शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

coronavirus: देशांतर्गत विमान सेवा सुरू होण्याच्या बेतात,  मंत्री पुरी यांचा अहवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 06:32 IST

उड्डयन मंत्रालयाने टास्क फोर्स आणि मंत्रीगटाला हे सांगितले आहे की, देशांतर्गत उड्डाणे आता आणखी विलंब न लावता सुरू करणे ही तातडीची गरज आहे. विमान कंपन्या, विमानतळे आणि त्यांच्याशी संबंधित इतर अनेकांचे २४ मार्चपासून अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

नवी दिल्ली : नजीकच्या भविष्यात भारतात ‘संपर्क विरहित’ विमानसेवा सुरू करण्याच्या योजनेला अंतिम स्वरूप येत आहे. नागरी उड्डयनमंत्री हरदीप पुरी हे अर्थव्यवस्थेचे चाक पुन्हा हळूहळू का असेना सुरू व्हावे यासाठी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांच्या या योजनेवर दिवसरात्र काम करीत आहेत.उड्डयन मंत्रालयाने टास्क फोर्स आणि मंत्रीगटाला हे सांगितले आहे की, देशांतर्गत उड्डाणे आता आणखी विलंब न लावता सुरू करणे ही तातडीची गरज आहे. विमान कंपन्या, विमानतळे आणि त्यांच्याशी संबंधित इतर अनेकांचे २४ मार्चपासून अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. आता रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे आणि हळूहळू का असेना विमान सेवेला सक्रिय होण्याची मुभा दिली गेली आहे.ज्या राज्यांतून प्रवासी पाठवला जाणार आहे आणि ज्या राज्यात तो स्वीकारला जाणार आहे आणि या दोन्ही राज्यांना स्थानिक प्रवाशांची सोय करण्याची मुभा दिली गेली आहे तेथेच हवाई सेवा सुरू केली जाईल व अशा राज्यांच्या संपर्कात नागरी उड्डयन मंत्रालय आहे. विमानातील मध्यभागीच्या सीटबद्दल (मिडल सीट) हरदीप पुरी यांनी स्पष्ट केल्याचे समजते की, जगात कोठेही नागरी उड्डयन क्षेत्रात मधले सीट रिकामे ठेवण्याचा पर्याय नाही. पुरी असेही म्हणाले की, मधले सीट रिकामे ठेवले तरी इकॉनॉमी क्लासच्या मांडणीत आईल सीट आणि खिडकीकडील सीट यांच्यातील अंतर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नाही. त्यामुळे विमान कंपन्यांना असे सांगण्यात आले आहे की, त्यांनी प्रवासी आणि विमान कंपन्यांसाठी नवे प्रतिबंधात्मक उपाय पाळता येतील अशी कल्पक उपाययोजना करावी.सगळ्या प्रवाशांना त्यांचे वेब चेक-इन घरी पूर्ण झाल्यानंतरच विमानतळावर येण्याचा नियम बंधनकारक करण्यात आला आहे. विमानतळावरील रिपोर्टिंग वेळ दोन तासांनी वाढवून देण्याचा प्रस्ताव आहे. काय काय करता येईल यासाठी मंत्रालय विमान कंपन्यांबरोबर काम करीत आहे. स्टँडर्ड आॅपरेटिंग प्रोसिजर्स (एसओपी) ठरवली जातआहे. विमान कंपन्या, विमानतळ चालक, सुरक्षा अधिकारी, उद्योग संघटना यांनाही विश्वासात घेतले जात आहे.जोखीम आहेच, पण...मिळालेल्या माहितीनुसार हरदीप पुरी यांनी जगातील उत्तम खबरदारीचे उपाय असलेला तपशीलवार अहवाल सादर केला आहे. त्यात विमानतळाबाहेर प्रवाशांची स्क्रिनिंग, विमानात आल्यावर स्क्रिनिंग आणि आगमन झाल्यावर १४ दिवसांचे क्वारंटाईनचा समावेश आहे.तथापि, पुरी यांनी हे मान्य केले की, देशांतर्गत विमानसेवा सुरू करणे यात काहीशी जोखीम आहेच; परंतु आता आम्हाला कोरोनासह जगायचे कसे, याची सवय लावून घ्यावी लागेल, असे ते म्हणाल्याचे वृत्त आहे. दुसरे म्हणजे देशांतर्गत विमान प्रवास हा काही घाऊक प्रमाणात सुरू केला जाणार नाही, तर तो मोजून मापून असेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतairplaneविमान