शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ‘कोरोनामुळे उद्ध्वस्त झाली स्वप्ने, शहरात परतणार नाही,’ स्थलांतर करणाऱ्या मजुरांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 13:18 IST

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चार पैसे कमावण्याच्या आशेने शहरात आलेले मजुर आणि छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे असे लोक आता गावची वाट धरत आहेत.

ठळक मुद्देदिल्लीतून गावी गेल्यावर पुन्हा कधीही शहराकडे परतून येणार नाही, असे चहाचा व्यवसाय करणाऱ्या एका महिलेने सांगितले आहे.बिहारमधील पुर्णिया जिल्ह्यात राहणारी आशा देवी ही महिला मोठी स्वप्ने रंगवून दिल्लीत आली होती. कोरोना विषाणुचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे तिची सर्व स्वप्ने उद्ध्वस्त झाली आहेत

नवी दिल्ली - देशातील कोरोना विषाणूचे संकट आता अधिकच गंभीर झाले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला जबदरस्त धक्का बसला आहे. त्यातच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चार पैसे कमावण्याच्या आशेने शहरात आलेले मजुर आणि छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे असे लोक आता गावची वाट धरत आहेत. शहरात येऊन सुखी जीवन जगण्याची पोराबाळांच्या जीवनात थोडाफार आनंद आणण्याची अनेकांची स्वप्ने उद्ध्वस्त झाली आहेत. असे लोक आता कायमची गावची वाट धरण्याचा विचार करत आहेत. लॉकडाऊनमुळे आपली सर्व स्वप्ने उद्ध्वस्त झाली आहेत. आता दिल्लीतून गावी गेल्यावर पुन्हा कधीही शहराकडे परतून येणार नाही, असे चहाचा व्यवसाय करणाऱ्या एका महिलेने सांगितले आहे.

बिहारमधील पुर्णिया जिल्ह्यात राहणारी आशा देवी ही महिला मोठी स्वप्ने रंगवून दिल्लीत आली होती. येथील प्रीत विहार परिसरात चहा विकून ती गावापेक्षा अधिक कमाई करून लागली. मात्र कोरोना विषाणुचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे तिची सर्व स्वप्ने उद्ध्वस्त झाली आहेत. सध्या दिल्लीतील यमुना स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये तिला कुटुंबीयांसह हालाखीच्या अवस्थेत राहावे लागत आहे. त्यामुळे या सर्व प्रकारामुळे आशादेवी निराश झाली आहे. आता एकदा घरी पोहोचल्यावर पुन्हा दिल्लीत येणार नाही. मला आता पैशांची पर्वा नाही, अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 सध्याच्या घडीला दिल्लीत आशादेवींसारखे सुमारे ४० लाख हातावर पोट असलेले मजूर आहेत. कोरोनामुळे कोसळलेल्या अकल्पनीय संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांना आपल्या गावी जाण्याचे वेध लागले आहेत. या मजुरांकडून पुन्हा शहरात न परतण्याची भाषा करण्या येत असल्याने अर्थतज्ज्ञांची चिंता वाढली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे शहरात अडकलेल्या मजुरांना गावी पतण्याची परवानगी देऊन प्रवासाची व्यवस्था सरकारकडून करण्यात आल्याने या मजुरांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.  

अनेक मजूर मिळेल त्या साधनाने गावी परतत असले तरी काही मजूर मात्र शहरातच थांबले आहेत. सोबत दोन छोट्या मुली असल्याने पायी गावी जाण्याऐवजी सरकारी शेल्टर होममध्ये जाणे आपण पसंद केल्याचे हेमेश कुमार नावाचा एका कामगाराने सांगितले. मात्र सरकारने गावी जायची व्यवस्था केल्यास आपण गावी परतणार असून, त्यानंतर दिल्लीत परत येणार नसल्याचे त्याने सांगितले.

दरम्यान, दिल्लीसारख्या शहरात कमाई झाली तेवढी झाली. आता गावी परतायचे आहे. काम कुठेही मिळेलच. पण आता सध्याच्या परिस्थितीत कुटुंबाकडे परतायचे आहे, असेही काही मजुरांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था