शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Coronavirus: कोरोना रुग्णसंख्येत भयावह वाढ, या राज्यात कठोर विकेंड लॉकडाऊन, केंद्रही पथक पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 11:45 IST

Coronavirus in Kerala: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असतानाच आता पुन्हा एकदा काही राज्यांमधून कोरोनाच्या रुग्णसंख्येने उसळी घेण्यास सुरुवात केली आहे.

तिरुवनंतपुरम - देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असतानाच आता पुन्हा एकदा काही राज्यांमधून कोरोनाच्या रुग्णसंख्येने उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. (Coronavirus in Kerala) देशातील इतर राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली असताना केरळमध्ये मात्र कोरोनाच्या रुग्णवाढीचा वेग थांबण्याचे नाव घेत नाही आहे. कोरोनाच्या रुग्णांची ही वाढती संख्या लक्षात घेऊन केरळ सरकारने या आठवड्यापासून विकेंड लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलमधील सहा सदस्यांना केरळमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. (Corona outbreak, severe weekend lockdown in Kerala)

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, केरळमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीत हे पथक कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या व्यवस्थापनामध्ये राज्यात सुरू असलेल्या प्रयत्नांना मदत करेल. केरळमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मात्र अन्य भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे.

केरळमध्ये बुधवारी कोरोनाच्या २२ हजार ०५६ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून ३३ लाख २७ हजार ३०१ झाली आहे. तर १३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने या विषाणूमुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या १६ हजार ४५७ एवढी झाली आहे. तर काल दिवसभरात १७ हजार ७६१ जणांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ३१ लाख ६० हजार ८०४ एवढी झाली आहे.

दरम्यान, भारतामध्ये गेल्या २४ तासांमध्ये ४३ हजार ५०९ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर याच काळात ३८ हजार ४६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रिकव्हरी रेटचा विचार केल्यास तो ९७.३८ टक्के आहे. भारतामध्ये अद्याप कोरोनाचे ४ लाख, ०३ हजार ८४० सक्रिय रुग्ण आहेत. देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट हा ५ टक्क्यांखाली २.३८ टक्के आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट हा २.५२ टक्के नोंदवला गेला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ६४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत देशातील ४३ लाख, ९२ हजार ६९७ जणांना कोरोनाविरोधातील लस मिळाली आहे. आतापर्यंत देशातील ४५ कोटी ०७ लाख ०६ हजार २५७ जणांचे लसीकरण झाले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळHealthआरोग्यIndiaभारत