शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोना घटला, बेफिकीरपणा वाढला, सहा फोटो दाखवत केंद्र सरकारने पुन्हा कडक निर्बंध लावण्याचा इशारा दिला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 18:50 IST

Coronavirus News: कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता अनेक ठिकाणी बाजारांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. तर पर्वतीय क्षेत्रातील शहरे पर्यटकांनी फुलू लागली आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत गंभीर इशारा दिला आहे.

ठळक मुद्देपर्वतीय भागात पर्यटनासाठी जाणारे लोक कोरोनाला रोखण्याबाबतच्या नियमांचे पालन करत नाहीत जर नियमांचे पालन झाले नाही तर निर्बंधांमध्ये मिळालेली सुट पुन्हा एकदा बंद केली जाईलकोरोनाची दुसरी लाट काही मर्यादित प्रदेशांमध्ये अद्यापही कायम

नवी दिल्ली - भारतातील कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सर्वसामान्यांना विविध निर्बंधांमधून सवलत दिली गेली आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी भयावह वाटणाऱ्या कोरोनाच्या संकटाची भीती आता लोकांना वाटेनाशी झाली आहे. (Coronavirus in India) अनेक ठिकाणी बाजारांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. तर पर्वतीय क्षेत्रातील शहरे पर्यटकांनी फुलू लागली आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत गंभीर इशारा दिला आहे. (Pictures (from hill stations) are frightening. People must comply with COVID-appropriate behaviour: Dr Balram Bhargava, DG, ICMR)

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पर्वतीय भागात पर्यटनासाठी जाणारे लोक कोरोनाला रोखण्याबाबतच्या नियमांचे पालन करत नसल्याचे सांगितले आहे. तसेच जर नियमांचे पालन झाले नाही तर निर्बंधांमध्ये मिळालेली सुट पुन्हा एकदा बंद केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच कोरोनाची दुसरी लाट काही मर्यादित प्रदेशांमध्ये अद्यापही कायम असल्याचे त्यांनी सांगितले. 

आरोग्य मंत्रालयाने पर्वतीय क्षेत्रांमध्ये होत असलेली मोठ्या प्रमाणावरील गर्दी पाहून त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन हे कोरोनाच्या रुग्णसंख्येत झालेली घट कमी करू शकते. अग्रवाल यांनी सांगितले की, देशामधील सक्रिय रुग्णांची संख्या ५ लाखांपैक्षा कमी झाली आहे. तसेच कोरोनाची रुग्णसंख्याही ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्र, तामिळनाडू, ओदिशा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम या राज्यांमध्ये १० टक्के पॉझिटिव्हिटी रेटसह अधिक रुग्ण सापडत आहेत.

दरम्यान, पर्वतीय भागातील बाजारांमधील समोर येत असलेल्या फोटोंवरून आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, हे फोटो भयावह आहेत. लोकांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन केले पाहिजे. भविष्यातील आव्हान हे कोरोनाची तिसरी लाट नाही तर आम्ही त्याबाबत काय भूमिका घेतो ही असेल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या रूपावर चर्चा करण्याऐवजी आपण सर्वांनी या लाटेला रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्यावर लक्ष दिले पाहिजे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाच्या ३४ हजार ७०३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही ३ कोटी ०६ लाख १९ हजार ९३२ एवढी झाली आहे. तर दिवसभरात ५५३ लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ३ हजार २८१ एवढी झाली आहे. गेल्या १११ दिवसांत आढळलेले हे कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण आहेत. तर गेल्या ९० दिवसांमधील हे सर्वात कमी रुग्ण आहेत. सध्या देशात कोरोनाचे ४ लाख ६४ हजार ३५७ सक्रिय रुग्ण आहेत. तर देशातील कोरोनामुक्त लोकांचे प्रमाण ९७.१७ टक्क्यांवर पोहोचले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यCentral Governmentकेंद्र सरकार