शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
4
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
5
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
6
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
7
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
8
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
9
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
10
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
11
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
12
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
13
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
14
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
15
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
16
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
17
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
18
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
19
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट

Coronavirus: मनातील कोरोनाची भीती काढून टाका; ८३ जिल्ह्यांच्या सर्व्हेतून मिळाली समाधानाची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 17:28 IST

जगापेक्षा भारतात प्रति लाख लोकसंख्येच्या तुलनेत कोविड १९ रूग्णांची संख्या आणि मृत्यूदर सर्वात कमी आहे पण लॉकडाऊनच्या साडेपाच आठवड्यांनंतर ३० एप्रिलपर्यंत हीच स्थिती आहे हे लक्षात ठेवा.

ठळक मुद्दे८३ जिल्ह्यांतील २८ हजार ५९५ घरांना भेट दिली आणि २६, ४०० लोकांच्या रक्ताचे नमुने घेतलेजिल्ह्यांमधील केवळ ०.७३ टक्के लोकांना संसर्ग झाल्याचे पुरावे आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात १.०९ आणि शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये १.८९ पटीने धोका आहे

नवी दिल्ली - देशातील ८३ जिल्ह्यांत केवळ ०.७३ टक्के लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्याचसोबत कोविड -१९ मधील रुग्णांचा मृत्यू दर देखील जगात सर्वात कमी भारतात आहे ही चांगली बाब आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ. बलाराम भार्गव यांनी सिरोच्या सर्वेक्षणातील निकालांची माहिती दिली आहे.

जगापेक्षा भारतात प्रति लाख लोकसंख्येच्या तुलनेत कोविड १९ रूग्णांची संख्या आणि मृत्यूदर सर्वात कमी आहे पण लॉकडाऊनच्या साडेपाच आठवड्यांनंतर ३० एप्रिलपर्यंत हीच स्थिती आहे हे लक्षात ठेवा. तथापि, त्यांनी असंही म्हटलं आहे की, अद्यापही आपली मोठी लोकसंख्या धोक्यात आहे, त्यामुळे संसर्ग झपाट्याने पसरू शकेल. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात १.०९ आणि शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये १.८९ पटीने धोका आहे. अशा परिस्थितीत आपल्याला उपचार आणि औषधे वगळता सर्व खबरदारी घेण्यावर आपला भर असला पाहिजे.

शहरांमधील झोपडपट्टी भागात संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. राज्य सरकारांना स्थानिक पातळीवर लॉकडाऊन लागू करावे लागतील. कंन्टेंन्मेंट झोनमध्ये संसर्गाची पातळी खूप जास्त असल्याचे आढळले आहे. डॉ भार्गव यांनी सिरो सर्व्हेबद्दल सांगितले की, त्यातून बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी माहिती पडल्या आहेत. सिरो सर्व्हेमध्ये सामान्य माणसाच्या अँन्टीबॉडीजची चाचणी केली जाते. या चाचणीसाठी, लोकांचे रक्ताचे नमुने घेऊन आयजीजी अँटीबॉडीजची तपासणी केली जाते. जर एखादी व्यक्ती आयजीजी पॉझिटिव्ह असेल तर याचा अर्थ असा आहे की त्याला सार्स कोव २ ची लागण झाली. या सर्व्हेमुळे किती टक्के लोकसंख्या व्हायरसच्या संक्रमणात आहे हे माहिती झाले. त्याचसोबत कोणत्या व्यक्तीमध्ये संक्रमणाचा धोका जास्त आहे? कोणत्या भागांना वाचवण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात? याची माहिती मिळाली.

या सर्व्हेसाठी त्यांनी देशातील ८३ जिल्ह्यांतील २८ हजार ५९५ घरांना भेट दिली आणि २६, ४०० लोकांच्या रक्ताचे नमुने घेतले. या सर्वेक्षणात असे आढळले आहे की, या जिल्ह्यांमधील केवळ ०.७३ टक्के लोकांना संसर्ग झाल्याचे पुरावे आहेत. याचा अर्थ असा की लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम झाला आणि व्हायरसच्या संसर्गाचा गतीनं फैलाव रोखला गेला. याचे दोन पैलू आहेत, एक म्हणजे आताही मोठ्या लोकसंख्येला विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका आहे, परंतु दुसरीकडे सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या २६,४०० लोकांपैकी केवळ ०.०८ टक्के लोक मृत्यू झाल्याने दिलासा मिळाला आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

सर्कशीत आता प्राणी नसतात, सर्व जोकर असतात; माजी मुख्यमंत्र्यांचं शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर

भारताविरुद्ध चीनचा माईंडगेम! लडाख सीमेवर आणल्या अत्याधुनिक ‘बाहुबली तोफ’

त्या’ १३ तासांत काय घडलं? गर्भवती महिलेच्या पतीने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा थरारक अनुभव!

मुख्यमंत्र्यांनंतर आता ज्योतिरादित्य शिंदेंची ऑडिओ क्लीप व्हायरल; ५० लाख रुपये दिल्याचा संवाद

काँग्रेस आमदारांना जयपुरच्या हॉटेलमध्ये पाठवलं; भाजपा आमिष दाखवत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत