शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
4
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
5
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
6
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
7
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
8
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
9
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
10
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
11
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
12
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
13
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
14
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
15
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
16
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
17
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
18
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
19
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
20
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : 'लॉकडाऊन कालावधीनंतरही जिल्ह्यांच्या सीमा १५ दिवसांसाठी बंदच राहणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 10:08 IST

देशातील सर्वच प्रशासकीय यंत्रणांना यांसदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाच्या सचिवांनी देशातील सर्व पोलीस अधिक्षक, सर्व जिल्हाधिकारी, सरकारी डॉक्टर्स

मुंबई - कोरोना साथीपायी पुकारलेल्या टाळेबंदीची मुदत १४ एप्रिलला संपत असून त्यानंतर या देशात साथीची मोठ्या प्रमाणावर लागण झालेले विभाग व प्रतिरोधक विभाग (बफर झोन), असे दोन विभाग केंद्र सरकारकडून पाडण्यात येतील. तेथील कोरोनाची साथ संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येणार आहेत. या दोन विभागांमध्ये काही ठिकाणी टाळेबंदी हटविली जाईल तर काही ठिकाणी कोरोनाचे निर्मूलन होईपर्यंत ती कायम राहाणार आहे. आता, लॉकडाऊननंतरही अनेक जिल्ह्यांच्या सीमा १५ दिवसांसाठी बंदच राहतील, अशी माहिती आहे. 

देशातील सर्वच प्रशासकीय यंत्रणांना यांसदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाच्या सचिवांनी देशातील सर्व पोलीस अधिक्षक, सर्व जिल्हाधिकारी, सरकारी डॉक्टर्स आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फेरेन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी, ४ विविध प्रकारचे प्रेझेंटेनन झाले. त्यानंतर, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केवळ सोशल डिस्टन्सिंग वाढवत नेणे, हाच सक्षम पर्याय असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार, ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, त्या जिल्ह्यात सोशल डिस्टंन्सिंगवर भर देणे व ज्या जिल्ह्यात प्रादुर्भाव नाही, तेथे पोहोचू नये, यासाठी या जिल्ह्यांच्या सीमा दोन आठवड्यांसाठी सील करणे हा निर्णय झाल्याची माहिती आहे. वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा जिल्हा पातळीवरील सरकारी रुग्णालयांना करण्यात येत आहे, तसेच हायड्रोक्लोराक्साईड गोळ्यांचाही पुरवठा जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे. याबाबत एपीबी माझाने वृत्त दिले आहे. 

दरम्यान, २००९ साली आलेली एच१एन१ची साथ एका शहरातून दुसऱ्या शहरात मोठ्या प्रमाणावर पसरली होती. त्या तुलनेत या साथीने ग्रामीण भागात कमी लोकसंख्या असलेल्या प्रदेशांत इतका हाहाकार माजविला नव्हता. हे उदाहरण डोळ्यासमोर असल्यामुळे कोरोनाशी मुकाबला करताना देशातील विविध भागांमध्ये तेथील परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे धोरण केंद्र सरकार अवलंबणार आहे.

यासंदर्भात केंद्र सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, जिथे लोकसंख्या जास्त व कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर आहे तिथे घातलेल्या निर्बंधांचे अतिशय कडक पालन केले जाईल. अशा ठिकाणची टाळेबंदी १४ एप्रिलनंतरही उठविली जाणार नाही. देशात कोरोना विषाणूची साथ अजूनतरी नियंत्रणात असून ती सुदैवाने सामुहिक संसर्गाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली नाही. टाळेबंदीची मुदत संपेपर्यंत जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर केंद्र सरकार दोन विभाग पाडून आपले काम सुरू करेल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMumbaiमुंबईGovernmentसरकारPoliceपोलिस