शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

coronavirus : लॉकडाऊन हटवण्याच्या चर्चेवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 18:01 IST

14 एप्रिलनंतर देशातील लॉक डाऊन चालू राहणार की हटवले जाणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी लॉकडाऊनबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

ठळक मुद्दे14 एप्रिलनंतर देशातील लॉक डाऊन चालू राहणार की हटवले जाणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या शक्याशक्यता वर्तवू नका. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात १४ एप्रिलपर्यत २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता.

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा साडे चार हजारांच्या वर गेला आहे. तर मृतांचा आकडाही शंभरीपार पोहोचला आहे. त्यामुळे येत्या 14 एप्रिलनंतर देशातील लॉक डाऊन चालू राहणार की हटवले जाणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी लॉकडाऊनबाबत प्रतिक्रिया दिली आहे. लॉकडाऊनबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे त्याबाबत कुठलीही शक्यता वर्तवू नका, असे अग्रवाल यांनी सांगितले. 

आज झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत लॉकडाऊनबाबत विचारले असता लव अग्रवाल म्हणाले की, लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या शक्याशक्यता वर्तवू नका. त्यावेळी जी काही परिस्थिती असेल ते पाहून पुढील निर्णय घेतला जाईल.  

दरम्यान,  कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात १४ एप्रिलपर्यत २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र देशात कोरोनाग्रस्तांचा वाढती संख्या पाहून लॉकडाऊन वाढवणार की संपवणार याबाबत कमालीचा सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. देशात लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे अशी चर्चा सुरु आहे. सरकारी सूत्रांनुसार अनेक राज्यांनी केंद्राकडे लॉकडाऊन वाढवण्याची शिफारस केली आहे.

केंद्र सरकारच्या सूत्रांनुसार, अनेक राज्यातील सरकारने आणि तज्ज्ञांनी केंद्र सरकारकडे लॉकडाऊन वाढवण्याची शिफारस केली आहे. केंद्र सरकार राज्यांच्या आणि तज्ज्ञांच्या शिफारशीवर विचार करत आहे. त्यामुळे १४ एप्रिलनंतर देशात लॉकडाऊन वाढवणार की, काही टप्प्यात लॉकडाऊन शिथील करणार याबाबत केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली नाही.

देशात कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ मार्च रोजी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. लॉकडाऊनची शेवटची तारीख १४ एप्रिल आहे. त्यामुळे १४ एप्रिलनंतर देशात सर्वकाही सुरळीत होईल अशी आशा काही नागरिकांना आहे. ज्या भागात कोरोना हॉटस्पॉट नाही, अशा भागात केंद्र सरकार लॉकडाऊन उठवेल अशी चर्चा सुरू आहे. मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेमधून केंद्र सरकार याबाबत काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. दरम्यान तेलंगणा सरकारने केंद्र सरकारला लॉकडाऊन आणखी काही आठवडे वाढवण्याची शिफारस केली आहे. अशावेळी लॉकडाऊन ३ जूनपर्यंत वाढवण्याची मागणी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारतGovernmentसरकार