शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

coronavirus: लॉकडाऊनच्या अफवांकडे दुर्लक्ष करा, अनलॉक-२ चा आराखडा तयार करा, मोदींचा राज्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 21:09 IST

एकीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण आणि दुसरीकडे लॉकडाऊन वाढवण्याबाबत सुरू असलेल्या अफवा या पार्श्वभूमीवर आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक-२ बाबत मोठे संकेत दिले आहेत.

ठळक मुद्देमोदींनी लॉकडाऊनच्या अफवांकडे दुर्लक्ष करून अनलॉक-२ बाबत योजना तयार करण्याची सूचना विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली सध्या उपलब्ध असलेल्या टेस्टिंगच्या क्षमतेचा आणि  टेस्टिंग वाढवण्याचा सल्ला राज्यांना दिलाराज्यांनी पायाभूत सुविधांची निर्मिती आणि बांधकामासंबंधीच्या कामांना गती द्यावी

नवी दिल्ली -  जून महिन्याच्या सुरुवातीपासून देशातील लॉकडाऊन हटवून हळूहळू देश अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र अनलॉक-१ ला सुरुवात झाल्यापासून देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. एकीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण आणि दुसरीकडे लॉकडाऊन वाढवण्याबाबत सुरू असलेल्या अफवा या पार्श्वभूमीवर आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक-२ बाबत मोठे संकेत दिले आहेत.

देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सलग दोन दिवस चाललेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनच्या अफवांकडे दुर्लक्ष करून अनलॉक-२ बाबत योजना तयार करण्याची सूचना विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली आहे. यावेळी मोदींनी देशात सध्या उपलब्ध असलेल्या टेस्टिंगच्या क्षमतेचा आणि  टेस्टिंग वाढवण्याचा सल्ला राज्यांना दिला. तसेच आर्थिक व्यवहारांना गती देण्याची गरज असल्याचे मोदींनी सांगितले. तसेच राज्यांनी पायाभूत सुविधांची निर्मिती आणि बांधकामासंबंधीच्या कामांना गती द्यावी अशा सल्लाही मोदींनी दिला.

  दरम्यान, देशातील काही शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचेही त्यांनी मान्य केले. मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अनलॉक-१ नंतरची ही आपली पहिलीच भेट आहे. सध्याच्या घडीला देशातील काही मोठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही शहरांमध्ये गर्दी, लहान घरे , गल्लीबोळांमध्ये फिरताना फिजिकल डिस्टंसिंग बाळगण्यात येणाऱ्या अडचणी तसेच दररोज हजारो लोकांची होणारी ये जा  यामुळे कोरोनाविरोधातील लढाईला आव्हानात्मक बनवले आहे.  

मात्र असे असले तरी देशवासियांचा संयम आणि विविध ठिकाणी प्रशासनाने दाखवलेली तत्परता व आमच्या कोविड योद्ध्यांनी दाखवलेला समर्पणभाव यामुळे आम्ही परिस्थिती नियंत्रणात ठेवी शकलो आहोत. कोरोनाबाधितांचा वेळीच घेण्यात येत असलेला शोध, उपचार यामुळे आपल्याकडील  बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दिलासादायक बाब म्हणजे आयसीयू आणि व्हेंटिलेटरची गरजही खूप कमी रुग्णांना भासत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत