शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

coronavirus: देशात कोरोनाचा आलेख सपाट होतोय? आकडेवारीतून आशेचा किरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 06:04 IST

आकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर गुरुवारी ३३.६ टक्क्यांवर गेला असून, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. एवढेच नाही तर, कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाणही ३.३ टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांवर आले आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकाडाऊनला पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि अन्य अधिकृत सूत्रांच्या विश्लेषक माहितीनुसार भारतातील कोरोनाचा आलेख सपाट होत असल्याचे दिसते. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर, तर मृत्यू दर आणि रुग्णाचे प्रमाण दुप्पट होण्याचा अवधीही कमालीचा वाढल्याने या आकडेवारीने आशा पल्लवित झाल्या आहेत.उपरोक्त अधिकृत सूत्रांच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर गुरुवारी ३३.६ टक्क्यांवर गेला असून, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. एवढेच नाही तर, कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाणही ३.३ टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांवर आले आहे. रुग्ण दुप्पट होण्याच्या दरावधीतही गेल्या तीन दिवसांत लक्षणीय वाढ (१२.२) झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच दिवसांत रुग्णसंख्या वाढीचा सरासरी दरही ५.५ टक्क्यांवर घसरला आहे.भारतात आजघडीला प्रति दहा लाख लोकसंख्येमागे १,२१२ चाचण्या केल्या जात असल्याने रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनाबाधित रुग्ण वाढण्याचा दर मात्र गेल्या ५० दिवसांत स्थिर आहे. १ एप्रिल रोजी प्रति दहा लाख लोकांमागे ४० चाचण्या करण्यात आल्या होत्या. आता चाचणीचे प्रमाण ३० पटींनी वाढले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याचा दर १ एप्रिल रोजी ३.७ टक्के होता, तो ११ मे रोजी ४ टक्के आहे. आणखी एक धीर देणारी बाब म्हणजे संसर्ग गुणांक दरही १.२३ टक्क्यांवर आला आहे. कोणतीही लस नसताना मिळालेले हे मोठे यश होय. वास्तविकता हा दर १ टक्क्याच्या खाली आला पाहिजे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

महाराष्ट्रात चाचण्या अधिकरुग्ण आणि मृत्यूसंख्येनुसार भारतात या आठवड्यातील सर्वाधिक प्रभावित राज्य महाराष्टÑ असले तरी टक्केवारीच्या तुलनेत पाच दिवसांतील सर्वाधिक दर ओडिशा (१५ टक्के), बिहार (१०६ टक्के), तामिळनाडूत (९%) आहे.तामिळनाडूनंतर महाराष्टÑात मोठ्या संख्येने चाचण्या (२.१८ लाख) केल्या जात असल्याने रुग्ण वाढत आहेत. चाचण्या करण्यात बिहार आणि ओडिशा मात्र सर्वात खालच्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत