शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Coronavirus: चीनमधून येणाऱ्या उद्योगांना सहज जमीन देण्याची केंद्र सरकारची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 07:18 IST

या देशातील कंपन्यांनी गेल्या २० वर्षांत भारतात ६८ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली आहे.

नवी दिल्ली : कोविड-१९ या साथीच्या आजारामुळे चीनमधून बाहेर पडणाºया उद्योगांना सामावून घेण्यासाठी केंद्र सरकार ४,६१,५८९ हेक्टर जमीन तयार करीत आहे. योगायोगाने हे क्षेत्र जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी लक्झेम्बर्गच्या आकारापेक्षा दुप्पट आहे, असे उद्योग मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

याकरिता केंद्रीय उद्योग मंत्रालयाने गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमधील काही भूभाग शोधून काढले आहेत. या जागेवर चीनमधून बाहेर पडणाºया उद्योगांसाठी मोठी उद्योग वसाहत उभारण्यात येणार आहे. या औद्योगिक वसाहतीत जागतिक स्तरीय पायाभूत सुविधा व इतर सर्व सुविधा असतील. त्यामुळे या बहुराष्ट्रीय कंपन्यांना व्यवसाय करणे सुलभ होईल.

याअगोदर कच्च्या तेलाचा मोठा प्रकल्प सौदी आरामको आणि जागतिकस्तराचा स्टील उत्पादक पोस्को यांच्या प्रस्तावांना जमीन कमी पडल्यामुळे गती मिळू शकली नाही. या घटनेचा आढावा घेत सरकारला आता हे दुप्पट करायचे आहे. जमिनीच्या कमतरतेमुळे थेट परकीय गुंतवणुकीचा (एफडीआय) कुठलाही प्रस्ताव बाजूला ठेवला जाणार नाही. उद्योग मंत्रालयाकडे अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया आणि चीनमधील बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून उत्पादक प्रकल्प चीनबाहेर हलविण्यासाठी विचारणा झाली आहे. योगायोगाने या चार देशांचा भारताशी द्विपक्षीय व्यापार ८० अब्ज डॉलरचा आहे. या देशातील कंपन्यांनी गेल्या २० वर्षांत भारतात ६८ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली आहे.राज्य व केंद्रातील अधिकाऱ्यांची बैठकविद्युत उपकरणे, फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स, अवजड अभियांत्रिकी उत्पादने, सौर उपकरणे, खाद्य प्रक्रिया, रसायने व कापड या औद्योगिक क्षेत्राकडून भारताकडे विचारणा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी खूप उत्साही आहेत आणि या जमिनीवर लवकरात लवकर सोईसुविधा पूर्ण व्हाव्यात, अशी त्यांची इच्छा आहे. यासंदर्भात त्यांनी ३० एप्रिलला राज्य व केंद्रीय मंत्रालयाच्या अधिकाºयांची बैठक घेतली होती. चीनमधून भारतात स्थलांतरित करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांशी आंध्र प्रदेश सरकारचे अधिकारी संपर्क साधत आहेत.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत