शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : 'लॉकडाऊन कालावधीनंतरही जिल्ह्यांच्या सीमा १५ दिवसांसाठी बंदच राहणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 10:08 IST

देशातील सर्वच प्रशासकीय यंत्रणांना यांसदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाच्या सचिवांनी देशातील सर्व पोलीस अधिक्षक, सर्व जिल्हाधिकारी, सरकारी डॉक्टर्स

मुंबई - कोरोना साथीपायी पुकारलेल्या टाळेबंदीची मुदत १४ एप्रिलला संपत असून त्यानंतर या देशात साथीची मोठ्या प्रमाणावर लागण झालेले विभाग व प्रतिरोधक विभाग (बफर झोन), असे दोन विभाग केंद्र सरकारकडून पाडण्यात येतील. तेथील कोरोनाची साथ संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येणार आहेत. या दोन विभागांमध्ये काही ठिकाणी टाळेबंदी हटविली जाईल तर काही ठिकाणी कोरोनाचे निर्मूलन होईपर्यंत ती कायम राहाणार आहे. आता, लॉकडाऊननंतरही अनेक जिल्ह्यांच्या सीमा १५ दिवसांसाठी बंदच राहतील, अशी माहिती आहे. 

देशातील सर्वच प्रशासकीय यंत्रणांना यांसदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाच्या सचिवांनी देशातील सर्व पोलीस अधिक्षक, सर्व जिल्हाधिकारी, सरकारी डॉक्टर्स आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फेरेन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी, ४ विविध प्रकारचे प्रेझेंटेनन झाले. त्यानंतर, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केवळ सोशल डिस्टन्सिंग वाढवत नेणे, हाच सक्षम पर्याय असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार, ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, त्या जिल्ह्यात सोशल डिस्टंन्सिंगवर भर देणे व ज्या जिल्ह्यात प्रादुर्भाव नाही, तेथे पोहोचू नये, यासाठी या जिल्ह्यांच्या सीमा दोन आठवड्यांसाठी सील करणे हा निर्णय झाल्याची माहिती आहे. वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा जिल्हा पातळीवरील सरकारी रुग्णालयांना करण्यात येत आहे, तसेच हायड्रोक्लोराक्साईड गोळ्यांचाही पुरवठा जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे. याबाबत एपीबी माझाने वृत्त दिले आहे. 

दरम्यान, २००९ साली आलेली एच१एन१ची साथ एका शहरातून दुसऱ्या शहरात मोठ्या प्रमाणावर पसरली होती. त्या तुलनेत या साथीने ग्रामीण भागात कमी लोकसंख्या असलेल्या प्रदेशांत इतका हाहाकार माजविला नव्हता. हे उदाहरण डोळ्यासमोर असल्यामुळे कोरोनाशी मुकाबला करताना देशातील विविध भागांमध्ये तेथील परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे धोरण केंद्र सरकार अवलंबणार आहे.

यासंदर्भात केंद्र सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, जिथे लोकसंख्या जास्त व कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर आहे तिथे घातलेल्या निर्बंधांचे अतिशय कडक पालन केले जाईल. अशा ठिकाणची टाळेबंदी १४ एप्रिलनंतरही उठविली जाणार नाही. देशात कोरोना विषाणूची साथ अजूनतरी नियंत्रणात असून ती सुदैवाने सामुहिक संसर्गाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली नाही. टाळेबंदीची मुदत संपेपर्यंत जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर केंद्र सरकार दोन विभाग पाडून आपले काम सुरू करेल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMumbaiमुंबईGovernmentसरकारPoliceपोलिस