शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

CoronaVirus News: कोरोनाचा असाही परिणाम; तब्बल २६ कोटी भारतीयांची चिंता वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 14:54 IST

CoronaVirus News: कोरोना, लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट; सरकारसह संपूर्ण देशाची चिंता वाढणार

नवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन जाहीर केला. गेल्या ५० हून अधिक दिवस देश लॉकडाऊन आहे. या काळात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असून कोट्यवधी मजूर आणि कामगारांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे ठप्प झाल्यानं अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे येत्या काळात देशातल्या २६ कोटी जनतेचा समावेश गरीब वर्गात होऊ शकते, अशी भीती संयुक्त राष्ट्र आणि ऑक्सफर्डच्या गरिबी आणि मानवी विकास उपक्रमातून (ओपीएचआय) व्यक्त करण्यात आली आहे. २००६ ते २०१६ या कालावधीत भारतातील २७.१ कोटी जनता गरिबीतून बाहेर आल्याची आकडेवारी संयुक्त राष्ट्राच्या विकास कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या गरिबी निर्देशाकातून समोर आली होती. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ओपीएचआयसोबत याबद्दलचा अभ्यास करण्यात आला होता. सर्वाधिक वेगानं गरिबी हटवणाऱ्या पहिल्या दहा देशांच्या यादीत भारताचा समावेश होता. यानंतर भारतामधील गरिबांची संख्या ३६.९ कोटी असल्याचं संयुक्त राष्ट्रानं सांगितलं होतं.  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देशव्यापी लॉकडाऊन लागू झाला. त्यामुळे उद्योगधंदे ठप्प झाल्यानं कोट्यवधी लोकांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. यामध्ये हातावर पोट असलेल्या मजूर आणि कामगारांचं प्रमाण अतिशय मोठं आहे. या लॉकडाऊनमुळे भारतामधील २६ कोटी लोक गरिबीच्या खाईत लोटले जातील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या दारिद्र्यरेषेच्या वर असलेले लोक लॉकडाऊनमुळे दारिद्र्यरेषेखाली जातील, असा अंदाज ओपीएचआयच्या संशोधकांनी वर्तवला आहे. राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला; ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णयजाणून घ्या, महाराष्ट्रातील लॉकडाऊन 4.0मध्ये काय सुरू अन् काय बंद?मनरेगासाठी अतिरिक्त ४० हजार कोटी देणार; केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा'आम्ही आहोत'! लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे हेल्पलाईन नंबर; लिहून ठेवा...आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळाणार ५० लाखांचा विमा; केंद्र सरकारची मोठी घोषणा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या