शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या जाणाऱ्यांची होणार मोजदाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 01:49 IST

ईपीएफओ, ईएसआयसीला केंद्राचा आदेश; वेतन कपातीचीही नोंद ठेवणार

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात देशामध्ये किती जणांच्या नोकºया गेल्या, तसेच किती जणांच्या पगारात कपात झाली किंवा उशिराने पगार मिळाले या सर्व गोष्टींची आकडेवारी जमविण्याचे आदेश केंद्र सरकारने एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड आॅर्गनायझेशन (ईपीएफओ) व एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ईएसआयसी) या दोन संघटनांना दिले आहेत. ही माहिती गोळा झाल्यानंतर ती पंतप्रधान कार्यालयाला सादर केली जाईल.कोरोना साथीमुळे पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे सध्या बंद ठेवण्यात आले आहेत. देशातील महत्त्वाचे आर्थिक व्यवहार ठप्प असून अनेकांचा रोजगार बुडाला आहे. संघटित क्षेत्रात अनेक जण नोकºया गमावण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही कर्मचाºयाचा पगार कापू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योजकांना केले आहे. मात्र, तरीही अनेक नोकरदारांच्या डोक्यावर वेतन कपात, तसेच नोकरी गमावण्याची टांगती तलवार कायम आहे. लॉकडाऊनच्या काळात किती लोकांनी नोकºया गमावल्या, वेतन कपात झाली आदींचा तपशील जमविण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात एप्रिल महिन्याची अखेर ते ७ मेपर्यंतच्या कालावधीतील घडामोडींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. ईपीएफओचे ६ कोटी सदस्य आहेत.त्यामध्ये पेन्शनरांचाही समावेश आहे, तर ईएसआयसीचे ३ कोटी सदस्य आहेत.२० कॉल सेंटर स्थापनईपीएफओच्या विभागीय कार्यालयांनी आपल्या सदस्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांची लॉकडाऊनच्या काळातील वेतन, नोकरीविषयक स्थिती जाणून घ्यायची आहे. त्यासाठी कामगार मंत्रालयाने २० कॉल सेंटरची स्थापना केली आहे. देशात सुमारे ५० कोटी कामगार असून त्यातील ५ कोटी कामगार संघटित क्षेत्रामध्ये आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या