शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

CoronaVirus: ‘कोरोनामुळे उद्ध्वस्त झाली स्वप्ने, शहरात परतणार नाही,’ स्थलांतर करणाऱ्या मजुरांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 13:18 IST

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चार पैसे कमावण्याच्या आशेने शहरात आलेले मजुर आणि छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे असे लोक आता गावची वाट धरत आहेत.

ठळक मुद्देदिल्लीतून गावी गेल्यावर पुन्हा कधीही शहराकडे परतून येणार नाही, असे चहाचा व्यवसाय करणाऱ्या एका महिलेने सांगितले आहे.बिहारमधील पुर्णिया जिल्ह्यात राहणारी आशा देवी ही महिला मोठी स्वप्ने रंगवून दिल्लीत आली होती. कोरोना विषाणुचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे तिची सर्व स्वप्ने उद्ध्वस्त झाली आहेत

नवी दिल्ली - देशातील कोरोना विषाणूचे संकट आता अधिकच गंभीर झाले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला जबदरस्त धक्का बसला आहे. त्यातच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चार पैसे कमावण्याच्या आशेने शहरात आलेले मजुर आणि छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे असे लोक आता गावची वाट धरत आहेत. शहरात येऊन सुखी जीवन जगण्याची पोराबाळांच्या जीवनात थोडाफार आनंद आणण्याची अनेकांची स्वप्ने उद्ध्वस्त झाली आहेत. असे लोक आता कायमची गावची वाट धरण्याचा विचार करत आहेत. लॉकडाऊनमुळे आपली सर्व स्वप्ने उद्ध्वस्त झाली आहेत. आता दिल्लीतून गावी गेल्यावर पुन्हा कधीही शहराकडे परतून येणार नाही, असे चहाचा व्यवसाय करणाऱ्या एका महिलेने सांगितले आहे.

बिहारमधील पुर्णिया जिल्ह्यात राहणारी आशा देवी ही महिला मोठी स्वप्ने रंगवून दिल्लीत आली होती. येथील प्रीत विहार परिसरात चहा विकून ती गावापेक्षा अधिक कमाई करून लागली. मात्र कोरोना विषाणुचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे तिची सर्व स्वप्ने उद्ध्वस्त झाली आहेत. सध्या दिल्लीतील यमुना स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये तिला कुटुंबीयांसह हालाखीच्या अवस्थेत राहावे लागत आहे. त्यामुळे या सर्व प्रकारामुळे आशादेवी निराश झाली आहे. आता एकदा घरी पोहोचल्यावर पुन्हा दिल्लीत येणार नाही. मला आता पैशांची पर्वा नाही, अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 सध्याच्या घडीला दिल्लीत आशादेवींसारखे सुमारे ४० लाख हातावर पोट असलेले मजूर आहेत. कोरोनामुळे कोसळलेल्या अकल्पनीय संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांना आपल्या गावी जाण्याचे वेध लागले आहेत. या मजुरांकडून पुन्हा शहरात न परतण्याची भाषा करण्या येत असल्याने अर्थतज्ज्ञांची चिंता वाढली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे शहरात अडकलेल्या मजुरांना गावी पतण्याची परवानगी देऊन प्रवासाची व्यवस्था सरकारकडून करण्यात आल्याने या मजुरांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.  

अनेक मजूर मिळेल त्या साधनाने गावी परतत असले तरी काही मजूर मात्र शहरातच थांबले आहेत. सोबत दोन छोट्या मुली असल्याने पायी गावी जाण्याऐवजी सरकारी शेल्टर होममध्ये जाणे आपण पसंद केल्याचे हेमेश कुमार नावाचा एका कामगाराने सांगितले. मात्र सरकारने गावी जायची व्यवस्था केल्यास आपण गावी परतणार असून, त्यानंतर दिल्लीत परत येणार नसल्याचे त्याने सांगितले.

दरम्यान, दिल्लीसारख्या शहरात कमाई झाली तेवढी झाली. आता गावी परतायचे आहे. काम कुठेही मिळेलच. पण आता सध्याच्या परिस्थितीत कुटुंबाकडे परतायचे आहे, असेही काही मजुरांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था