजी 'व्हाइट अलर्ट' पाळायचे निर्देश दिले आहेत. यात सर्व डॉक्टर आणि रुग्णालयांनी मेणबत्ती लावून होणाऱ्या हल्ल्याविरोधात निषेध व्यक्त करायचा आहे. याखेरीज, डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्याकरिता केंद्र स्तरावर कायदा करण्याची मागणीही आयएमएने केली आहे. ही मागणी तातडीने पूर्ण न केल्यास २३ एप्रिल रोजी आयएमएच्या वतीने 'काळा दिवस' पाळण्यात येणार आहे. यात सर्व डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम करण्याचे आदेश इंडियन मेडिकल असोसिएशनने दिले आहेत.

दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 16,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 500 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 4483 वर पोहोचली आहे. सोमवारी (20 एप्रिल) राज्यात 283 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये मुंबईतील तब्बल 187 नव्या रुग्णांचा समावेश आहे. तर ठाण्यातही कोरोनाचे आणखी 21 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळत आहे. 

टॅग्स :doctorडॉक्टरAIIMS hospitalएम्स रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या