शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus: डॉक्टरांवरील हल्ल्यांविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनचे 'व्हाइट अँड ब्लॅक अलर्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 15:50 IST

सोलापूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका नर्सची दुचाकी जाळण्यात आल्याची घटना घडली होती. त्यामुळे, लॉकडाऊ काळात सेवा बजावणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील स्टाफचं सर्वत्र कौतुक होत असताना

मुंबई - देशात कोरोनाचा फैलाव वाढल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता ३ मे पर्यंत देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊन काळात पोलीस प्रशासन, वैद्यकीय स्टाफ आणि अत्यावश्यस सेवेतील सर्वच कामगार कर्मचारी जीवाचं रान करत आहेत. मात्र, या काळात काही नागरिकांकडून पोलिसांसोबत हुज्जत घातली जाते, कुठे डॉक्टरांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे डॉक्टर भयभीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये तपासणी कारण्यासाठी गेलेल्या डॉक्टरांवर जमवाकडून हल्ला झाल्याची घटना घडली होती. तर, दिल्लीतही तबलिगी समाजाच्या रुग्णांकडून डॉक्टरांशी अश्लील वर्तणूक केल्याच्या बातम्या आल्या होत्या. 

सोलापूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका नर्सची दुचाकी जाळण्यात आल्याची घटना घडली होती. त्यामुळे, लॉकडाऊ काळात सेवा बजावणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील स्टाफचं सर्वत्र कौतुक होत असताना, अशा घटनांमुळे त्यांना मानिसक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्याचे कुटुंबही चितातूर झाले आहे. त्यामुळे, इंडियन मेडिकल असोसिएशनने २२ एप्रिल रोजी देशात व्हाईट अटर्ल पाळण्याचे निर्देश दिले आहेत. तर, २३ एप्रिल रोजी ब्लॅक अलर्ट पाळण्याच्या सूचना वैद्यकीय स्टाफ अन् डॉक्टर्संना देण्यात आल्या आहेत. 

कोरोना महामारीच्या काळात फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या डॉक्टरांवर देशभरात हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. या हल्ल्यांचा निषेध करत आयएमएने  २२  एप्रिल रोजी 'व्हाइट अलर्ट' पाळायचे निर्देश दिले आहेत. यात सर्व डॉक्टर आणि रुग्णालयांनी मेणबत्ती लावून होणाऱ्या हल्ल्याविरोधात निषेध व्यक्त करायचा आहे. याखेरीज, डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्याकरिता केंद्र स्तरावर कायदा करण्याची मागणीही आयएमएने केली आहे. ही मागणी तातडीने पूर्ण न केल्यास २३ एप्रिल रोजी आयएमएच्या वतीने 'काळा दिवस' पाळण्यात येणार आहे. यात सर्व डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम करण्याचे आदेश इंडियन मेडिकल असोसिएशनने दिले आहेत.

दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 16,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 500 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 4483 वर पोहोचली आहे. सोमवारी (20 एप्रिल) राज्यात 283 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये मुंबईतील तब्बल 187 नव्या रुग्णांचा समावेश आहे. तर ठाण्यातही कोरोनाचे आणखी 21 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळत आहे. 

टॅग्स :doctorडॉक्टरAIIMS hospitalएम्स रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या