शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

coronavirus: "मास्क वापरायचा कंटाळा आला तर त्या डॉक्टर, नर्सचं स्मरण करा" मोदींचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 12:54 IST

मन की बातच्या माध्यमातून मोदींनी देशात कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लढाईची सद्यस्थिती मांडली. तसेच कोरोनाविरोधात लढताना घ्यावयाच्या खबरदारीविषयीही देशवासियांना सल्ला दिला.

ठळक मुद्देआपल्या देशाचा रिकव्हरी रेट अन्य देशांच्या तुलनेत चांगला तुम्हाला मास्क काढून ठेवावा असं वाटू लागलं तर एका क्षणासाठी त्या डॉक्टरांचं, नर्सचं स्मरण करा त्या कोरोनायोद्ध्यांची आठवण काढा जे दिवसभर मास्क वापरून अव्यहतपणे रुग्णसेवा करत आहेत

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले. यावेळी मोदींनी देशात कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लढाईची सद्यस्थिती मांडली. तसेच कोरोनाविरोधात लढताना घ्यावयाच्या खबरदारीविषयीही देशवासियांना सल्ला दिला.

देशवासियांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, आज आपल्या देशाचा रिकव्हरी रेट अन्य देशांच्या तुलनेत चांगला आहे. त्याबरोबरच आपल्या देशात कोरोनामुळे होणार मृत्यूदरसुद्धा अन्य देशांपेक्षा कमी आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र अनेकांना मास्क वापताना त्रास होतो. जर तुम्हाला मास्क परिधान करायला त्रास होऊ लागला, मास्क काढून ठेवावा असं वाटू लागलं तर एका क्षणासाठी त्या डॉक्टरांचं, नर्सचं स्मरण करा. आपल्या त्या कोरोनायोद्ध्यांची आठवण काढा जे दिवसभर मास्क वापरून अव्यहतपणे रुग्णसेवा करत आहेत.’’

एकीकडे आपल्याला कोरोनाविरोधातील लढाई अधिक जागरुकतेने आणि सतर्कपणे लढण्याची गरज आहे. तर दुसरीकडे कठोर मेहनत करून व्यवसाय, नोकरी, शिक्षण, यामध्ये गती आणावी लागेल. त्याला एका विशिष्ट्य उंचीवर न्यावे लागेल, असा सल्लाही मोदींनी दिला.

दरम्यान, दरम्यान, आज मन की बात च्या ६७ व्या भागात देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलमधील योद्ध्यांना मानवंदना दिली. तसेच युद्धकाळातील वर्तनाबाबत देशवासियांना मोलाचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमध्ये म्हणाले की, युद्धकालीन परिस्थितीमध्ये आम्ही जे काही बोलतो त्याचा सीमेवर उभ्या असलेल्या जवानांच्या आणि त्यांच्या कुटंबीयांच्या मनोधैर्यावर थेट प्रभाव पडत असतो. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. आमचे वर्तन, आमचा व्यवहार, आमची वाणी, आमची विधाने, आमच्या मर्यादा आणि आमचे लक्ष्य या सर्वामध्ये आपण जे काही करत आहोत त्यामुळे सैनिकांचे मनोधैर्य वाढले पाहिजे. तसेच त्यांच्या सन्मान वाढला पाहिजे.

 कधी कधी आम्ही एखादी गोष्ट समजून घेतल्याशिवाय सोशल मीडियावर अशा गोष्टी शेअर करतो ज्यामुळे आपल्या देशाचे खूप नुकसान होते. कधीकधी ही बाब चुकीची आहे हे माहिती असूनही केवळ कुतुहल म्हणून फॉरवर्ड केले जातात, अशी नाराजीही मोदींनी व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMan ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदी