शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
2
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
5
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
6
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
7
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
8
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
9
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
10
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
11
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
12
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
13
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
14
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
15
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
16
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
17
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
18
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
19
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
20
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद

coronavirus : भारत कोरोनाविरोधातील लढाई जिंकणार, ग्लोबल लीडर बनणार, काँग्रेस नेत्याकडून मोदी सरकारचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 16:43 IST

कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्याची टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून करण्यात येत आहे.

 

नवी दिल्ली - देशात वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे शासन आणि प्रशासनाच्या पातळीवर चिंतेचे वातावरण आहे. त्यातच कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्याची टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून करण्यात येत आहे. काँग्रेसचे इतर नेतेही सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांनी मात्र कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. भारत सरकार आणि येथील वैद्यकीय कर्मचारी जगातील इतर भागांच्या तुलनेत खूप चांगले काम करत आहेत. जर कोरोनाच्या संकटातून भारत बाहेर पडला तर हा देश एक ग्लोबल लीडर बनू शकतो, असा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला आहे. 

अधीररंजन चौधरी म्हणाले की, सुमारे 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात सरकार, राज्य सरकारे, डॉक्टर आणि इतर संस्थांनी चांगले काम केले आहे. जेव्हा आम्ही अमेरिका, युरोपला पाहतो तेव्हा आपण त्यांच्यापेक्षा खूप पुढे गेल्याचे जाणवते. आता जर आपण या संधीचा योग्य पद्धतीने वापर केला तर भारत खूप पुढे निघून जाईल. ग्लोबल लीडर बनेल.'

दरम्यान, अधीररंजन चौधरी यांनी कौतुक केले असले तरी काँग्रेसने कोरोनाविरोधात लढण्यासाठी सरकारची तयारी अपुरी पडल्याची टीका वेळोवेळी केली आहे. सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लॉकडाऊनची तुलना नोटाबंदीशी केली होती. 

सोनिया गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात MSME क्षेत्राचा उल्लेख केला होता. या क्षेत्राचा सकल राष्ट्रीय एक तृतीयांश इतका वाटा आहे. तसेच त्यात 11 कोटी लोक आहेत. दरम्यान, दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी हेसुध्दा लॉकडाऊनमुळे कोरोनाला केवळ  अटकाव येईल तो संपणार नाही. कोरोनाला रोखण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात चाचण्या होणे आवश्यक आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार