शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

Coronavirus : भारताने कोरोनाच्या नव्या लाटेशी केला समर्थपणे मुकाबला -नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 06:21 IST

Coronavirus: देश कोरोनाच्या नव्या लाटेशी समर्थपणे मुकाबला करत असून त्यात  मोठे यशही मिळाले आहे. स्वदेशी लसींवर नागरिकांनी दाखविलेला विश्वास हे भारताचे मोठे सामर्थ्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : देश कोरोनाच्या नव्या लाटेशी समर्थपणे मुकाबला करत असून त्यात  मोठे यशही मिळाले आहे. स्वदेशी लसींवर नागरिकांनी दाखविलेला विश्वास हे भारताचे मोठे सामर्थ्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. यंदाच्या वर्षात ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मोदी बोलत होते. ते म्हणाले की, कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येतही आता घट होऊ लागली असून ते सकारात्मक चिन्ह आहे. देशातील साडेचार कोटी मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्यांच्यासाठी लसीकरण सुरू झाल्यापासून तीन ते चार आठवड्यांत १५ ते १८ वर्षे वयोगटातील सुमारे ६० टक्के मुलांना ही लस मिळाली. लोक सुरक्षित राहिले तरच दैनंदिन व्यवहार व आर्थिक घडामोडीही सुरू राहतील.मोदी यांनी सांगितले की, प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सुरुवात आता दरवर्षी २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून होईल व हा सोहळा महात्मा गांधी यांच्या ३० जानेवारीला असलेल्या स्मृतिदिनापर्यंत चालणार आहे. इंडिया गेट येथील अमर जवान ज्योतीचे राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीत विलीनीकरण केल्याचेही देशातील नागरिकांनी स्वागत केले आहे. पद्म पुरस्कार मिळालेल्यांपैकी अनेकजण प्रसिद्धीच्या झोतात नाहीत. मात्र, अशा व्यक्तींच्या कार्याचा देशाच्या विकासात मोठा हातभार आहे.

काॅलरवाल्या वाघिणीबद्दल जिव्हाळा पेंच व्याघ्र प्रकल्पातील राणी या वाघिणीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. तिने आजवर २९ पिल्लांना जन्म दिला होता.  गळ्यात कॉलर लावलेली असल्याने तिला काॅलरवाली वाघीण म्हटले जात असे. तिच्या मृत्यूनंतर देशातील असंख्य नागरिक हळहळले. त्याचाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केला. 

भारताला भ्रष्टाचारमुक्त करापंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भ्रष्टाचार हा वाळवीसारखा असून तो सारा देश पोखरतो. भ्रष्टाचारापासून भारताची मुक्तता करण्यासाठी सर्व नागरिकांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याIndapurइंदापूर