शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

coronavirus: देशांतर्गत विमान सेवा सुरू होण्याच्या बेतात,  मंत्री पुरी यांचा अहवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 06:32 IST

उड्डयन मंत्रालयाने टास्क फोर्स आणि मंत्रीगटाला हे सांगितले आहे की, देशांतर्गत उड्डाणे आता आणखी विलंब न लावता सुरू करणे ही तातडीची गरज आहे. विमान कंपन्या, विमानतळे आणि त्यांच्याशी संबंधित इतर अनेकांचे २४ मार्चपासून अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

नवी दिल्ली : नजीकच्या भविष्यात भारतात ‘संपर्क विरहित’ विमानसेवा सुरू करण्याच्या योजनेला अंतिम स्वरूप येत आहे. नागरी उड्डयनमंत्री हरदीप पुरी हे अर्थव्यवस्थेचे चाक पुन्हा हळूहळू का असेना सुरू व्हावे यासाठी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांच्या या योजनेवर दिवसरात्र काम करीत आहेत.उड्डयन मंत्रालयाने टास्क फोर्स आणि मंत्रीगटाला हे सांगितले आहे की, देशांतर्गत उड्डाणे आता आणखी विलंब न लावता सुरू करणे ही तातडीची गरज आहे. विमान कंपन्या, विमानतळे आणि त्यांच्याशी संबंधित इतर अनेकांचे २४ मार्चपासून अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. आता रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे आणि हळूहळू का असेना विमान सेवेला सक्रिय होण्याची मुभा दिली गेली आहे.ज्या राज्यांतून प्रवासी पाठवला जाणार आहे आणि ज्या राज्यात तो स्वीकारला जाणार आहे आणि या दोन्ही राज्यांना स्थानिक प्रवाशांची सोय करण्याची मुभा दिली गेली आहे तेथेच हवाई सेवा सुरू केली जाईल व अशा राज्यांच्या संपर्कात नागरी उड्डयन मंत्रालय आहे. विमानातील मध्यभागीच्या सीटबद्दल (मिडल सीट) हरदीप पुरी यांनी स्पष्ट केल्याचे समजते की, जगात कोठेही नागरी उड्डयन क्षेत्रात मधले सीट रिकामे ठेवण्याचा पर्याय नाही. पुरी असेही म्हणाले की, मधले सीट रिकामे ठेवले तरी इकॉनॉमी क्लासच्या मांडणीत आईल सीट आणि खिडकीकडील सीट यांच्यातील अंतर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नाही. त्यामुळे विमान कंपन्यांना असे सांगण्यात आले आहे की, त्यांनी प्रवासी आणि विमान कंपन्यांसाठी नवे प्रतिबंधात्मक उपाय पाळता येतील अशी कल्पक उपाययोजना करावी.सगळ्या प्रवाशांना त्यांचे वेब चेक-इन घरी पूर्ण झाल्यानंतरच विमानतळावर येण्याचा नियम बंधनकारक करण्यात आला आहे. विमानतळावरील रिपोर्टिंग वेळ दोन तासांनी वाढवून देण्याचा प्रस्ताव आहे. काय काय करता येईल यासाठी मंत्रालय विमान कंपन्यांबरोबर काम करीत आहे. स्टँडर्ड आॅपरेटिंग प्रोसिजर्स (एसओपी) ठरवली जातआहे. विमान कंपन्या, विमानतळ चालक, सुरक्षा अधिकारी, उद्योग संघटना यांनाही विश्वासात घेतले जात आहे.जोखीम आहेच, पण...मिळालेल्या माहितीनुसार हरदीप पुरी यांनी जगातील उत्तम खबरदारीचे उपाय असलेला तपशीलवार अहवाल सादर केला आहे. त्यात विमानतळाबाहेर प्रवाशांची स्क्रिनिंग, विमानात आल्यावर स्क्रिनिंग आणि आगमन झाल्यावर १४ दिवसांचे क्वारंटाईनचा समावेश आहे.तथापि, पुरी यांनी हे मान्य केले की, देशांतर्गत विमानसेवा सुरू करणे यात काहीशी जोखीम आहेच; परंतु आता आम्हाला कोरोनासह जगायचे कसे, याची सवय लावून घ्यावी लागेल, असे ते म्हणाल्याचे वृत्त आहे. दुसरे म्हणजे देशांतर्गत विमान प्रवास हा काही घाऊक प्रमाणात सुरू केला जाणार नाही, तर तो मोजून मापून असेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतairplaneविमान