शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

CoronaVirus: 'इम्युनिटी'साठी औषधं, खास आहारामागे लागू नका, त्यापेक्षा...; 'पद्मश्री' डॉक्टरांचे मोलाचे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 12:48 IST

कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ आणि लहान मुलांना आहे. ज्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांचा जीव कोरोनामुळे जाण्याची शक्यता जास्त असते. 

नवी दिल्ली - सध्या कोरोना व्हायरसमुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. भारतात सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ आणि लहान मुलांना आहे. ज्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांचा जीव कोरोनामुळे जाण्याची शक्यता जास्त असते. 

मग ही इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी काय करावं लागतं याबाबत लोकमतचे दिल्लीचे प्रतिनिधी टेकचंद सोनावणे यांनी आयसीएमआरचे संशोधक पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांची मुलाखत घेतली आहे. यात डॉक्टरांनी सांगितले की, घरातील लोकांना रक्तदाबाची, मधुमेहाची किंवा हृदयरोगाची समस्या असेल तर त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी  सोशल डिस्टेंसिंग पाळणं गरजेचं आहे. हा आजार बरा करण्यासाठी कोणतंही औषध नाही तसंच लसही उपलब्ध नाही तेव्हा या आजाराचा धोका वाढवायचा नसेल तर कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. या आजाराची लक्षणं साधी आहेत. सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, त्यामुळे लोकांच्या मनात भीती बसली आहे. ज्यामुळे जोपर्यंत जोखीम असेल तोपर्यंत तपासणी करून घेणं गरजेचं आहे. खासगी लॅबमध्ये पैसे जास्त जातात पण आरोग्यासाठी लवकरात लवकर चाचणी होणं गरेजेचे आहे असे ते म्हणाले. 

तसेच आजार जरी पटकन पसरणारा असला तरी मृत्यू दर कमी असू शकतो. कारण लॉकडाऊनची स्थिती ही सामान्य नाही. याआधी कधी सरकारने असं केल्याचं आपल्या ऐकण्यात नाही. कोरोनापासून वाचण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा नाही तर संपूर्ण समाजाचा विचार करणं गरजेचं आहे. जे लोक लॉकडाऊन पाळत नाहीत अशा व्यक्तींना लॉकडाऊनचं महत्व समजावून सांगणं, त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. जेव्हा आपण सरकारच्या आदेशाचं पालन न करता घराबाहेर पडतो. तेव्हा आपण आजाराला स्वतःच्या घरी येण्यासाठी निमंत्रण देतो. त्यामुळे समाज सुरक्षित राहणार नाही पण कुटुंबियांनां आणि प्रियजनानां सुद्धा आपण धोक्यात  घालत असतो. अशावेळी लॉकडाऊन पाळणं गरजेचं आहे असं डॉ. रमन गंगाखेडकर यांनी सांगितले.

दरम्यान, लोकांना असं वाटतयं की रोगप्रतिकारकशक्ती वाढवल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही. त्यासाठी लोक वेगवेगळे औषधं, गोळ्या आणि खाण्याचे पदार्थ बदलत आहेत. पण हे करण्यात अर्थ नाही. नको त्या गोष्टींचं पालन करण्यापेक्षा सरकार जे सांगत आहे त्या गोष्टींचं पालन केलं तर आपल्याला कोरोनावर मात करता येईल. यामध्ये आपल्याला जेवढा धोका वाटतो त्यापेक्षा जास्त धोका डॉक्टर, नर्स जे लोक उपाचार आणि तपासणी करत आहेत त्यांना आहे. लोकांचा जीव वाचवण्यासाठी ते प्रयत्न करतायेत. साध्या गोष्टींसाठी घाबरून जाऊ नका. मास्कचा सरसकट वापर करण्याची गरज नाही. आरोग्य विभागाशी निगडीत असाल तर मास्कचा वापर केलाच पाहिजे. सॅनिटायजर वापरण्यापेक्षा साबणाने स्वतःचा  हातअर्धा मिनिट धुतला तरी आजारापासून लांब राहता येऊ शकतं. लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं.

पाहा व्हिडीओ - 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य