शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
2
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
3
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
4
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
5
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
6
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
7
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
8
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
9
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
10
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
11
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
12
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
13
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
14
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
15
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
16
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
17
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
18
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
19
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
20
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद

coronavirus: देशात कोरोनाचा आलेख सपाट होतोय? आकडेवारीतून आशेचा किरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 06:04 IST

आकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर गुरुवारी ३३.६ टक्क्यांवर गेला असून, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. एवढेच नाही तर, कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाणही ३.३ टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांवर आले आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकाडाऊनला पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि अन्य अधिकृत सूत्रांच्या विश्लेषक माहितीनुसार भारतातील कोरोनाचा आलेख सपाट होत असल्याचे दिसते. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर, तर मृत्यू दर आणि रुग्णाचे प्रमाण दुप्पट होण्याचा अवधीही कमालीचा वाढल्याने या आकडेवारीने आशा पल्लवित झाल्या आहेत.उपरोक्त अधिकृत सूत्रांच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर गुरुवारी ३३.६ टक्क्यांवर गेला असून, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. एवढेच नाही तर, कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाणही ३.३ टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांवर आले आहे. रुग्ण दुप्पट होण्याच्या दरावधीतही गेल्या तीन दिवसांत लक्षणीय वाढ (१२.२) झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच दिवसांत रुग्णसंख्या वाढीचा सरासरी दरही ५.५ टक्क्यांवर घसरला आहे.भारतात आजघडीला प्रति दहा लाख लोकसंख्येमागे १,२१२ चाचण्या केल्या जात असल्याने रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनाबाधित रुग्ण वाढण्याचा दर मात्र गेल्या ५० दिवसांत स्थिर आहे. १ एप्रिल रोजी प्रति दहा लाख लोकांमागे ४० चाचण्या करण्यात आल्या होत्या. आता चाचणीचे प्रमाण ३० पटींनी वाढले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याचा दर १ एप्रिल रोजी ३.७ टक्के होता, तो ११ मे रोजी ४ टक्के आहे. आणखी एक धीर देणारी बाब म्हणजे संसर्ग गुणांक दरही १.२३ टक्क्यांवर आला आहे. कोणतीही लस नसताना मिळालेले हे मोठे यश होय. वास्तविकता हा दर १ टक्क्याच्या खाली आला पाहिजे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

महाराष्ट्रात चाचण्या अधिकरुग्ण आणि मृत्यूसंख्येनुसार भारतात या आठवड्यातील सर्वाधिक प्रभावित राज्य महाराष्टÑ असले तरी टक्केवारीच्या तुलनेत पाच दिवसांतील सर्वाधिक दर ओडिशा (१५ टक्के), बिहार (१०६ टक्के), तामिळनाडूत (९%) आहे.तामिळनाडूनंतर महाराष्टÑात मोठ्या संख्येने चाचण्या (२.१८ लाख) केल्या जात असल्याने रुग्ण वाढत आहेत. चाचण्या करण्यात बिहार आणि ओडिशा मात्र सर्वात खालच्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत