शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Coronavirus : भाषणाआधी पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 09:56 IST

Coronavirus : लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस असून सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदी पुन्हा देशवासियांना संबोधित करणार आहेत.

नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. देशव्यापी लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस आहे. आज सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदी पुन्हा देशवासियांना संबोधित करणार आहेत. लॉकडाऊनचा कालावधी संपत असल्याने नरेंद्र मोदी काय बोलणार? याकडे सर्व देशाचे लक्ष असणार आहे. याच दरम्यान भाषणाआधी पंतप्रधानांनी मंगळवारी (14 एप्रिल) सकाळी सातच्या सुमारास एक ट्विट केलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये साजऱ्या करण्यात येणाऱ्या सणांनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. 'आज देशभरात साजऱ्या करण्यात येणाऱ्या विविध उत्सवांनिमित्त सर्वांना शुभेच्छा. या उत्सावांच्या माध्यमातून देशामधील बंधुभाव वाढवणारी भावना निर्माण होवो. तसेच हे उत्सव तुमच्या आयुष्यात चांगले आरोग्य आणि आनंद घेऊन येतील. या उत्सवांमधून आपल्याला आगामी काळात कोरोना विरोधातील सामूहिक लढाईसाठी अधिक सामर्थ्य मिळू दे' असं ट्विट मोदींनी केलं आहे.

देशात लॉकडाऊननंतरही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. अशातच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यानंतर महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा या राज्यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचं घोषित केले. मंगळवारी पंतप्रधान लॉकडाऊनबाबत काय घोषणा करतील याबाबत चर्चा सुरु आहे. पण तत्पूर्वी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर केंद्रीय मंत्र्यांनी कार्यालयात जाऊन कामाला सुरुवात केली. त्यामुळे लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात काही निर्बंध शिथील केले जातील याचे संकेत मिळत आहेत.

अद्याप तरी नरेंद्र मोदी सरकारकडून देशातील लॉकडाऊन वाढवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र त्यापूर्वीच काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवला आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात देशात लॉकडाऊन वाढणार हे निश्चित आहे. पण लॉकडाऊन वाढणार ते आतासारखचं असणार की, दुसऱ्या टप्प्यात काही वेगळं असणार? हा प्रश्न उपस्थित होतो.  मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनबाबत घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. पण दुसऱ्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता आणली जाणार असेही संकेत मिळत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : 'देशाला स्मार्ट उपायांची गरज', राहुल गांधींचा मोदींना सल्ला

Coronavirus : चिंताजनक! दिल्लीत एका दिवसात कोरोनाचे ३५६ नवे रुग्ण, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९३५२ वर

जनतेला सवलती मिळण्याच्या शक्यता, आजच्या भाषणाकडे देशाचे लक्ष

खासगी कोरोना चाचण्या आता फक्त गरिबांसाठीच, न्यायालयाचा नवा आदेश

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी