शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

coronavirus : भारत कोरोनाविरोधातील लढाई जिंकणार, ग्लोबल लीडर बनणार, काँग्रेस नेत्याकडून मोदी सरकारचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 16:43 IST

कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्याची टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून करण्यात येत आहे.

 

नवी दिल्ली - देशात वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे शासन आणि प्रशासनाच्या पातळीवर चिंतेचे वातावरण आहे. त्यातच कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्याची टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून करण्यात येत आहे. काँग्रेसचे इतर नेतेही सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांनी मात्र कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. भारत सरकार आणि येथील वैद्यकीय कर्मचारी जगातील इतर भागांच्या तुलनेत खूप चांगले काम करत आहेत. जर कोरोनाच्या संकटातून भारत बाहेर पडला तर हा देश एक ग्लोबल लीडर बनू शकतो, असा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला आहे. 

अधीररंजन चौधरी म्हणाले की, सुमारे 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात सरकार, राज्य सरकारे, डॉक्टर आणि इतर संस्थांनी चांगले काम केले आहे. जेव्हा आम्ही अमेरिका, युरोपला पाहतो तेव्हा आपण त्यांच्यापेक्षा खूप पुढे गेल्याचे जाणवते. आता जर आपण या संधीचा योग्य पद्धतीने वापर केला तर भारत खूप पुढे निघून जाईल. ग्लोबल लीडर बनेल.'

दरम्यान, अधीररंजन चौधरी यांनी कौतुक केले असले तरी काँग्रेसने कोरोनाविरोधात लढण्यासाठी सरकारची तयारी अपुरी पडल्याची टीका वेळोवेळी केली आहे. सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लॉकडाऊनची तुलना नोटाबंदीशी केली होती. 

सोनिया गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात MSME क्षेत्राचा उल्लेख केला होता. या क्षेत्राचा सकल राष्ट्रीय एक तृतीयांश इतका वाटा आहे. तसेच त्यात 11 कोटी लोक आहेत. दरम्यान, दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी हेसुध्दा लॉकडाऊनमुळे कोरोनाला केवळ  अटकाव येईल तो संपणार नाही. कोरोनाला रोखण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात चाचण्या होणे आवश्यक आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार