शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: 'इम्युनिटी'साठी औषधं, खास आहारामागे लागू नका, त्यापेक्षा...; 'पद्मश्री' डॉक्टरांचे मोलाचे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 12:48 IST

कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ आणि लहान मुलांना आहे. ज्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांचा जीव कोरोनामुळे जाण्याची शक्यता जास्त असते. 

नवी दिल्ली - सध्या कोरोना व्हायरसमुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. भारतात सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ आणि लहान मुलांना आहे. ज्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांचा जीव कोरोनामुळे जाण्याची शक्यता जास्त असते. 

मग ही इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी काय करावं लागतं याबाबत लोकमतचे दिल्लीचे प्रतिनिधी टेकचंद सोनावणे यांनी आयसीएमआरचे संशोधक पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांची मुलाखत घेतली आहे. यात डॉक्टरांनी सांगितले की, घरातील लोकांना रक्तदाबाची, मधुमेहाची किंवा हृदयरोगाची समस्या असेल तर त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी  सोशल डिस्टेंसिंग पाळणं गरजेचं आहे. हा आजार बरा करण्यासाठी कोणतंही औषध नाही तसंच लसही उपलब्ध नाही तेव्हा या आजाराचा धोका वाढवायचा नसेल तर कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. या आजाराची लक्षणं साधी आहेत. सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, त्यामुळे लोकांच्या मनात भीती बसली आहे. ज्यामुळे जोपर्यंत जोखीम असेल तोपर्यंत तपासणी करून घेणं गरजेचं आहे. खासगी लॅबमध्ये पैसे जास्त जातात पण आरोग्यासाठी लवकरात लवकर चाचणी होणं गरेजेचे आहे असे ते म्हणाले. 

तसेच आजार जरी पटकन पसरणारा असला तरी मृत्यू दर कमी असू शकतो. कारण लॉकडाऊनची स्थिती ही सामान्य नाही. याआधी कधी सरकारने असं केल्याचं आपल्या ऐकण्यात नाही. कोरोनापासून वाचण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा नाही तर संपूर्ण समाजाचा विचार करणं गरजेचं आहे. जे लोक लॉकडाऊन पाळत नाहीत अशा व्यक्तींना लॉकडाऊनचं महत्व समजावून सांगणं, त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. जेव्हा आपण सरकारच्या आदेशाचं पालन न करता घराबाहेर पडतो. तेव्हा आपण आजाराला स्वतःच्या घरी येण्यासाठी निमंत्रण देतो. त्यामुळे समाज सुरक्षित राहणार नाही पण कुटुंबियांनां आणि प्रियजनानां सुद्धा आपण धोक्यात  घालत असतो. अशावेळी लॉकडाऊन पाळणं गरजेचं आहे असं डॉ. रमन गंगाखेडकर यांनी सांगितले.

दरम्यान, लोकांना असं वाटतयं की रोगप्रतिकारकशक्ती वाढवल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही. त्यासाठी लोक वेगवेगळे औषधं, गोळ्या आणि खाण्याचे पदार्थ बदलत आहेत. पण हे करण्यात अर्थ नाही. नको त्या गोष्टींचं पालन करण्यापेक्षा सरकार जे सांगत आहे त्या गोष्टींचं पालन केलं तर आपल्याला कोरोनावर मात करता येईल. यामध्ये आपल्याला जेवढा धोका वाटतो त्यापेक्षा जास्त धोका डॉक्टर, नर्स जे लोक उपाचार आणि तपासणी करत आहेत त्यांना आहे. लोकांचा जीव वाचवण्यासाठी ते प्रयत्न करतायेत. साध्या गोष्टींसाठी घाबरून जाऊ नका. मास्कचा सरसकट वापर करण्याची गरज नाही. आरोग्य विभागाशी निगडीत असाल तर मास्कचा वापर केलाच पाहिजे. सॅनिटायजर वापरण्यापेक्षा साबणाने स्वतःचा  हातअर्धा मिनिट धुतला तरी आजारापासून लांब राहता येऊ शकतं. लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं.

पाहा व्हिडीओ - 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य