शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

coronavirus: लसनिर्मितीबाबत संतुलित धोरण स्वीकारण्याची सूचना, आयसीएमआरच्या भूमिकेवर केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 03:00 IST

कोरोना प्रतिबंधक लस १५ आॅगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्याची घोषणा इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने केल्यामुळे संशोधन क्षेत्रातून टीकेचा सूर व्यक्त झाला आहे.

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लस प्रकल्पाला प्राधान्य देतानाच, या संशोधनाला अनेक महिने किंवा वर्षेही लागू शकतात हे लक्षात घेऊन संतुलित धोरण स्वीकारले पाहिजे असे मत काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.कोरोना प्रतिबंधक लस १५ आॅगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्याची घोषणा इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने केल्यामुळे संशोधन क्षेत्रातून टीकेचा सूर व्यक्त झाला आहे.आयसीएमआरने घोषणा केली त्याच दिवशी झायडस कॅडिला कंपनीने आपण बनविलेल्या लसीच्या माणसांवर चाचण्या करण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल आॅफ इंडिया (डीसीजीआय) यांनी परवानगी दिल्याचे जाहीर केले. हैदराबादच्या भारत बायोटेक तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी यांच्या सहकार्याने कोव्हॅक्सिन ही कोरोना प्रतिबंधक लस आयसीएमआरने तयार केलीे. प्रख्यात विषाणूतज्ज्ञ व वेलकम ट्रस्ट/डीबीटी इंडिया अलायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाहिद जमील म्हणाले, एखादी लस संबंधित आजारावर परिणामकारक ठरते आहे की नाही याची चाचणी चार आठवड्यांत वेगाने पूर्ण करणे अशक्य गोष्ट आहे.कोलकाताच्या सीएसआयआर-आयआयसीबी संस्थेतील विषाणूतज्ज्ञ उपासना रॉय यांनी सांगितले की, या लसीसंदर्भातील प्रयोगांच्या निष्कर्षांवर शांतपणे विचार करून मगच निर्णय घेतले पाहिजेत. विषाणूतज्ज्ञ सत्यजीत रथ यांनी सांगितले की, प्रत्येक संशोधनाला पुरेसा वेळ द्यावा लागतो, औषधाच्या चाचण्या योग्य पद्धतीने कराव्या लागतात. आयसीएमआरने घेतलेली भूमिका कोणालाही मान्य होणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMedicalवैद्यकीय