शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

coronavirus: लॉकडाऊनच्या अफवांकडे दुर्लक्ष करा, अनलॉक-२ चा आराखडा तयार करा, मोदींचा राज्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 21:09 IST

एकीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण आणि दुसरीकडे लॉकडाऊन वाढवण्याबाबत सुरू असलेल्या अफवा या पार्श्वभूमीवर आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक-२ बाबत मोठे संकेत दिले आहेत.

ठळक मुद्देमोदींनी लॉकडाऊनच्या अफवांकडे दुर्लक्ष करून अनलॉक-२ बाबत योजना तयार करण्याची सूचना विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली सध्या उपलब्ध असलेल्या टेस्टिंगच्या क्षमतेचा आणि  टेस्टिंग वाढवण्याचा सल्ला राज्यांना दिलाराज्यांनी पायाभूत सुविधांची निर्मिती आणि बांधकामासंबंधीच्या कामांना गती द्यावी

नवी दिल्ली -  जून महिन्याच्या सुरुवातीपासून देशातील लॉकडाऊन हटवून हळूहळू देश अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र अनलॉक-१ ला सुरुवात झाल्यापासून देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. एकीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण आणि दुसरीकडे लॉकडाऊन वाढवण्याबाबत सुरू असलेल्या अफवा या पार्श्वभूमीवर आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक-२ बाबत मोठे संकेत दिले आहेत.

देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सलग दोन दिवस चाललेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनच्या अफवांकडे दुर्लक्ष करून अनलॉक-२ बाबत योजना तयार करण्याची सूचना विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली आहे. यावेळी मोदींनी देशात सध्या उपलब्ध असलेल्या टेस्टिंगच्या क्षमतेचा आणि  टेस्टिंग वाढवण्याचा सल्ला राज्यांना दिला. तसेच आर्थिक व्यवहारांना गती देण्याची गरज असल्याचे मोदींनी सांगितले. तसेच राज्यांनी पायाभूत सुविधांची निर्मिती आणि बांधकामासंबंधीच्या कामांना गती द्यावी अशा सल्लाही मोदींनी दिला.

  दरम्यान, देशातील काही शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचेही त्यांनी मान्य केले. मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अनलॉक-१ नंतरची ही आपली पहिलीच भेट आहे. सध्याच्या घडीला देशातील काही मोठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही शहरांमध्ये गर्दी, लहान घरे , गल्लीबोळांमध्ये फिरताना फिजिकल डिस्टंसिंग बाळगण्यात येणाऱ्या अडचणी तसेच दररोज हजारो लोकांची होणारी ये जा  यामुळे कोरोनाविरोधातील लढाईला आव्हानात्मक बनवले आहे.  

मात्र असे असले तरी देशवासियांचा संयम आणि विविध ठिकाणी प्रशासनाने दाखवलेली तत्परता व आमच्या कोविड योद्ध्यांनी दाखवलेला समर्पणभाव यामुळे आम्ही परिस्थिती नियंत्रणात ठेवी शकलो आहोत. कोरोनाबाधितांचा वेळीच घेण्यात येत असलेला शोध, उपचार यामुळे आपल्याकडील  बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दिलासादायक बाब म्हणजे आयसीयू आणि व्हेंटिलेटरची गरजही खूप कमी रुग्णांना भासत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत