शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Coronavirus: कोरोना रुग्णसंख्येत भयावह वाढ, या राज्यात कठोर विकेंड लॉकडाऊन, केंद्रही पथक पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 11:45 IST

Coronavirus in Kerala: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असतानाच आता पुन्हा एकदा काही राज्यांमधून कोरोनाच्या रुग्णसंख्येने उसळी घेण्यास सुरुवात केली आहे.

तिरुवनंतपुरम - देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असतानाच आता पुन्हा एकदा काही राज्यांमधून कोरोनाच्या रुग्णसंख्येने उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. (Coronavirus in Kerala) देशातील इतर राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली असताना केरळमध्ये मात्र कोरोनाच्या रुग्णवाढीचा वेग थांबण्याचे नाव घेत नाही आहे. कोरोनाच्या रुग्णांची ही वाढती संख्या लक्षात घेऊन केरळ सरकारने या आठवड्यापासून विकेंड लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलमधील सहा सदस्यांना केरळमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. (Corona outbreak, severe weekend lockdown in Kerala)

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, केरळमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीत हे पथक कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या व्यवस्थापनामध्ये राज्यात सुरू असलेल्या प्रयत्नांना मदत करेल. केरळमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मात्र अन्य भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे.

केरळमध्ये बुधवारी कोरोनाच्या २२ हजार ०५६ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून ३३ लाख २७ हजार ३०१ झाली आहे. तर १३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने या विषाणूमुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या १६ हजार ४५७ एवढी झाली आहे. तर काल दिवसभरात १७ हजार ७६१ जणांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ३१ लाख ६० हजार ८०४ एवढी झाली आहे.

दरम्यान, भारतामध्ये गेल्या २४ तासांमध्ये ४३ हजार ५०९ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर याच काळात ३८ हजार ४६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रिकव्हरी रेटचा विचार केल्यास तो ९७.३८ टक्के आहे. भारतामध्ये अद्याप कोरोनाचे ४ लाख, ०३ हजार ८४० सक्रिय रुग्ण आहेत. देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट हा ५ टक्क्यांखाली २.३८ टक्के आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट हा २.५२ टक्के नोंदवला गेला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ६४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत देशातील ४३ लाख, ९२ हजार ६९७ जणांना कोरोनाविरोधातील लस मिळाली आहे. आतापर्यंत देशातील ४५ कोटी ०७ लाख ०६ हजार २५७ जणांचे लसीकरण झाले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळHealthआरोग्यIndiaभारत