शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

CoronaVirus: ‘त्या’ १८६ रुग्णांना संसर्ग कसा झाला?; आरोग्य यंत्रणेला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 07:05 IST

लक्षणे नसतानाही रिपोर्टस् पॉझिटिव्ह; बाहेरदेशातूनही कोणी आलेले नाही, हे विशेष

नवी दिल्ली : देशभरात अनेक लोकांना कोरोनाची लक्षणे नसतानाही त्यांचे रिपोर्टस् पॉझिटिव्ह येत आहेत; पण संक्रमणाची कारणे मात्र कळत आहेत. दिल्लीमध्ये अशा १८६ रुग्णांना मात्र संसर्ग कसा झाला, याचाच शोध अद्याप आरोग्य यंत्रणेला लागलेला नाही.दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. त्याच वेळी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही चांगले आहे. दिल्लीत एकूण २ हजार १५६ रुग्ण असून, यातील १८६ रुग्णांमध्ये संक्रमणाचा शोध घेणे सुरू आहे. यांच्यापैकी कोणीही बाहेरच्या देशातून प्रवास करून आलेला नाही किंवा संबंधितांच्या संपर्कातही आलेला नाही. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी कोरोना संशयिताच्या संपर्कातही हे लोक आलेले नाहीत. एवढेच नव्हे तर यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे नसताना त्यांचे रिपोर्टस् मात्र पॉझिटिव्ह आलेले आहेत. अशा रुग्णांमुळे सरकारची चिंता मात्र वाढली आहे. कारण लक्षणे नसतानाही कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असेल तर यात सामुदायिक संक्रमणाचा धोका आहे. दुसरीकडे आरोग्यसेवक आणि पोलिसांनाही कोरोनाने विळखा घातला आहे.ज्या दोन यंत्रणांच्या भरवशावर रुग्णांवर उपचार आणि लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे, त्यांनाच संसर्ग होत असल्याची प्रकरणे पुढे येत आहेत. अपुºया पीपीई कीटस्ची समस्या अद्याप दूर झालेली नाही. त्यामुळे डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील इतर कर्मचारी साऱ्यांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच चांदनी महल पोलीस स्टेशनसह दिल्लीतील इतर भागांमधील पंधराहून अधिक पोलिसांना संसर्ग झाल्यामुळे सुरक्षा यंत्रणेलाही धोका निर्माण झाला आहे. तुघलकाबादमध्ये एका किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या ३५ लोकांना कोरोना झाला. यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीतही जोखीम निर्माण झाली आहे. मॉडेल टाऊन सर्कलमध्ये रूपनगर भागात एका सरकारी धान्य दुकानात काम करणाºया वृद्धाला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे इथे धान्य खरेदी करायला येणाºया लोकांना स्थानबद्ध करून थेट संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू झाला आहे. या दुकानातून दीड हजारांहून अधिक लोक धान्य खरेदी करतात.व्हिसाचे उल्लंघन करणारे ६१९ विदेशी नागरिक अटकेतव्हिसाच्या अटींचे उल्लंघन करून भारतात राहणाऱ्या एकूण ६१९ विदेशी नागरिकांना ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्यानंतरच्या गेल्या महिनाभरात देशाच्या विविध राज्यांत अटक करण्यात आली आहे.यापैकी बहुतांश विदेशी नागरिक हे दिल्लीत निजामुद्दीन मरकज येथे झालेल्या तबलिगी जमातच्या इज्तेमासाठी आलेले आहेत. पर्यटक व्हिसावर भारतात येऊन धर्मप्रचाराचे काम केल्याच्या आरोपावरून त्यांना ‘फॉरेनर्स अ‍ॅक्ट’ अन्वये अटक करण्यात आली आहे.यापैकी बहुतांश लोक बांगलादेशचे असून, इतर इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, कझागस्तान, किरगिझीस्तान व ताजिकीस्तान या देशांचे आहेत, अशी अटकेची ताजी कारवाई सोमवारी प्रयागराज शहरात करण्यात आली. तेथे १६ विदेशी नागरिकांना अटक केली गेली.या अटकांची राज्यनिहाय आकडेवारी अशी आहे: उत्तर प्रदेश ३४१, महाराष्ट्र १५७, बिहार ६६, कर्नाटक ३४ व झारखंड २१. अन्य काही राज्यांत फक्त गुन्हे नोंदले आहेत; पण अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यानुसार तेलंगणात ८८, तामिळनाडू ७२, तर मध्यप्रदेशात ६३ विदेशी नागरिकांविरुद्ध अशा प्रकारचे गुन्हे नोंदले गेले आहेत.इंदिरापुरममध्ये वृद्धेला संसर्गगाझियाबादच्या इंदिरापुरममध्ये आणखी एका वृद्ध महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ४७ झाली आहे. खासगी प्रयोगशाळेत या महिलेचे नमुने तपासण्यात आले होते. अद्याप १२६ चाचण्यांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झालेले नाही.रुग्णालयातील कर्मचाºयांचे आंदोलननोएडातील सेक्टर-२४ मध्ये ईएसआय रुग्णालयाचे कर्मचारी परिसरातच आंदोलन करीत आहेत. त्यांना मार्च महिन्याचे वेतन मिळाले नाही, असा त्यांचा आरोप आहे. कोरोनामुळे उद््भवलेल्या परिस्थितीत कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी सरकारी रुग्णालयाचे वेतन झालेले नाही, त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या