शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसाठी केंद्र सरकारच जबाबदार; ओवेसींचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 23:56 IST

Coronavirus Pandemic India : दुसऱ्या लाटेबद्दल तज्ज्ञांनी इशारा दिल्यानंतरही उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत?, ओवेसी यांचा सवाल. लसींवरही सरकार खोटं बोलतंय, ओवेसी यांचा आरोप.

ठळक मुद्देदुसऱ्या लाटेबद्दल तज्ज्ञांनी इशारा दिल्यानंतरही उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत?, ओवेसी यांचा सवाल. लसींवरही सरकार खोटं बोलतंय, ओवेसी यांचा आरोप.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. सध्या रुग्णसंख्या कमी होत असली तरी दुसऱ्या लाटेचा मोठा फटका सर्वांना बसला. दरम्यान, दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेल्या मृत्यूंना केंद्र सरकारच जबाबदार आहे, असा आरोप एमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला. 

"मी पुराव्यांच्या सहाय्यानं बोलत आहे. जेव्हा सर्व डॉक्टर्स आणि तज्ज्ञांनी सांगितलं होतं की कोरोनाची दुसरी लाट येणार, त्यावेळी योग्य त्या उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सल्ला ऐकला नाही आणि आपल्या मर्जीनुसार निर्णय घेतले. कोरोनाच्या विरोधात रोडमॅप तयार आहे असं त्यांनी सांगितलं होतं. ८ एप्रिल रोजी त्यांनी आपण कोरोनाविरोधात लढाई जिंकल्याचं म्हटलं होतं. भाजपनं प्रस्ताव पारित करत पंतप्रधानांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं होतं. या सर्वांची जबाबदारी पंतप्रधानांची आहे," असं ओवेसी म्हणाले. त्यांनी एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान यावर भाष्य केलं. "क्रिकेटच्या मैदानावर पंतप्रधानांनी आपण कोरोनाविरोधातील लढाई जिंकल्याचं म्हटलं होतं. दुसऱ्या देशांना देण्यासाठी आपण लसींची व्यवस्था केली. परंतु वेळे असतानाही आपण सतर्क झालो नाही आणि लसींची निर्यात सुरू ठेवली. ऑक्सिजनसाठीही पंतप्रधान आणि त्यांचं सरकारच जबाबदार आहे," असं ते म्हणाले. 

ऑक्सिजनची जबाबदारी पंतप्रधानांवर"ऑक्सिजनची जबाबदारी ही पंतप्रधानांवर आहे. ऑक्सिजनसाठी उच्च न्यायालयात जावं लागलं. पंतप्रधानांची अकार्यक्षमता मोदींचे भक्त प्रशासनावर ढकलत आहे. ना लसीची ऑर्डर दिली, ना आगाऊ रक्कम दिली. तुम्ही आगाऊ रक्कम मार्च महिन्यापासून दिली. एक प्रकारे तुम्हीच दुसऱ्या लाटेला दावत दिली. साडेचार महिन्यांत देशाच्या लोकसंख्येतील केवळ ३.२ कोटी लोकांनाच लसीचे दोन डोस मिळाले आणि १६ कोटी लोकांना एक डोस मिळाला. अशात तिसरी लाट आली तर काय होईल?" असा सवाल करत ओवेसी यांनी सरकावर निशाणा साधला.

लसीबाबत सरकार खोटं बोलतंय"लसीबाबत सरकार खोटे दावे करत आहे. आजही लसींच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित होत आहे. तिसऱ्या लाटेसाठी सरकारनं काय तयारी केली. फायझरनं डिसेंबर २०२० मध्ये मंजुरी मागितली होती. परंतु सरकारनं ती आता दिली. २०० कोटी डोसचं आश्वासन खोटं आगे. इथे मृतांचा खच भरला आहे. दुसऱ्या लाटेत ४ ते ५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. कोरोनावर कोणता विजय मिळवला आहे तो एकदा सांगावा," असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.लॉकडाऊनचा कोरोनाला रोखण्याशी संबंध नाही"लॉकडाऊनचा कोरोना विषाणूला रोखण्याशी संबंध नाही. लॉकडाऊनमध्ये आयसीयू बेड्स मिळतील का, ब्लॅक फंगसचं औषध मिळेल का? प्रत्येक गरीबाच्या खात्यात १० हजार रूपये टाका आणि नंतर लॉकडाऊन लावा. मी आपल्या क्षेत्रातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर जात आहे. लोकांना लसीकरणाचं आवाहन करत आहे. कोविन अॅपची गरज काय? देशात फक्त २५ टक्के लोकांकडे इटरनेटची सुविधा आहे. बाकी लोकं हे अॅप कसं वापरतील. थेट जाऊन लसीकरण करून घेण्याची परवानगी का दिली जात नाही," असा सवालही त्यांनी उपस्थित केला. "मी मुस्लिम नागरिकांनाही जाऊन लस घेण्याचं आव्हान करतोय. त्यांनी जरूर लसीकरण करून घ्यावंस इस्लाममध्ये जीव वाचवणं ही मोठी जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. मुस्लिमांसह मी सर्वच देशवासीयांना लस घेण्याचं आवाहन करतो," असं ओवेसी म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसNarendra Modiनरेंद्र मोदीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीIndiaभारतOxygen Cylinderऑक्सिजनMucormycosisम्युकोरमायकोसिसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन