शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

coronavirus: देशात कोरोनाचा आलेख सपाट होतोय? आकडेवारीतून आशेचा किरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 06:04 IST

आकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर गुरुवारी ३३.६ टक्क्यांवर गेला असून, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. एवढेच नाही तर, कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाणही ३.३ टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांवर आले आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकाडाऊनला पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि अन्य अधिकृत सूत्रांच्या विश्लेषक माहितीनुसार भारतातील कोरोनाचा आलेख सपाट होत असल्याचे दिसते. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर, तर मृत्यू दर आणि रुग्णाचे प्रमाण दुप्पट होण्याचा अवधीही कमालीचा वाढल्याने या आकडेवारीने आशा पल्लवित झाल्या आहेत.उपरोक्त अधिकृत सूत्रांच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर गुरुवारी ३३.६ टक्क्यांवर गेला असून, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. एवढेच नाही तर, कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाणही ३.३ टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांवर आले आहे. रुग्ण दुप्पट होण्याच्या दरावधीतही गेल्या तीन दिवसांत लक्षणीय वाढ (१२.२) झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच दिवसांत रुग्णसंख्या वाढीचा सरासरी दरही ५.५ टक्क्यांवर घसरला आहे.भारतात आजघडीला प्रति दहा लाख लोकसंख्येमागे १,२१२ चाचण्या केल्या जात असल्याने रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनाबाधित रुग्ण वाढण्याचा दर मात्र गेल्या ५० दिवसांत स्थिर आहे. १ एप्रिल रोजी प्रति दहा लाख लोकांमागे ४० चाचण्या करण्यात आल्या होत्या. आता चाचणीचे प्रमाण ३० पटींनी वाढले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याचा दर १ एप्रिल रोजी ३.७ टक्के होता, तो ११ मे रोजी ४ टक्के आहे. आणखी एक धीर देणारी बाब म्हणजे संसर्ग गुणांक दरही १.२३ टक्क्यांवर आला आहे. कोणतीही लस नसताना मिळालेले हे मोठे यश होय. वास्तविकता हा दर १ टक्क्याच्या खाली आला पाहिजे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

महाराष्ट्रात चाचण्या अधिकरुग्ण आणि मृत्यूसंख्येनुसार भारतात या आठवड्यातील सर्वाधिक प्रभावित राज्य महाराष्टÑ असले तरी टक्केवारीच्या तुलनेत पाच दिवसांतील सर्वाधिक दर ओडिशा (१५ टक्के), बिहार (१०६ टक्के), तामिळनाडूत (९%) आहे.तामिळनाडूनंतर महाराष्टÑात मोठ्या संख्येने चाचण्या (२.१८ लाख) केल्या जात असल्याने रुग्ण वाढत आहेत. चाचण्या करण्यात बिहार आणि ओडिशा मात्र सर्वात खालच्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत