शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

coronavirus: लसनिर्मितीबाबत संतुलित धोरण स्वीकारण्याची सूचना, आयसीएमआरच्या भूमिकेवर केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 03:00 IST

कोरोना प्रतिबंधक लस १५ आॅगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्याची घोषणा इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने केल्यामुळे संशोधन क्षेत्रातून टीकेचा सूर व्यक्त झाला आहे.

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लस प्रकल्पाला प्राधान्य देतानाच, या संशोधनाला अनेक महिने किंवा वर्षेही लागू शकतात हे लक्षात घेऊन संतुलित धोरण स्वीकारले पाहिजे असे मत काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.कोरोना प्रतिबंधक लस १५ आॅगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्याची घोषणा इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने केल्यामुळे संशोधन क्षेत्रातून टीकेचा सूर व्यक्त झाला आहे.आयसीएमआरने घोषणा केली त्याच दिवशी झायडस कॅडिला कंपनीने आपण बनविलेल्या लसीच्या माणसांवर चाचण्या करण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल आॅफ इंडिया (डीसीजीआय) यांनी परवानगी दिल्याचे जाहीर केले. हैदराबादच्या भारत बायोटेक तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी यांच्या सहकार्याने कोव्हॅक्सिन ही कोरोना प्रतिबंधक लस आयसीएमआरने तयार केलीे. प्रख्यात विषाणूतज्ज्ञ व वेलकम ट्रस्ट/डीबीटी इंडिया अलायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाहिद जमील म्हणाले, एखादी लस संबंधित आजारावर परिणामकारक ठरते आहे की नाही याची चाचणी चार आठवड्यांत वेगाने पूर्ण करणे अशक्य गोष्ट आहे.कोलकाताच्या सीएसआयआर-आयआयसीबी संस्थेतील विषाणूतज्ज्ञ उपासना रॉय यांनी सांगितले की, या लसीसंदर्भातील प्रयोगांच्या निष्कर्षांवर शांतपणे विचार करून मगच निर्णय घेतले पाहिजेत. विषाणूतज्ज्ञ सत्यजीत रथ यांनी सांगितले की, प्रत्येक संशोधनाला पुरेसा वेळ द्यावा लागतो, औषधाच्या चाचण्या योग्य पद्धतीने कराव्या लागतात. आयसीएमआरने घेतलेली भूमिका कोणालाही मान्य होणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMedicalवैद्यकीय