शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

coronavirus: केवळ ग्रीन झोनमधील शहरांसाठीच सुरू होणार देशांतर्गत विमान वाहतूक, केंद्रीय विमान वाहतूकमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 07:45 IST

१७ मेनंतर लॉकडाऊन उठल्यानंतर देशातील व्यापारी विमान वाहतूक सुरू करण्याबाबत विमान मंत्रालयाने विविध कंपन्यांसोबत बोलणी सुरू केली आहे. परंतु हे टप्प्याटप्प्यानेच केले जाईल.

नवी दिल्ली : लॉकडाऊननंतर देशांतर्गत विमान वाहतूक ज्यावेळी उड्डाणाचे आणि उतरण्याचे ठिकाण असलेली दोन्ही शहरे ग्रीन झोनमध्ये वर्ग केलेली असतील, तेव्हाच सुरू केली जाईल, असे केंद्रीय विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.कोरोनाचा संसर्ग कमी जास्त होत असल्याने अनेक शहरांचे झोनमध्ये करण्यात आलेले वर्गीकरणही सतत बदलत असल्याने देशांतर्गत विमान वाहतूक सुरू करणे हे मोठे आव्हानात्मक काम असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.  १७ मेनंतर लॉकडाऊन उठल्यानंतर देशातील व्यापारी विमान वाहतूक सुरू करण्याबाबत विमान मंत्रालयाने विविध कंपन्यांसोबत बोलणी सुरू केली आहे. परंतु हे टप्प्याटप्प्यानेच केले जाईल. सुरुवातीला देशांतर्गत विमान वाहतूक सुरू केली जाईल. पुढच्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू करण्याचा विचार केला जाईल, असे पुरी म्हणाले.विमान मंत्रालयाने विदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाची ६४ विमाने सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यात जवळपास १.९ लाख भारतीयांना परत आणले जाणार आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी बचाव मोहीम असणारआहे.जगभरात साथ सुरू असल्यामुळे सर्वच देशांतील विमान वाहतूक ठप्प आहे. आंतरराष्टÑीय विमान वाहतूकही बंद असून, ती सुरू होण्याबाबत अनिश्चितता आहे. (वृत्तसंस्था)सोशल डिस्टन्सिंगमुळे तिकिटे महागणार?च्विमानात प्रवासी वाहतूक करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबतही सरकार चर्चा करीत आहे. मात्र कंपन्यांनीही स्पष्ट केले आहे की, या कारणासाठी विमानात काही सीट्स रिकामे ठेवण्याचा निर्णय घेतला तर यासाठी प्रवाशांकडून अधिक तिकीट आकारावे लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याairplaneविमानIndiaभारत