शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

Coronavirus: कोरोना घटला, बेफिकीरपणा वाढला, सहा फोटो दाखवत केंद्र सरकारने पुन्हा कडक निर्बंध लावण्याचा इशारा दिला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 18:50 IST

Coronavirus News: कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता अनेक ठिकाणी बाजारांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. तर पर्वतीय क्षेत्रातील शहरे पर्यटकांनी फुलू लागली आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत गंभीर इशारा दिला आहे.

ठळक मुद्देपर्वतीय भागात पर्यटनासाठी जाणारे लोक कोरोनाला रोखण्याबाबतच्या नियमांचे पालन करत नाहीत जर नियमांचे पालन झाले नाही तर निर्बंधांमध्ये मिळालेली सुट पुन्हा एकदा बंद केली जाईलकोरोनाची दुसरी लाट काही मर्यादित प्रदेशांमध्ये अद्यापही कायम

नवी दिल्ली - भारतातील कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सर्वसामान्यांना विविध निर्बंधांमधून सवलत दिली गेली आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी भयावह वाटणाऱ्या कोरोनाच्या संकटाची भीती आता लोकांना वाटेनाशी झाली आहे. (Coronavirus in India) अनेक ठिकाणी बाजारांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. तर पर्वतीय क्षेत्रातील शहरे पर्यटकांनी फुलू लागली आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत गंभीर इशारा दिला आहे. (Pictures (from hill stations) are frightening. People must comply with COVID-appropriate behaviour: Dr Balram Bhargava, DG, ICMR)

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पर्वतीय भागात पर्यटनासाठी जाणारे लोक कोरोनाला रोखण्याबाबतच्या नियमांचे पालन करत नसल्याचे सांगितले आहे. तसेच जर नियमांचे पालन झाले नाही तर निर्बंधांमध्ये मिळालेली सुट पुन्हा एकदा बंद केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच कोरोनाची दुसरी लाट काही मर्यादित प्रदेशांमध्ये अद्यापही कायम असल्याचे त्यांनी सांगितले. 

आरोग्य मंत्रालयाने पर्वतीय क्षेत्रांमध्ये होत असलेली मोठ्या प्रमाणावरील गर्दी पाहून त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन हे कोरोनाच्या रुग्णसंख्येत झालेली घट कमी करू शकते. अग्रवाल यांनी सांगितले की, देशामधील सक्रिय रुग्णांची संख्या ५ लाखांपैक्षा कमी झाली आहे. तसेच कोरोनाची रुग्णसंख्याही ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्र, तामिळनाडू, ओदिशा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम या राज्यांमध्ये १० टक्के पॉझिटिव्हिटी रेटसह अधिक रुग्ण सापडत आहेत.

दरम्यान, पर्वतीय भागातील बाजारांमधील समोर येत असलेल्या फोटोंवरून आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, हे फोटो भयावह आहेत. लोकांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन केले पाहिजे. भविष्यातील आव्हान हे कोरोनाची तिसरी लाट नाही तर आम्ही त्याबाबत काय भूमिका घेतो ही असेल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या रूपावर चर्चा करण्याऐवजी आपण सर्वांनी या लाटेला रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्यावर लक्ष दिले पाहिजे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाच्या ३४ हजार ७०३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही ३ कोटी ०६ लाख १९ हजार ९३२ एवढी झाली आहे. तर दिवसभरात ५५३ लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ३ हजार २८१ एवढी झाली आहे. गेल्या १११ दिवसांत आढळलेले हे कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण आहेत. तर गेल्या ९० दिवसांमधील हे सर्वात कमी रुग्ण आहेत. सध्या देशात कोरोनाचे ४ लाख ६४ हजार ३५७ सक्रिय रुग्ण आहेत. तर देशातील कोरोनामुक्त लोकांचे प्रमाण ९७.१७ टक्क्यांवर पोहोचले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यCentral Governmentकेंद्र सरकार