शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

Fact Check : Coronavirus: १५ ऑक्टोबरपर्यंत देशातील हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे आदेश?; काय आहे या मेसेजमागील सत्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 14:33 IST

कोरोना व्हायरसच्या या संकटकाळात सोशल मीडियातही अनेक अफवांना पेव फुटले आहे.

ठळक मुद्देदेशात कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येने सरकार चिंतेत लॉकडाऊन वाढवण्याबाबत केंद्र सरकार करतंय विचार सोशल मीडियात अनेक अफवांना पेव फुटला

नवी दिल्ली – भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना लॉकडाऊन वाढवणार की नाही याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. राज्य सरकारने दिलेल्या शिफारशीनुसार १४ एप्रिलनंतरही देशात लॉकडाऊन वाढवावा अशी मागणी केली आहे. मात्र केंद्र सरकारने अद्याप यावर स्पष्ट भूमिका घेतली नाही. तरीही लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत सरकारकडून मिळत आहेत.

कोरोना व्हायरसच्या या संकटकाळात सोशल मीडियातही अनेक अफवांना पेव फुटले आहे. चुकीचे मॅसेज लोकांकडून व्हायरल केले जात आहे. लॉकडाऊनबाबतही सोशल मीडियात मॅसेज व्हायरल होत आहेत. देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करुनही कोरोनाग्रस्तांची संख्या ५ हजारांच्या वर पोहचली आहे. तर १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊन वाढवण्याबाबत सोशल मीडियात एक मॅसेज व्हायरल होत आहे त्यात दावा केला आहे की, भारत सरकारने कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर देशातील हॉटेल, रेस्टॉरंट येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकारने हा मॅसेज चुकीचा असल्याचं सांगितलं आहे. संदेशात असणारा दावा निराधार असून भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने अशाप्रकारे कोणतेही आदेश दिले नाहीत. १४ एप्रिलनंतर देशात लॉकडाऊन हटवावा की नाही याबाबत सरकार परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी देशात मार्चमध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, सिनेमा हॉल बंद करण्यास सांगितले होते. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या ५ लाखांहून अधिक सदस्यांना ३१ मार्चपर्यंत भोजन सेवा बंद करण्याची सूचना केली होती. त्यानंतर पार्सल सेवा सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पीआयबीने याबाबत फॅक्ट चेक केलं असून हॉटेल्स, रेस्टॉरंटचे लॉकडाऊन वाढवण्याचे आदेश दिल्याचं खोटं आहे असं स्पष्टीकरण दिलं आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या