शहरं
Join us  
Trending Stories
1
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
2
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
3
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
4
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
5
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
6
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
7
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
8
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
9
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
10
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
11
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
12
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?
13
वडिलांकडे फी भरण्यासाठी नव्हते पैसे, गरिबीत गेलं बालपण; आज आहे 485 कोटींची मालकीण
14
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
15
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
16
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
17
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
18
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
19
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
20
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत

Coronavirus: "देशात ९९ टक्के लोकांसाठी कोरोना जीवघेणा नाही; भीतीच्या वातावरणातून बाहेर या"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 1:17 AM

राहुल गांधी : स्थलांतरित कामगारांना जबरदस्तीने रोखणे चुकीचे

शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : कोरोनाची साथ देशातील ९९ टक्के लोकांसाठी जीवघेणी नाही. या रोगाबाबत लोकांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे. आम्हाला ही भीती दूर करावी लागेल. एक अथवा दोन टक्के लोकांसाठी हा रोग नक्कीच जीवघेणा आहे. ज्या लोकांना मधुमेह, उच्च रक्तदाब अथवा गंभीर आजार आहे त्यांच्यासाठी हा रोग घातक आहे, असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

राहुल गांधी यांनी दावा केला की, देशातील परिस्थिती सामान्य करण्यासाठी भीतीच्या वातावरणातून बाहेर निघावे लागेल. कोण भाजपचे आहे, कोण काँग्रेस अथवा अन्य पक्षांचे आहे याचा विचार न करता सर्वांच्या सहकार्याने सरकारने हे भीतीचे वातावरण समाप्त करायला हवे. जेणेकरून देशाची अर्थव्यवस्था रुळावर येऊ शकेल. भीतीचे वातावरण समाप्त करण्यासाठी सकारात्मक भूमिका पार पाडण्याचे आवाहन त्यांनी मीडियाला केले.

राहुल गांधी म्हणाले की, कोरोनावर विजय मिळविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीयकृत मार्गाऐवजी विकेंद्रीकरणाचा मार्ग निवडावा. कारण, थेट तळागाळात धोरणे राबविण्यासाठी वस्तुस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांकडे आहे. या वस्तुस्थितीची जाणीव केंद्रातील धोरण ठरविणाऱ्यांकडे नाही. ते म्हणाले की, देशातील १३ कोटी लोकांना ७५०० रुपये दिले जावेत. जर, ते शक्य नसेल तर किमान ५००० रुपये तर त्वरित मिळायला हवेत. ही रक्कम ६५ हजार कोटींएवढी असून अशक्य नाही. रोजगार आणि अर्थव्यवस्थेसाठी एमएसएमई तथा मोठ्या उद्योगांना तात्काळ आर्थिक सहकार्य आणि क्रेडिट सुविधा देण्याचे समर्थन करताना राहुल गांधी यांनी पुरवठा साखळी पुन्हा सुरू करण्यावर जोर दिला. अन्नसुरक्षा, मनरेगा, शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये टाकण्याच्या मुद्यांचा पुनरुच्चार करताना राहुल गांधी यांनी जोर देऊन सांगितले की, स्थलांतरित कामगारांना जबरदस्तीने रोखणे चुकीचे आहे. जर ते आपल्या घरी परतू इच्छित असतील तर, त्यांना परवानगी मिळायला हवी.

लॉकडाऊनमधून बाहेर येण्याचे धोरण काय? : अमरिंदर सिंगपंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी राज्यासाठी महसुलाच्या मागणीचा पुनरुच्चार करताना लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याची रणनीती आणि आर्थिक पुनरुज्जीवनासाठीचे धोरण काय? अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. मोदी यांना लिहिलेल्या पत्रात अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे की, या साथीचा गरिबांना सर्वाधिक फटका बसला आहे. सामाजिक, आर्थिक जनजीवन लवकर पूर्ववत झाले नाही तर, समाजाचे मोठे नुकसान होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधी