शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

Fact Check : Coronavirus: १५ ऑक्टोबरपर्यंत देशातील हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे आदेश?; काय आहे या मेसेजमागील सत्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 14:33 IST

कोरोना व्हायरसच्या या संकटकाळात सोशल मीडियातही अनेक अफवांना पेव फुटले आहे.

ठळक मुद्देदेशात कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येने सरकार चिंतेत लॉकडाऊन वाढवण्याबाबत केंद्र सरकार करतंय विचार सोशल मीडियात अनेक अफवांना पेव फुटला

नवी दिल्ली – भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना लॉकडाऊन वाढवणार की नाही याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. राज्य सरकारने दिलेल्या शिफारशीनुसार १४ एप्रिलनंतरही देशात लॉकडाऊन वाढवावा अशी मागणी केली आहे. मात्र केंद्र सरकारने अद्याप यावर स्पष्ट भूमिका घेतली नाही. तरीही लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत सरकारकडून मिळत आहेत.

कोरोना व्हायरसच्या या संकटकाळात सोशल मीडियातही अनेक अफवांना पेव फुटले आहे. चुकीचे मॅसेज लोकांकडून व्हायरल केले जात आहे. लॉकडाऊनबाबतही सोशल मीडियात मॅसेज व्हायरल होत आहेत. देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करुनही कोरोनाग्रस्तांची संख्या ५ हजारांच्या वर पोहचली आहे. तर १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊन वाढवण्याबाबत सोशल मीडियात एक मॅसेज व्हायरल होत आहे त्यात दावा केला आहे की, भारत सरकारने कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर देशातील हॉटेल, रेस्टॉरंट येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकारने हा मॅसेज चुकीचा असल्याचं सांगितलं आहे. संदेशात असणारा दावा निराधार असून भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने अशाप्रकारे कोणतेही आदेश दिले नाहीत. १४ एप्रिलनंतर देशात लॉकडाऊन हटवावा की नाही याबाबत सरकार परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी देशात मार्चमध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, सिनेमा हॉल बंद करण्यास सांगितले होते. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या ५ लाखांहून अधिक सदस्यांना ३१ मार्चपर्यंत भोजन सेवा बंद करण्याची सूचना केली होती. त्यानंतर पार्सल सेवा सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पीआयबीने याबाबत फॅक्ट चेक केलं असून हॉटेल्स, रेस्टॉरंटचे लॉकडाऊन वाढवण्याचे आदेश दिल्याचं खोटं आहे असं स्पष्टीकरण दिलं आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या