शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

CoronaVirus: 'इम्युनिटी'साठी औषधं, खास आहारामागे लागू नका, त्यापेक्षा...; 'पद्मश्री' डॉक्टरांचे मोलाचे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 12:48 IST

कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ आणि लहान मुलांना आहे. ज्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांचा जीव कोरोनामुळे जाण्याची शक्यता जास्त असते. 

नवी दिल्ली - सध्या कोरोना व्हायरसमुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. भारतात सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ आणि लहान मुलांना आहे. ज्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांचा जीव कोरोनामुळे जाण्याची शक्यता जास्त असते. 

मग ही इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी काय करावं लागतं याबाबत लोकमतचे दिल्लीचे प्रतिनिधी टेकचंद सोनावणे यांनी आयसीएमआरचे संशोधक पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांची मुलाखत घेतली आहे. यात डॉक्टरांनी सांगितले की, घरातील लोकांना रक्तदाबाची, मधुमेहाची किंवा हृदयरोगाची समस्या असेल तर त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी  सोशल डिस्टेंसिंग पाळणं गरजेचं आहे. हा आजार बरा करण्यासाठी कोणतंही औषध नाही तसंच लसही उपलब्ध नाही तेव्हा या आजाराचा धोका वाढवायचा नसेल तर कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. या आजाराची लक्षणं साधी आहेत. सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, त्यामुळे लोकांच्या मनात भीती बसली आहे. ज्यामुळे जोपर्यंत जोखीम असेल तोपर्यंत तपासणी करून घेणं गरजेचं आहे. खासगी लॅबमध्ये पैसे जास्त जातात पण आरोग्यासाठी लवकरात लवकर चाचणी होणं गरेजेचे आहे असे ते म्हणाले. 

तसेच आजार जरी पटकन पसरणारा असला तरी मृत्यू दर कमी असू शकतो. कारण लॉकडाऊनची स्थिती ही सामान्य नाही. याआधी कधी सरकारने असं केल्याचं आपल्या ऐकण्यात नाही. कोरोनापासून वाचण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा नाही तर संपूर्ण समाजाचा विचार करणं गरजेचं आहे. जे लोक लॉकडाऊन पाळत नाहीत अशा व्यक्तींना लॉकडाऊनचं महत्व समजावून सांगणं, त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. जेव्हा आपण सरकारच्या आदेशाचं पालन न करता घराबाहेर पडतो. तेव्हा आपण आजाराला स्वतःच्या घरी येण्यासाठी निमंत्रण देतो. त्यामुळे समाज सुरक्षित राहणार नाही पण कुटुंबियांनां आणि प्रियजनानां सुद्धा आपण धोक्यात  घालत असतो. अशावेळी लॉकडाऊन पाळणं गरजेचं आहे असं डॉ. रमन गंगाखेडकर यांनी सांगितले.

दरम्यान, लोकांना असं वाटतयं की रोगप्रतिकारकशक्ती वाढवल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही. त्यासाठी लोक वेगवेगळे औषधं, गोळ्या आणि खाण्याचे पदार्थ बदलत आहेत. पण हे करण्यात अर्थ नाही. नको त्या गोष्टींचं पालन करण्यापेक्षा सरकार जे सांगत आहे त्या गोष्टींचं पालन केलं तर आपल्याला कोरोनावर मात करता येईल. यामध्ये आपल्याला जेवढा धोका वाटतो त्यापेक्षा जास्त धोका डॉक्टर, नर्स जे लोक उपाचार आणि तपासणी करत आहेत त्यांना आहे. लोकांचा जीव वाचवण्यासाठी ते प्रयत्न करतायेत. साध्या गोष्टींसाठी घाबरून जाऊ नका. मास्कचा सरसकट वापर करण्याची गरज नाही. आरोग्य विभागाशी निगडीत असाल तर मास्कचा वापर केलाच पाहिजे. सॅनिटायजर वापरण्यापेक्षा साबणाने स्वतःचा  हातअर्धा मिनिट धुतला तरी आजारापासून लांब राहता येऊ शकतं. लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं.

पाहा व्हिडीओ - 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य