शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus : कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसाठी केंद्र सरकारच जबाबदार; ओवेसींचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 23:56 IST

Coronavirus Pandemic India : दुसऱ्या लाटेबद्दल तज्ज्ञांनी इशारा दिल्यानंतरही उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत?, ओवेसी यांचा सवाल. लसींवरही सरकार खोटं बोलतंय, ओवेसी यांचा आरोप.

ठळक मुद्देदुसऱ्या लाटेबद्दल तज्ज्ञांनी इशारा दिल्यानंतरही उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत?, ओवेसी यांचा सवाल. लसींवरही सरकार खोटं बोलतंय, ओवेसी यांचा आरोप.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. सध्या रुग्णसंख्या कमी होत असली तरी दुसऱ्या लाटेचा मोठा फटका सर्वांना बसला. दरम्यान, दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेल्या मृत्यूंना केंद्र सरकारच जबाबदार आहे, असा आरोप एमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला. 

"मी पुराव्यांच्या सहाय्यानं बोलत आहे. जेव्हा सर्व डॉक्टर्स आणि तज्ज्ञांनी सांगितलं होतं की कोरोनाची दुसरी लाट येणार, त्यावेळी योग्य त्या उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सल्ला ऐकला नाही आणि आपल्या मर्जीनुसार निर्णय घेतले. कोरोनाच्या विरोधात रोडमॅप तयार आहे असं त्यांनी सांगितलं होतं. ८ एप्रिल रोजी त्यांनी आपण कोरोनाविरोधात लढाई जिंकल्याचं म्हटलं होतं. भाजपनं प्रस्ताव पारित करत पंतप्रधानांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं होतं. या सर्वांची जबाबदारी पंतप्रधानांची आहे," असं ओवेसी म्हणाले. त्यांनी एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान यावर भाष्य केलं. "क्रिकेटच्या मैदानावर पंतप्रधानांनी आपण कोरोनाविरोधातील लढाई जिंकल्याचं म्हटलं होतं. दुसऱ्या देशांना देण्यासाठी आपण लसींची व्यवस्था केली. परंतु वेळे असतानाही आपण सतर्क झालो नाही आणि लसींची निर्यात सुरू ठेवली. ऑक्सिजनसाठीही पंतप्रधान आणि त्यांचं सरकारच जबाबदार आहे," असं ते म्हणाले. 

ऑक्सिजनची जबाबदारी पंतप्रधानांवर"ऑक्सिजनची जबाबदारी ही पंतप्रधानांवर आहे. ऑक्सिजनसाठी उच्च न्यायालयात जावं लागलं. पंतप्रधानांची अकार्यक्षमता मोदींचे भक्त प्रशासनावर ढकलत आहे. ना लसीची ऑर्डर दिली, ना आगाऊ रक्कम दिली. तुम्ही आगाऊ रक्कम मार्च महिन्यापासून दिली. एक प्रकारे तुम्हीच दुसऱ्या लाटेला दावत दिली. साडेचार महिन्यांत देशाच्या लोकसंख्येतील केवळ ३.२ कोटी लोकांनाच लसीचे दोन डोस मिळाले आणि १६ कोटी लोकांना एक डोस मिळाला. अशात तिसरी लाट आली तर काय होईल?" असा सवाल करत ओवेसी यांनी सरकावर निशाणा साधला.

लसीबाबत सरकार खोटं बोलतंय"लसीबाबत सरकार खोटे दावे करत आहे. आजही लसींच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित होत आहे. तिसऱ्या लाटेसाठी सरकारनं काय तयारी केली. फायझरनं डिसेंबर २०२० मध्ये मंजुरी मागितली होती. परंतु सरकारनं ती आता दिली. २०० कोटी डोसचं आश्वासन खोटं आगे. इथे मृतांचा खच भरला आहे. दुसऱ्या लाटेत ४ ते ५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. कोरोनावर कोणता विजय मिळवला आहे तो एकदा सांगावा," असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.लॉकडाऊनचा कोरोनाला रोखण्याशी संबंध नाही"लॉकडाऊनचा कोरोना विषाणूला रोखण्याशी संबंध नाही. लॉकडाऊनमध्ये आयसीयू बेड्स मिळतील का, ब्लॅक फंगसचं औषध मिळेल का? प्रत्येक गरीबाच्या खात्यात १० हजार रूपये टाका आणि नंतर लॉकडाऊन लावा. मी आपल्या क्षेत्रातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर जात आहे. लोकांना लसीकरणाचं आवाहन करत आहे. कोविन अॅपची गरज काय? देशात फक्त २५ टक्के लोकांकडे इटरनेटची सुविधा आहे. बाकी लोकं हे अॅप कसं वापरतील. थेट जाऊन लसीकरण करून घेण्याची परवानगी का दिली जात नाही," असा सवालही त्यांनी उपस्थित केला. "मी मुस्लिम नागरिकांनाही जाऊन लस घेण्याचं आव्हान करतोय. त्यांनी जरूर लसीकरण करून घ्यावंस इस्लाममध्ये जीव वाचवणं ही मोठी जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. मुस्लिमांसह मी सर्वच देशवासीयांना लस घेण्याचं आवाहन करतो," असं ओवेसी म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसNarendra Modiनरेंद्र मोदीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीIndiaभारतOxygen Cylinderऑक्सिजनMucormycosisम्युकोरमायकोसिसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन