शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

Coronavirus: भारतात कोरोनाच्या चौथ्या लाटेची चाहूल, आठवडाभरात तब्बल ३५ टक्के रुग्णवाढ झाल्याने चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 10:26 IST

Coronavirus: गेल्या आठवड्यात देशातील कोरोनाच्या साप्ताहिक रुग्णसंख्येत ३५ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. जानेवारीनंतर पहिल्यांदाच देशातील कोरोना रुग्णसंख्येत एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.  

नवी दिल्ली - गेल्या एक दोन महिन्यांपासून ओसरलेला कोरोना विषाणू भारतात पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असून, गेल्या आठवड्यात देशातील कोरोनाच्या साप्ताहिक रुग्णसंख्येत ३५ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. जानेवारीनंतर पहिल्यांदाच देशातील कोरोना रुग्णसंख्येत एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.  मात्र दिलासादायक बाब  म्हणजे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा कमी आहे.

भारतात कोरोना रुग्णसंख्येची वाढ ही दिल्ली आणि त्याच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये लक्षणीय प्रमाणात दिसून आली आहे. गेल्या सात दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र देशातील उर्वरित भागात कोरोना नियंत्रणात आहे. मात्र या वाढत्या आकड्यांनी लोकांची चिंता वाढवली आहे.

भारतामध्ये रविवारी संपलेल्या आठवड्यामध्ये कोरोनाचे सुमारे ६ हजार ६१० रुग्ण सापडले. गेल्या आठवड्यातील  चार हजार ९०० रुग्णांच्या तुलनेत आकडा अधिक आहे. त्यापूर्वीच्या आठवड्यात सुमारे ७ हजार १० रुग्ण सापडले होते. मात्र यावेळच्या आकड्यांमध्ये केरळमधील रुग्णसंख्येचा समावेश नाही आहे. कारण केरळने या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येची आकडेवारी देणे बंद केले आहे. केरळमध्ये ४ ते १० एप्रिलदरम्यान कोरोनाचे दोन हजार १८५ रुग्ण सापडले होते.

दरम्यान, कोविड नेटवर्क प्रिवलेंस गेल्या १५ दिवसांमध्ये ५०० पटींनी वाढले आहे. म्हणजेच दिल्ली-एनसीआरमध्ये आपल्या जवळच्या सोशल नेटवर्कमध्ये कुणालाही कोरोना झाल्याची माहिती देणाऱ्या लोकांच्या संख्येत लोकांच्या संख्येत  गेल्या १५ दिवसांत ५०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने सांगितले की, सर्व्हेमध्ये दिल्ली एनसीआरमधील सर्व जिल्ह्यांतील ११ हजार ७४३ जणांकडून माहिती घेण्यात आली.

दिल्लीमध्ये रविवारी कोरोनाच्या ५१७ रुग्णांची नोंद झाली. तसेच दिल्लीमध्ये आता कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही १५१८ झाली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार यादरम्यान २६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत कोरोनामुले कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य