शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

coronavirus: ऑन ड्युटी गरिबांसाठी.... पोलीस ठाण्यातच महिला कर्मचारी शिजवतायंत अन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 12:41 IST

लॉकडाऊन असल्याने गरिब, मजूर आणि कामगार वर्गाची मोठी उपासमार होत आहे. तसेच, शहरातून आपल्या गावाकडे लोकं पळत आहेत. गावाकडे जाण्यासाठी रांगाच्या रांगा लागल्या आहेत.

मुंबई - कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग चिंतित आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या १२ तासांत भारतात १३१ नवे रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९६५ वर पोहोचली आहे. मात्र, यामधील १५१ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १७६४ इतका झाला आहे. तर, देशात आतापर्यंत कोरोनामुळे ५० जणांचा मृत्यू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने, या कठिण प्रसंगात अनेक ठिकाणी माणूसकीचे दर्शन घडत आहे.  

लॉकडाऊन असल्याने गरिब, मजूर आणि कामगार वर्गाची मोठी उपासमार होत आहे. तसेच, शहरातून आपल्या गावाकडे लोकं पळत आहेत. गावाकडे जाण्यासाठी रांगाच्या रांगा लागल्या आहेत. मात्र, नागरिकांनी आहे तिथेच राहावे असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. लॉकडाऊन असल्याने पोलिसांकडून नागरिकांना कायद्याचा धाक दाखवून घरातच बसण्याचे सूचविण्यात येत आहे. तर, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलिसांनाही मदतीचे हात पुढे येत आहेत. त्यामुळेच, जागोजागी माणूसकीचे दर्शन होत आहे. रायबरेली येथील एका पोलीस ठाण्यातील फोटो सध्या व्हायरल झाला आहे. कारण, या पोलीस ठाण्यातचं गरिबांसाठी भोजनगृह सुरु करण्यात आले आहे. गरिबांसाठी येथेच अन्न शिजविण्यात येत आहे. विशेष म्हणजे महिला पोलिसांनी यासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी माणूसकीचं मोठं उदाहरण देशापुढे ठेवले आहे. या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी वर्दीतली माणूसकी दाखवून दिलीय. 

विशेष म्हणजे येथील महिला पोलीस आपली ड्युटी करुन गरिबांसाठी ही सेवा देत आहेत. तसेच, या गरिबांना त्यांच्यापर्यंत पोहोचून ते अन्न वाटण्याचे काम ते करत आहेत. येथील पोलीस ठाण्याच्या प्रमुख संतोष सिंह यांच्या नियोजनात हे काम सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार राज्यातील कुणीही उपाशीपोटी झोपता कामा नये. त्यामुळेच, आम्ही गरजूंची भूक भागविण्याचं काम करत आहोत. रायबरेलीत कुणीही उपाशीपोटी झोपणार नाही, हे पाहणं आमचं कर्तव्य असल्याचं संतोष सिंह यांनी म्हटलं आहे. 

जलौन, उरई येथील महिला पोलीस ठाण्याच्या प्रमुख नीलेश कुमारी यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह गरिबांना फळे आणि अन्न पुरविण्याचं काम हाती घेतलं आहे. १४ एप्रिलपर्यंत गरजूंना अन्न पुरविण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे नीलेश कुमारी यांनी म्हटलं आहे.   

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशMumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या