शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Coronavirus : देशात कोरोनाचा आलेख उतरता?; मुंबई अन् दिल्लीत रुग्ण संख्येत घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 10:35 IST

दिल्लीत बुधवारी फक्त १७ नवे रुग्ण समोर आले असून, जी एप्रिल महिन्यातील कोणत्याही दिवसातील सर्वात कमी आकडेवारी आहे.

नवी दिल्लीः देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, कोरोना बाधितांची संख्या जवळपास १२ हजारांच्या वर गेली आहे. तर देशात आतापर्यंत ३९२ लोकांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या विषाणूचा सर्वाधिक फटका दिल्ली आणि मुंबईला बसला असून, गेल्या २४ तासांत नवीन रुग्णांच्या संख्येत घट नोंदवली गेली आहे. दिल्लीत बुधवारी फक्त १७ नवे रुग्ण समोर आले असून, जी एप्रिल महिन्यातील कोणत्याही दिवसातील सर्वात कमी आकडेवारी आहे. त्याचप्रमाणे बुधवारीही मुंबईत नवीन रुग्णांची नोंद आदल्यादिवशीच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी घटली आहे. देशात नवीन प्रकरणांमध्ये 25% घटबुधवारी नवीन प्रकरणं समोर आली असली तरी केवळ 866 नवीन रुग्ण देशात आढळून आले  होते. त्यापूर्वीचा दिवस मंगळवारपेक्षा ही आकडेवारी सुमारे 25 टक्क्यांनी कमी आहे. या आठवड्यात नवीन प्रकरणांची सर्वात कमी संख्यासुद्धा आहे. सोमवारी देशात कोरोना विषाणूचे 1200हून अधिक नवीन रुग्ण आढळले होते. मंगळवारीही सुमारे 1100 नवीन प्रकरणे नोंदली गेली होती. जर आजचा हा ट्रेंड कायम राहिला तर भारत लवकरच कोरोना विषाणूपासून मुक्तता मिळवू शकतो. दिल्लीत फक्त 17 नवीन प्रकरणे; एप्रिलमधल्या एका दिवसातील सर्वात कमी घटनामहाराष्ट्रानंतर दिल्लीत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील कोरोनाचा आलेख बर्‍याच वेगाने वाढत होता, जो बुधवारी थांबला. काल राजधानीत कोरोना विषाणूची एकूण 17 नवीन प्रकरणं समोर आली असली तरी संपूर्ण एप्रिलमध्ये कोणत्याही दिवसातील सर्वात कमी आकडेवारी आहे. बुधवारी दिल्लीत कोरोनानं दोन मृत्यू झाले, आता मृतांचा आकडा येथे 32पर्यंत पोहोचला आहे.अधिका-यांच्या म्हणण्यानुसार निजामुद्दीन मरकजच्या लोकांना वेळीच हद्दपार केल्यानं दिल्लीतील नवीन प्रकरणे कमी आली आहे. लोकांमध्ये शून्य पॉझिटिव्ह असल्याचे म्हटले जाऊ शकते. येथे एकूण  1578 प्रकरणांपैकी 1080 म्हणजे ६८ टक्के प्रकरणं तबलिगींशी संबंधित होती. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात सर्वात कमी प्रकरणदेशातील कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसणा-या महाराष्ट्रातही बुधवारी सुधारणा झाली आणि नवीन प्रकरणांमध्ये 34 टक्क्यांपर्यंत घट झाली. बुधवारी महाराष्ट्रात एकूण 232 नवीन रुग्ण आढळून आले. गेल्या 6 दिवसांतील हे सर्वात कमी आकडेवारी असून, मंगळवारच्या तुलनेत 34 टक्के कमी आली आहे.मुंबईत नवीन प्रकरणात 35% घटमहाराष्ट्रातील सर्वात वाईट परिस्थिती मुंबईत आहे, परंतु चांगली गोष्ट म्हणजे बुधवारी नवीन प्रकरणांमध्ये 35 टक्के घट झाली. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत बुधवारी 140 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात कोरोनामध्ये गेल्या 11 दिवसांत झालेल्या मृत्यूची ही सर्वात कमी आकडेवारी होती, जिथे आतापर्यंत 114 मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 1896वर गेली आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या