शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

Coronavirus: देशात मृतांची संख्या वाढणार नाही; डॉक्टरांच्या 'या' दाव्याने भारतीयांना मिळणार दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 10:03 IST

भारतात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ६०० वर गेली आहे. तर आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली: जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून भारतातही आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी लोकांना रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर वाढता धोका लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी देशभरात २१ दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. भारतात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ६०० वर गेली आहे. तर आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र भारतातील एका डॉक्टरांनी असा दावा केला आहे की त्या दाव्यावे भारतीयांना थोडा दिलासा मिळणार आहे.

आयसीएमआरचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि एम्स इम्युनोलॉजीचे माजी डीन डॉ. नरिंदर मेहरा यांनी सांगितले की,रोग प्रतिकारशक्तीमध्ये भारताचा अव्वल क्रमांक आहे. त्यामुळे इतर देशांप्रमाणे भारतात कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या वाढणार नाही. परंतु सिद्ध करण्यासाठी नागरिकांनी नियमांचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं असल्याचे नरिंदर मेहरा यांनी सांगितले 

देशात कमी मृत्यूची तीन कारणे असून यामध्ये शारीरिक अंतर, रोगप्रतिकार प्रणाली आणि पर्यावरण यांचा समावेश आहे. भारतात हळद, आले, मसालेदार अन्न मोठ्या प्रमाणात खातात आणि असेच अन्न आपली प्रतिकारशक्ती वाढवते असं मत नरिंदर मेहरा यांनी व्यक्त केलं आहे. यामुळेच इटली, स्पेन, अमेरिका यासारख्या भारतात मृत्यूचे प्रमाण वाढणार नाही असं नरिंदर मेहरा यांनी सांगितले.

जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४,२७,९४० वर पोहोचली असून, बळींची एकूण संख्या १९,२४६ इतकी झाली आहे. जगभरातील १८१ देशातील ही संख्या आहे. यामध्ये युरोपमधील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २,२६,३४० पेक्षा अधिक तर बळींची संख्या १२,७१९ इतकी आहे. आशियात ९९,८०५ रुग्ण आहेत तर ३,५९३ बळी गेले आहेत. जगातील आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरिस यांनी सांगितले की, सध्या युरोप हा कोरोना साथीचे केंद्र बनला असला, तरी अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंताजनक आहे. अमेरिका या साथीचे नवे केंद्र बनण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूdocterडॉक्टरCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या