शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
4
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
5
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
6
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
7
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
8
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
9
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
10
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
11
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
12
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
13
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
14
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
15
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
16
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
17
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
18
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
19
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
20
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसाठी केंद्र सरकारच जबाबदार; ओवेसींचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 23:56 IST

Coronavirus Pandemic India : दुसऱ्या लाटेबद्दल तज्ज्ञांनी इशारा दिल्यानंतरही उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत?, ओवेसी यांचा सवाल. लसींवरही सरकार खोटं बोलतंय, ओवेसी यांचा आरोप.

ठळक मुद्देदुसऱ्या लाटेबद्दल तज्ज्ञांनी इशारा दिल्यानंतरही उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत?, ओवेसी यांचा सवाल. लसींवरही सरकार खोटं बोलतंय, ओवेसी यांचा आरोप.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. सध्या रुग्णसंख्या कमी होत असली तरी दुसऱ्या लाटेचा मोठा फटका सर्वांना बसला. दरम्यान, दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेल्या मृत्यूंना केंद्र सरकारच जबाबदार आहे, असा आरोप एमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला. 

"मी पुराव्यांच्या सहाय्यानं बोलत आहे. जेव्हा सर्व डॉक्टर्स आणि तज्ज्ञांनी सांगितलं होतं की कोरोनाची दुसरी लाट येणार, त्यावेळी योग्य त्या उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सल्ला ऐकला नाही आणि आपल्या मर्जीनुसार निर्णय घेतले. कोरोनाच्या विरोधात रोडमॅप तयार आहे असं त्यांनी सांगितलं होतं. ८ एप्रिल रोजी त्यांनी आपण कोरोनाविरोधात लढाई जिंकल्याचं म्हटलं होतं. भाजपनं प्रस्ताव पारित करत पंतप्रधानांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं होतं. या सर्वांची जबाबदारी पंतप्रधानांची आहे," असं ओवेसी म्हणाले. त्यांनी एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान यावर भाष्य केलं. "क्रिकेटच्या मैदानावर पंतप्रधानांनी आपण कोरोनाविरोधातील लढाई जिंकल्याचं म्हटलं होतं. दुसऱ्या देशांना देण्यासाठी आपण लसींची व्यवस्था केली. परंतु वेळे असतानाही आपण सतर्क झालो नाही आणि लसींची निर्यात सुरू ठेवली. ऑक्सिजनसाठीही पंतप्रधान आणि त्यांचं सरकारच जबाबदार आहे," असं ते म्हणाले. 

ऑक्सिजनची जबाबदारी पंतप्रधानांवर"ऑक्सिजनची जबाबदारी ही पंतप्रधानांवर आहे. ऑक्सिजनसाठी उच्च न्यायालयात जावं लागलं. पंतप्रधानांची अकार्यक्षमता मोदींचे भक्त प्रशासनावर ढकलत आहे. ना लसीची ऑर्डर दिली, ना आगाऊ रक्कम दिली. तुम्ही आगाऊ रक्कम मार्च महिन्यापासून दिली. एक प्रकारे तुम्हीच दुसऱ्या लाटेला दावत दिली. साडेचार महिन्यांत देशाच्या लोकसंख्येतील केवळ ३.२ कोटी लोकांनाच लसीचे दोन डोस मिळाले आणि १६ कोटी लोकांना एक डोस मिळाला. अशात तिसरी लाट आली तर काय होईल?" असा सवाल करत ओवेसी यांनी सरकावर निशाणा साधला.

लसीबाबत सरकार खोटं बोलतंय"लसीबाबत सरकार खोटे दावे करत आहे. आजही लसींच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित होत आहे. तिसऱ्या लाटेसाठी सरकारनं काय तयारी केली. फायझरनं डिसेंबर २०२० मध्ये मंजुरी मागितली होती. परंतु सरकारनं ती आता दिली. २०० कोटी डोसचं आश्वासन खोटं आगे. इथे मृतांचा खच भरला आहे. दुसऱ्या लाटेत ४ ते ५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. कोरोनावर कोणता विजय मिळवला आहे तो एकदा सांगावा," असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.लॉकडाऊनचा कोरोनाला रोखण्याशी संबंध नाही"लॉकडाऊनचा कोरोना विषाणूला रोखण्याशी संबंध नाही. लॉकडाऊनमध्ये आयसीयू बेड्स मिळतील का, ब्लॅक फंगसचं औषध मिळेल का? प्रत्येक गरीबाच्या खात्यात १० हजार रूपये टाका आणि नंतर लॉकडाऊन लावा. मी आपल्या क्षेत्रातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर जात आहे. लोकांना लसीकरणाचं आवाहन करत आहे. कोविन अॅपची गरज काय? देशात फक्त २५ टक्के लोकांकडे इटरनेटची सुविधा आहे. बाकी लोकं हे अॅप कसं वापरतील. थेट जाऊन लसीकरण करून घेण्याची परवानगी का दिली जात नाही," असा सवालही त्यांनी उपस्थित केला. "मी मुस्लिम नागरिकांनाही जाऊन लस घेण्याचं आव्हान करतोय. त्यांनी जरूर लसीकरण करून घ्यावंस इस्लाममध्ये जीव वाचवणं ही मोठी जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. मुस्लिमांसह मी सर्वच देशवासीयांना लस घेण्याचं आवाहन करतो," असं ओवेसी म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसNarendra Modiनरेंद्र मोदीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीIndiaभारतOxygen Cylinderऑक्सिजनMucormycosisम्युकोरमायकोसिसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन