शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

Coronavirus: पंजाबच्या 'बॉर्डर'वर जमली गर्दी, हिमाचली नागरिकांची होणार होती घरवापसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 11:24 IST

घरवापसीच्या उत्साहात हिमाचली नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासल्याचे दिसून आले. त्यामुळे, येथील पोलीस कर्मचाऱ्यांना परिस्थिती हाताळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागला

चंढीगड - देशात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र, सोमवारी पंजाबमधील नंगल येथे संचारबंदी असतानाही लोकांची मोठी गर्दी जमा जाली होती. पंजाब-हिमाचल बॉर्डवर लोक बॉर्डर पार करण्यासाठी एकत्र आले होते. हिमाचल प्रदेशच्या सरकारने हिमाचली नागरिकांना आणण्यासाठी ऑनलाईन पास जारी केले आहेत. मात्र, पंजाब सरकारसोबत यासंदर्भात योग्य ताळमेळ नसल्याने सीमारेषेवर गोंधळ उडाला. कारण, नंगर सीमारेषेवर हजारो लोकं एकत्र जमा झाले होते. 

घरवापसीच्या उत्साहात हिमाचली नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासल्याचे दिसून आले. त्यामुळे, येथील पोलीस कर्मचाऱ्यांना परिस्थिती हाताळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागला. हिमाचल सरकाने ऑनलाईन पास जारी केल्याने रविवारी रात्रीपासूनच सीमारेषेवर लोकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. सकाळ होताच, हजारोंच्या संख्येने नागरिक येथे पोहोचल्याने गोंधळ उडाला. तेथील स्थानिक पोलिसांनाही या घटनेचा आणि लोकांच्या गर्दीचा अंदाज आला नाही. मात्र, लोकांची संख्या पाहून पोलिसांनी वरिष्ठांशी संपर्क साधला. यावेळी, नागरिका आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. 

सीमारेषेवर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या, तर सोशल डिस्टन्सिंगचे कुठेही पालन होताना दिसत नव्हते. येथे पोलीस आणि आरोग्य विभागाचे पथक तैनात करण्यात आले होते. या पथकांकडून प्रत्येक नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात येत होती. मात्र, गर्दीमुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं दिसून आलं. याचा त्रास पोलीस आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहन करावा लागला. दुसरीकडे चंढीगड येथूनही मोठ्या प्रमाणात हिमाचली नागरिकांना परत पाठविण्यात आले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चंढीगड येथे अडकलेल्या हिमाचली विद्यार्थ्यांसाठी सरकारने गाड्या पाठवल्या होत्या, त्यातून त्यांनी घरवापसी करण्यात आली. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील बांद्रा येथेही अशाच प्रकारे गर्दी जमा झाली होती. परप्रांतीय नागरिकांनी आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी केली होती. यावेळी २ त ३ हजार लोकं एकत्र जमले होते. अखेर, पोलिसांनी सर्वांना परत पाठवले. या घटनांवरुन अद्यापही आपल्या गावी, घराकडे जाण्याची आस लावून अनेक नागरिक असल्याचे दिसून येते.  

टॅग्स :chandigarh-pcचंडीगढ़PoliceपोलिसPunjabपंजाबBorderसीमारेषाcorona virusकोरोना वायरस बातम्या