शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

coronavirus: लॉकडाऊनच्या अफवांकडे दुर्लक्ष करा, अनलॉक-२ चा आराखडा तयार करा, मोदींचा राज्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 21:09 IST

एकीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण आणि दुसरीकडे लॉकडाऊन वाढवण्याबाबत सुरू असलेल्या अफवा या पार्श्वभूमीवर आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक-२ बाबत मोठे संकेत दिले आहेत.

ठळक मुद्देमोदींनी लॉकडाऊनच्या अफवांकडे दुर्लक्ष करून अनलॉक-२ बाबत योजना तयार करण्याची सूचना विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली सध्या उपलब्ध असलेल्या टेस्टिंगच्या क्षमतेचा आणि  टेस्टिंग वाढवण्याचा सल्ला राज्यांना दिलाराज्यांनी पायाभूत सुविधांची निर्मिती आणि बांधकामासंबंधीच्या कामांना गती द्यावी

नवी दिल्ली -  जून महिन्याच्या सुरुवातीपासून देशातील लॉकडाऊन हटवून हळूहळू देश अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र अनलॉक-१ ला सुरुवात झाल्यापासून देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. एकीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण आणि दुसरीकडे लॉकडाऊन वाढवण्याबाबत सुरू असलेल्या अफवा या पार्श्वभूमीवर आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक-२ बाबत मोठे संकेत दिले आहेत.

देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सलग दोन दिवस चाललेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनच्या अफवांकडे दुर्लक्ष करून अनलॉक-२ बाबत योजना तयार करण्याची सूचना विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली आहे. यावेळी मोदींनी देशात सध्या उपलब्ध असलेल्या टेस्टिंगच्या क्षमतेचा आणि  टेस्टिंग वाढवण्याचा सल्ला राज्यांना दिला. तसेच आर्थिक व्यवहारांना गती देण्याची गरज असल्याचे मोदींनी सांगितले. तसेच राज्यांनी पायाभूत सुविधांची निर्मिती आणि बांधकामासंबंधीच्या कामांना गती द्यावी अशा सल्लाही मोदींनी दिला.

  दरम्यान, देशातील काही शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचेही त्यांनी मान्य केले. मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अनलॉक-१ नंतरची ही आपली पहिलीच भेट आहे. सध्याच्या घडीला देशातील काही मोठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही शहरांमध्ये गर्दी, लहान घरे , गल्लीबोळांमध्ये फिरताना फिजिकल डिस्टंसिंग बाळगण्यात येणाऱ्या अडचणी तसेच दररोज हजारो लोकांची होणारी ये जा  यामुळे कोरोनाविरोधातील लढाईला आव्हानात्मक बनवले आहे.  

मात्र असे असले तरी देशवासियांचा संयम आणि विविध ठिकाणी प्रशासनाने दाखवलेली तत्परता व आमच्या कोविड योद्ध्यांनी दाखवलेला समर्पणभाव यामुळे आम्ही परिस्थिती नियंत्रणात ठेवी शकलो आहोत. कोरोनाबाधितांचा वेळीच घेण्यात येत असलेला शोध, उपचार यामुळे आपल्याकडील  बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दिलासादायक बाब म्हणजे आयसीयू आणि व्हेंटिलेटरची गरजही खूप कमी रुग्णांना भासत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत