शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : देशात कोरोनाचा आलेख उतरता?; मुंबई अन् दिल्लीत रुग्ण संख्येत घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 10:35 IST

दिल्लीत बुधवारी फक्त १७ नवे रुग्ण समोर आले असून, जी एप्रिल महिन्यातील कोणत्याही दिवसातील सर्वात कमी आकडेवारी आहे.

नवी दिल्लीः देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, कोरोना बाधितांची संख्या जवळपास १२ हजारांच्या वर गेली आहे. तर देशात आतापर्यंत ३९२ लोकांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या विषाणूचा सर्वाधिक फटका दिल्ली आणि मुंबईला बसला असून, गेल्या २४ तासांत नवीन रुग्णांच्या संख्येत घट नोंदवली गेली आहे. दिल्लीत बुधवारी फक्त १७ नवे रुग्ण समोर आले असून, जी एप्रिल महिन्यातील कोणत्याही दिवसातील सर्वात कमी आकडेवारी आहे. त्याचप्रमाणे बुधवारीही मुंबईत नवीन रुग्णांची नोंद आदल्यादिवशीच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी घटली आहे. देशात नवीन प्रकरणांमध्ये 25% घटबुधवारी नवीन प्रकरणं समोर आली असली तरी केवळ 866 नवीन रुग्ण देशात आढळून आले  होते. त्यापूर्वीचा दिवस मंगळवारपेक्षा ही आकडेवारी सुमारे 25 टक्क्यांनी कमी आहे. या आठवड्यात नवीन प्रकरणांची सर्वात कमी संख्यासुद्धा आहे. सोमवारी देशात कोरोना विषाणूचे 1200हून अधिक नवीन रुग्ण आढळले होते. मंगळवारीही सुमारे 1100 नवीन प्रकरणे नोंदली गेली होती. जर आजचा हा ट्रेंड कायम राहिला तर भारत लवकरच कोरोना विषाणूपासून मुक्तता मिळवू शकतो. दिल्लीत फक्त 17 नवीन प्रकरणे; एप्रिलमधल्या एका दिवसातील सर्वात कमी घटनामहाराष्ट्रानंतर दिल्लीत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील कोरोनाचा आलेख बर्‍याच वेगाने वाढत होता, जो बुधवारी थांबला. काल राजधानीत कोरोना विषाणूची एकूण 17 नवीन प्रकरणं समोर आली असली तरी संपूर्ण एप्रिलमध्ये कोणत्याही दिवसातील सर्वात कमी आकडेवारी आहे. बुधवारी दिल्लीत कोरोनानं दोन मृत्यू झाले, आता मृतांचा आकडा येथे 32पर्यंत पोहोचला आहे.अधिका-यांच्या म्हणण्यानुसार निजामुद्दीन मरकजच्या लोकांना वेळीच हद्दपार केल्यानं दिल्लीतील नवीन प्रकरणे कमी आली आहे. लोकांमध्ये शून्य पॉझिटिव्ह असल्याचे म्हटले जाऊ शकते. येथे एकूण  1578 प्रकरणांपैकी 1080 म्हणजे ६८ टक्के प्रकरणं तबलिगींशी संबंधित होती. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात सर्वात कमी प्रकरणदेशातील कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसणा-या महाराष्ट्रातही बुधवारी सुधारणा झाली आणि नवीन प्रकरणांमध्ये 34 टक्क्यांपर्यंत घट झाली. बुधवारी महाराष्ट्रात एकूण 232 नवीन रुग्ण आढळून आले. गेल्या 6 दिवसांतील हे सर्वात कमी आकडेवारी असून, मंगळवारच्या तुलनेत 34 टक्के कमी आली आहे.मुंबईत नवीन प्रकरणात 35% घटमहाराष्ट्रातील सर्वात वाईट परिस्थिती मुंबईत आहे, परंतु चांगली गोष्ट म्हणजे बुधवारी नवीन प्रकरणांमध्ये 35 टक्के घट झाली. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत बुधवारी 140 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात कोरोनामध्ये गेल्या 11 दिवसांत झालेल्या मृत्यूची ही सर्वात कमी आकडेवारी होती, जिथे आतापर्यंत 114 मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 1896वर गेली आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या