शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: त्यामुळे भारतात वेगाने होतोय कोरोनाचा फैलाव, तज्ज्ञांनी सांगितली ही चार कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 12:29 IST

Coronavirus in India : फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. आता एप्रिल महिन्याच्या अखेरीस देशात कोरोना संसर्गाची सर्वोच्च पातळी गाठेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने भारतात सध्या धुमाकूळ घातला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी कोरोना विषाणूचा भारतात प्रचंड वेगाने फैलाव होत आहे. (Coronavirus in India) गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १ लाख ६१ हजार रुग्ण सापडले आहेत. तर ८७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावर्षी जानेवारीमध्ये देशातील कोरोनाच्या संसर्गाचा वेग कमालीचा मंदावला होता. मात्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. आता एप्रिल महिन्याच्या अखेरीस देशात कोरोना संसर्गाची सर्वोच्च पातळी गाठेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतात कोरोनाचा फैलाव नेमका का वेगाने होतोय. याबाबत तज्ज्ञांनी चार कारणे सांगितली आहेत. ती कारणे पुढील प्रमाणे आहेत. (Coronavirus is spreading rapidly in India, Experts state four reasons)

 कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंटयावेळी दोन प्रकराच्या विषाणूंनी लोकांना त्रस्त केले आहे. यातील एक देशी आहे तर दुसऱ्या बाजूला अनेक विदेशी विषाणू आहेत. आतापर्यंत ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका व न्यूयॉर्क मध्ये सापडलेले व्हेरिएंट भारतातही सापडले आहेत. मार्चच्या अखेरीस भारतातील नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलने एका नव्या व्हेरिएंट डबल म्युटेंटची माहिती दिली होती. महाराष्ट्र, दिल्ली आणि पंजाबमधून घेण्यात आलेल्या सॅम्पलमधून एका व्हेरिएंटची ओळख पटली आहे. व्हायरोलॉजिस्ट शाहिद जमिल यांनी पीटीआयला सांगितले की, नव्या डबल म्युटेंटमुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार १५-२० टक्के केस नव्या व्हेरिएंटचे आहेत. ब्रिटनमधील नवा कोरोना व्हेरिएंट आधीच्या तुलनेत ५० टक्के वेगाने पसरतो.  

कोरोना प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष यावर्षी जानेवारी महिन्यात कोरोनाचा वेग कमी झाल्यानंतर लोक कमालीचे बेफिकीर झाले. सरकारने कोरोनाचे नियम पाळण्याचे लोकांना सातत्याने आवाहन केले. जमील यांच्या म्हणण्यानुसार भारतात सारे काही खुले आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. मात्र राज्य सरकारे आता हळुहळू विविध प्रकारचे निर्बंध लागू करत आहेत. 

लसीकरणाची गती देशभरात जानेवारी महिन्यात लसीकरणाल सुरुवात झाली. मात्र अनेक लोक कोरोनावरील लस घेण्याचे टाळत होते. जमील यांनी सांगितले की, हेल्थ वर्कर्ससुद्धा लस घेण्याचे टाळत होते. त्याशिवाय मार्च महिन्यात जेव्हा ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांचे लसीकरण सुरू झाले तेव्हासुद्धा लोक लसीकरण केंद्रांवर येत नव्हते. आतापर्यंत केवळ ७ टक्के लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर केवळ ५ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. लोकांमधील अँटिबॉडी संपुष्टात येतेय याशिवाय इंस्टिट्युट ऑफ जिनोमिक्स अँड इंटीग्रेटिव्ह बायोलॉलीच्या एका नुकत्याच झालेल्या संशोधनामधून कोरोनामुळे संसर्ग झालेल्या २० टक्क्यांपासून ३० टक्क्यांपर्यंतच्या लोकांमध्ये सहा महिन्यांनंतर अँटिबॉडी संपुष्टात येत आहेत. त्यामुळेच लोकांना संसर्ग होत आहे. भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी) कानपूरमध्ये तज्ज्ञांच्या मते कोरोनाची दुसरी लाट एप्रिलच्या मध्यावर शिखर गाठू शकते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य