शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : देशात कोरोनाचा आलेख उतरता?; मुंबई अन् दिल्लीत रुग्ण संख्येत घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 10:35 IST

दिल्लीत बुधवारी फक्त १७ नवे रुग्ण समोर आले असून, जी एप्रिल महिन्यातील कोणत्याही दिवसातील सर्वात कमी आकडेवारी आहे.

नवी दिल्लीः देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, कोरोना बाधितांची संख्या जवळपास १२ हजारांच्या वर गेली आहे. तर देशात आतापर्यंत ३९२ लोकांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या विषाणूचा सर्वाधिक फटका दिल्ली आणि मुंबईला बसला असून, गेल्या २४ तासांत नवीन रुग्णांच्या संख्येत घट नोंदवली गेली आहे. दिल्लीत बुधवारी फक्त १७ नवे रुग्ण समोर आले असून, जी एप्रिल महिन्यातील कोणत्याही दिवसातील सर्वात कमी आकडेवारी आहे. त्याचप्रमाणे बुधवारीही मुंबईत नवीन रुग्णांची नोंद आदल्यादिवशीच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी घटली आहे. देशात नवीन प्रकरणांमध्ये 25% घटबुधवारी नवीन प्रकरणं समोर आली असली तरी केवळ 866 नवीन रुग्ण देशात आढळून आले  होते. त्यापूर्वीचा दिवस मंगळवारपेक्षा ही आकडेवारी सुमारे 25 टक्क्यांनी कमी आहे. या आठवड्यात नवीन प्रकरणांची सर्वात कमी संख्यासुद्धा आहे. सोमवारी देशात कोरोना विषाणूचे 1200हून अधिक नवीन रुग्ण आढळले होते. मंगळवारीही सुमारे 1100 नवीन प्रकरणे नोंदली गेली होती. जर आजचा हा ट्रेंड कायम राहिला तर भारत लवकरच कोरोना विषाणूपासून मुक्तता मिळवू शकतो. दिल्लीत फक्त 17 नवीन प्रकरणे; एप्रिलमधल्या एका दिवसातील सर्वात कमी घटनामहाराष्ट्रानंतर दिल्लीत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील कोरोनाचा आलेख बर्‍याच वेगाने वाढत होता, जो बुधवारी थांबला. काल राजधानीत कोरोना विषाणूची एकूण 17 नवीन प्रकरणं समोर आली असली तरी संपूर्ण एप्रिलमध्ये कोणत्याही दिवसातील सर्वात कमी आकडेवारी आहे. बुधवारी दिल्लीत कोरोनानं दोन मृत्यू झाले, आता मृतांचा आकडा येथे 32पर्यंत पोहोचला आहे.अधिका-यांच्या म्हणण्यानुसार निजामुद्दीन मरकजच्या लोकांना वेळीच हद्दपार केल्यानं दिल्लीतील नवीन प्रकरणे कमी आली आहे. लोकांमध्ये शून्य पॉझिटिव्ह असल्याचे म्हटले जाऊ शकते. येथे एकूण  1578 प्रकरणांपैकी 1080 म्हणजे ६८ टक्के प्रकरणं तबलिगींशी संबंधित होती. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात सर्वात कमी प्रकरणदेशातील कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसणा-या महाराष्ट्रातही बुधवारी सुधारणा झाली आणि नवीन प्रकरणांमध्ये 34 टक्क्यांपर्यंत घट झाली. बुधवारी महाराष्ट्रात एकूण 232 नवीन रुग्ण आढळून आले. गेल्या 6 दिवसांतील हे सर्वात कमी आकडेवारी असून, मंगळवारच्या तुलनेत 34 टक्के कमी आली आहे.मुंबईत नवीन प्रकरणात 35% घटमहाराष्ट्रातील सर्वात वाईट परिस्थिती मुंबईत आहे, परंतु चांगली गोष्ट म्हणजे बुधवारी नवीन प्रकरणांमध्ये 35 टक्के घट झाली. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत बुधवारी 140 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात कोरोनामध्ये गेल्या 11 दिवसांत झालेल्या मृत्यूची ही सर्वात कमी आकडेवारी होती, जिथे आतापर्यंत 114 मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 1896वर गेली आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या