शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

CoronaVirus : आम्हाला कुत्र्यासारखं पळवून लावलं; आता परतणार नाही; सूरत सोडताना मजुरांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 14:53 IST

मुंबई आणि बंगळुरूमध्ये पोलीस आणि मजुरांमध्ये संघर्ष झाल्याचा घटना समोर आल्या आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात जवळपास ४० दिवसांनंतर मजुरांना घरी परतण्यासाठी रेल्वेनं विशेष ट्रेन सोडल्या आहेत.गुजरातमधल्या सूरतमध्येही प्रशासनावरील वाढती नाराजी आणि असंतोषामुळे सोमवारी मजूर (प्रवासी कामगार) पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. सूरतमध्ये पोलीस आणि कामगार यांच्यात हिंसक झडप झाली, त्यानंतर पोलिसांनाही अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. 

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक परराज्यातील प्रवासी मजूर अडकून पडले आहेत. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात जवळपास ४० दिवसांनंतर मजुरांना घरी परतण्यासाठी रेल्वेनं विशेष ट्रेन सोडल्या आहेत. तरीसुद्धा अनेक मजूर अद्यापही अडकून पडलेले आहेत. गुजरातमधल्या सूरतमध्येही प्रशासनावरील वाढती नाराजी आणि असंतोषामुळे सोमवारी मजूर (प्रवासी कामगार) पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. आम्हाला घरी पाठवा अशी मागणीसुद्धा या मजूर आणि कामगारांनी केली आहे. सूरतमध्ये पोलीस आणि कामगार यांच्यात हिंसक झडप झाली, त्यानंतर पोलिसांनाही अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. मुंबई आणि बंगळुरूमध्ये पोलीस आणि मजुरांमध्ये संघर्ष झाल्याचा घटना समोर आल्या आहेत.परराज्यातील हे सर्व मजूर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांतील आहेत.  23 मार्चला गुजरातमध्ये लॉकडाऊन घोषित झाल्यापासून सूरत येथे प्रवासी मजूर आणि पोलीस हे अनेकदा आमनेसामने आले आहेत. सोमवारी वारेली येथे मजुरांच्या एका गटाने पोलिसांवर दगडफेक सुरू केल्यावर हिंसाचार सुरू झाला. वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. यामध्ये महिलांचा देखील समावेश होता.पोलिसांनी 200 जणांना केली अटक हे मजूर शुक्रवारी रात्री आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते, परंतु त्यांना गुजरात सीमेवरून परत पाठवण्यात आले. त्यानंतर संतप्त झालेले हे मजूर रस्त्यावर उतरले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला. पोलीस दांडक्यानं मजूर आणि कामगारांना रस्त्यावर धावताना मारत असल्याचंही व्हिडीओतून समोर आलं आहे. या घटनेनंतर 200 लोकांना हिंसाचार पसरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारामध्ये जवळपास 3,000 मजूर सहभागी होते, त्यातील काहींनी पोलिसांवर अ‍ॅसिड बाटल्याही फेकल्या,” असे सूरत रेंजचे आयजी राजकुमार यांनी सांगितले. 'घरी जाण्यासाठी खिशातले सर्व पैसे दिले'नवभारत टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, वाराणसी येथील टेक्सटाइल कामगार राधेश्याम त्रिपाठी म्हणाले की, ते कधीही सूरतला परत येणार नाहीत. आम्हाला कुत्र्यांप्रमाणेच गुजरातमधल्या दाहोदमधून पळवण्यात आले. घरी जाण्यासाठी आम्ही पॉकेटमनीचे सर्व पैसे खर्च केले, परंतु तरीही आमचा छळ करण्यात आला आणि आम्हाला परत पाठविण्यात आले. आम्हाला आमच्या घरी जायचं आहे, हाच आमचा गुन्हा आहे. बिहारमधील गया येथील रहिवासी गिरीशंकर मिश्रा म्हणतात, "गुजरातमध्ये आम्हाला अशीच वागणूक देण्यात आल्यास आम्ही परत येणार नाही." पोलीस आमच्याबरोबर दहशतवाद्यांसारखे वागतात, अशा भावना मजुरांनी व्यक्त केल्या आहेत.मजूर अन् कामगारांना दाहोद येथे रोखण्यात आलेराधेश्याम व इतर 56 मजूर घेऊन जाणारी बस दाहोद चेक पोस्टवर थांबवली. त्यांच्याप्रमाणेच इतर बऱ्याच कामगारांकडेही दुर्लक्ष केलं जात आहे. वलसाड जिल्ह्यातही हजारो मजुरांनी रस्ते रोखले आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत 15,558 प्रवाशांसह 13 गाड्या यूपी आणि ओडिशाकडे रवाना झाल्या आहेत, तर दोन गाड्या धनबाद व पटनाकडे रवाना होतील.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

इराणकडून चलनात मोठा बदल, चार शून्य हटवले अन् नावही बदललं

चिनी ड्रॅगनला घायाळ करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची खेळी; अमेरिकेकडून मोठी घोषणा

CoronaVirus News: सरकारनं सध्या लोकांच्या हाती पैसा देऊ नये, त्याऐवजी...; अभिजीत बॅनर्जींची सूचना

Coronavirus: ...तर ‘तियानमेन चौका’सारखी परिस्थिती उद्भवेल अन् चीन-अमेरिकेमध्ये होईल 'युद्ध'; अंतर्गत अहवालातून खुलासा

Coronavirus: कौतुकास्पद! कर्तव्य बजावतानाच पोलिसानं रस्त्यावर उघडली शाळा अन् मुलांना देतोय शिक्षणाचे धडे

Coronavirus: दारू महागली! 'या' राज्यात मद्यावर ७० टक्के अतिरिक्त कर लागणार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGujaratगुजरात